tag:blogger.com,1999:blog-26458259624646247642024-03-12T16:23:08.657-07:00Thodyashya GappaHitguj, manogat aani gappa...Unknownnoreply@blogger.comBlogger21125tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-75771746488531423422018-07-31T03:58:00.000-07:002018-07-31T03:58:06.618-07:00चन्ना मेरेया .. <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
घाईघाईत सॉक्स चढवून , कपाटातुन शूज घ्यायला वळताना एकदम आठवले की कालच्या पावसात शूज चिंब भिजले आहेत. आजिबात सुकले नसतील. तरीही एकदा खात्री करावी म्हणून त्याने कपाट उघडलं. ओले चिंब शूज पाहुन फारसं आश्चर्य नाही वाटलं त्याला. मनात स्वतःशीच पावसाला शिव्या घालत त्याने सॉक्स काढून कपाटात फेकले. ती न आवडणारी तपकिरी चप्पल घातल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. चडफडत तशीच चप्पल चढवून तो निघाला.<br />
<br />
आज कधी नव्हे ते चप्पल घालून बाहेर चालल्यामुळे त्याला चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.<br />
<br />
एक चा टोल पडला घड्याळात.<br />
<div>
<br /></div>
<br />
"<i>चल रे, आज जेवायचे नाही का ?</i>" तिचा आवाज ऐकून तो एकदम भानावर आला.<br />
<br />
"<i>हो, चला. कुठे जायचे आज?</i>" उगीच काहीतरी विचारायचे म्हणून तो उत्तरला.<br />
<br />
तसे नेहमीचे ठिकाण ठरलेलं होतं . दोघंही पटकन निघाली. इकडच्या , तिकडच्या गप्पा सुरु असताना, तिचे लक्ष त्याच्या पायांकडे गेले.<br />
<br />
"<i>हे काय ? आज चप्पल अचानक ?</i>"<br />
<br />
"<i>अगं , कालच्या पावसात शूज चिंब भिजले. म्हणून .... </i>"<br />
<br />
"<i>आणि हे काय, पायाची नखं केवढी वाढवलीयस ? हाहाहा ..</i>" ती एकदम हसायला लागली.<br />
<br />
"<i>आं .. अं .. ते काय आहे ना, शूज घालतो ना नेहमी, त्यामुळे नखं काढली काय, आणि नाही काय... फरकच पडत नाही... </i>" त्याने कारण सांगितले .. पण एकदम ओशाळून गेला तो.<br />
<br />
<br />
त्याला तसे पाहून ती आणखी जोरात हसायला लागली. या क्षणी जमीन दुभंगून सीतेसारखे लपून जावं , असा वाटलं त्याला. तिचा हसण्याचा बहर ओसरला, आणि त्याने काहीतरी विषय बदलला.<br />
<br />
उसनं अवसान आणून तो उगीच म्हणाला "<i>हसून घे पाहिजे तेवढं , मला काहीही फरक पडत नाही. असाच आहे मी</i>."<br />
<br />
पण राहिलेला दिवसभर पाय लपवून बसला तो....<br />
<br />
---------------------------------------------------------------------------------------------------------------<br />
<br />
दुसऱ्या दिवशी सॉक्स चढवले, आणि शूज घेताच हात थबकला त्याचा. आज शूज एकदम क्रिस्प वाळले होते. पण काय वाटले काय ठाऊक, शूज परत तसेच ठेवले, सॉक्स काढून टाकून दिले. उशीर झाला होता. तरीही काहीतरी आठवले आणि बाथरूम कडे पळाला....<br />
<br />
"<i>चला महाराज , भूक लागली नाही का ? कि आजच सगळं काम संपवायचंय ?</i>" ती मजेत म्हणाली.<br />
त्याने घड्याळाकडे पाहिले. १ वाजले होते.<br />
<br />
"<i>चला !</i>" म्हणत घाईघाईत तो निघाला .<br />
<br />
कालच्या सारखंच , इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असताना, तिचं लक्ष परत त्याच्या पायाकडं गेलं .<br />
ती जोरजोरात हसायला लागली. कालच्यापेक्षा कितीतरी जास्त. थांबायलाच तयार नव्हती.<br />
"<i>अरे तू चप्पल घातलीस आज पण. आणि हे काय तू नखं काढलीस पायाची. ? हाहाहा ... </i>"<br />
<br />
तो जाम ओशाळून गेला होता.<br />
"<i>अगं , त्यात काय एवढं ? काढली अशीच.. आणि प्लिज गैरसमज करून घेऊ नको हां ! .. तू म्हणाली म्हणून वगैरे काही नाही काढली मी ... </i>"<br />
<br />
तो उगीच सावरासावर करू लागला. तशी ती आणखीच जास्त हसायला लागली. डोळ्यात पाणी येई पर्यंत हसली<br />
ती अगदी. त्याला काय बोलावे तेच कळेना. गप्प बसून राहिला तो...<br />
<br />
" <i>हो रे , मला माहितीय .. मी काल म्हणाले म्हणून काही नाही काढली तू नखं . तसाही</i><br />
<i>तुला काही फरक पडत नाही , तू म्हणालास ना काल ?</i> " ती उगीच त्याची समजूत काढत मिष्कीलपणाने म्हणाली.<br />
<br />
तसा अजून उखडला तो. खरे तर स्वतःवरच जास्त चिडला होता तो ...<br />
<br />
---------------------------------------------------------------------------------------------------------------<br />
<div>
<b>मेहफील में तेरी ... हम ना रहें जो.. गम तो नहीं हैं .. </b></div>
<div>
<b>क़िस्से हमारे .. नज़दीकियों के.. कम तो नहीं हैं .. </b></div>
<div>
<b>कितनी दफ़ा .. सुबह को मेरी तेरे आँगन में बैठें मैंने .. शाम किया .. </b></div>
<br />
<br /></div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-84803935788185962962017-04-08T05:41:00.001-07:002017-04-08T05:44:15.152-07:00एका लायसन्सची गोष्ट <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div>
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>थांबव रे , हेच आहे आर टी ओ ऑफिस!</i>" रव्या म्हणाला. मी करकचून ब्रेक दाबून मोटारसायकल हळूच रस्त्याच्या बाजूला थांबवली. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>तो बघ , तो शिंदे तिकडे टपरीवर थांबलाय. चल लवकर.</i>" म्हणत रव्या भराभरा चालू लागला. मीही पाठोपाठ पळालो. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">नीलम पान स्टॉल ! हजारोचा गल्ला होत असेल रोजचा ह्या पानवाल्याचा. आर टी ओ ऑफिस मध्ये काम असणारा प्रत्येकजण ह्या पानवाल्याचं गिऱ्हाईक. कुणी पान , सुपारी, सिगारेट; तर कुणी लायसन्स चे फॉर्म वगैरे घ्यायला इकडे चक्कर मारणारच! आणि, वर झाडून सगळे ऑफिसर्स , एजन्टस ह्याच्या ओळखीचे. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">माझे आणि रव्याचे इथे येण्याचे प्रयोजन म्हणजे मला माझे टू व्हिलरचे लायसन्स काढायचे होते. लर्निंग लायसन्स घेऊन सहा महिने झालेले. आणि फुल्ल लायसन्स असलेलं कधी पण बरे. रव्याच्या ओळखीचा एक एजन्ट होता शिंदे म्हणून. त्याने रव्याचे लायसन्स गेल्या वर्षीच काढून दिलेले. म्हटलं , चला आपणपण त्याच्याकडूनच काम करून घेऊ. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>नमस्कार शिंदे साहेब. हा माझा मित्र महेश. यालाच लायसन्स काढायचे आहे. </i>" रव्या हात जोडून म्हणाला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>ललनिन का पम्मम ?</i>" तोंडातलं पान सांभाळत शिंदे म्हणाला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>काय?</i>" मी वैतागून विचारले. मला त्याची सांकेतिक भाषा काही समजली नाही. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">मनातल्या मनात मला शिव्या घालत , मस्त जमलेले पान थुंकावं लागल्याचा वैताग कसाबसा लपवत , पच्चकन थुंकून शिंदे म्हणाला "<i>लर्निंग का पर्मनंट हो ? कुठलं लायसन्स काढायचंय ?</i>" कुठून आणलंय हे येडं काय माहित अश्या अविर्भावात, त्याने रव्याकडे उगीच एक कटाक्ष टाकला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>पर्मनंट !</i>" मी उत्तरलो. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>कागदपत्रं आणलीत का सगळी ?</i>" </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>होय. हि काय , सगळी आणलीयत.</i>" मी माझ्या हातातली फाईल त्याच्यासमोर धरली. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>बरं , एक गोष्ट लक्षात ठेवायची. नवीन आर टी ओ आलाय सोमवारीच बदली होवून. तेंव्हा जास्त बडबड करू नका त्याच्यासमोर! आणि दुसरी गोष्ट , टेस्ट मध्ये आपली गाडी जरा हळू चालवा. बाकी मी घेतो ऍड्जष्ट करून.</i>" </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>ओ के. गाडी चालवायची चिंता करू नका हो, मी मस्त गाडी शिकवलंय त्याला. </i>" रव्या उगीच स्वतःकडे भाव घेत म्हणाला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>चला निघू मग् . </i>" मी म्हणालो. इकडे शिंदे आपला , थोड्या वेळापुर्वी टपरी समोर टाकलेल्या पानाच्या पिचकारीने जे काही डिजाइन तयार झाले होते, त्याचं कौतुकाने निरीक्षण करण्यात मग्न होता. अचानक बाजूच्याने मारलेली फ्रेश पिचकारी त्या डिजाइन वर दिमाखाने पसरली, आणि शिंदेची तंद्री भंगली. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>चला!</i>" म्हणत शिंदे निघाला . मागे मी मी आणि रव्या पण चालू लागलो. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>काम होईल ना ?</i>" रव्या म्हणाला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>पंधरा वर्षं गेली आपली हितं मित्रा , कामाची चिंता नाही करायची. फक्त तेवढं नवीन आर टी ओ आलाय , जरा सेट व्हायला वेळ लागंल. बाकी काही नाही. निवांत राव्हा तुमी.</i>" शिंदे बढाई मारत म्हणाला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">लायसन्स डिपार्टमेंट समोर ही... लांबलचक लाईन. शिंदेने लायसन्स फॉर्म काढून भराभरा भरला. घाईघाईत मला दोन चार जागी सह्या करायला लावल्या , कागदपत्रं जोडून सरळ आर टी ओ च्या केबिन मध्ये जाऊन फॉर्म देऊन आला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"> "<i>अरे, शिंदे साहेब, तो फॉर्म एकदा पाहून घेतला असता मी, सगळी माहिती बरोबर आहे का वगैरे! इंग्लिश मध्ये आहे तो फॉर्म. </i>" मी म्हणालो.</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">शिंदेनी परत माझ्याकडे 'कुठून आलंय हे येडं' वाला कटाक्ष टाकला. म्हणाला "<i>घाबरू नका हो तुमी , पंधरा वर्षांपासून हेच काम करतोय . फॉर्म तोंडपाठ आहे माझ्या. डोळे झाकून सुद्धा भरीन वेळ आली तर.</i> " एवढं बोलून, तो त्याच्या पुढच्या गिऱ्हाईकाकडे वळला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>बरं बरं , दोन वाजता ग्राउंड मध्ये भेटू टेस्ट साठी.</i>" म्हणत मी आणि रव्या टपरी कडे सिगारेट फुंकायला वळलो. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">********************************************</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">दोन वाजता टेस्ट वगैरे सुखरूप पार पडली. आता फक्त आर टी ओ समोर जाऊन एक सही केली की मी घरी जायला मोकळा! शिंदेनी ऑफिस समोरच्या लाईन मध्ये सगळ्यात पुढे नेऊन उभे केले मला. मागची लोक तक्रार करायला लागली तर त्यांनाच दरडावून चुप्प केले त्याने. शिंदेबद्दलचा आदर माझ्या मनात अजून दुणावला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>काय नाही. आत जाऊन नाव विचारतील साहेब, आणि एक सही ठोकायची. टेन्शन नाही लाईफ मध्ये.</i>" शिंदेनी मला निर्धास्त केले. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>नेक्स्ट !</i>" आतून आवाज आला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">मी मोठ्या आत्मविश्वासाने आत एन्ट्री मारली. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>नाव?</i>"</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">मी नाव सांगितले. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>पत्ता ?</i>"</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">पिनकोड सहीत पत्ता सांगितला मी. आणि सही ठोकण्यासाठी खिशातल्या पेन काढायच्या तयारीत उभा राहिलो.</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>काय डोळ्याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?</i>" समोरून काळजीच्या सुरात प्रश्न आला . </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">अगदी अनपेक्षित प्रश्न होता. मला काहीच कळायला तयार नाही. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>मला कळले नाही साहेब . माझ्या डोळ्यांबद्दल विचारताय का?</i>"</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>फॉर्म कोण तुम्हीच भरलाय ना ?</i>"</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">मी गप्प . </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>इथे</i> Does the applicant suffer from any defect of vision? <i>पुढे</i> yes <i>लिहिलं आहे तुम्ही.</i>"</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">माझी वाचाच बंद. </span></div>
<div style="text-align: left;">
<i><span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"अहो तुम्हीच भरलाय ना फॉर्म ? तुमचीच सही आहे ना ही ?"</span></i></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><i>"हो साहेब, पण फॉर्म एजन्ट नि भरलाय."</i> मी अपराधी सुरात म्हणालो. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>अहो पण तुमच्यासारखी शिकली सावरलेली लोकं पण ना बघता असे फॉर्म साईन करायला लागली तर काय होईल ह्या देशाचं ?</i>"</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">मी गप्पंच. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"माझ्याकडे पेन फेकत साहेब म्हणाले. " <i>ते करेक्ट करा !</i>"</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">मी गप्पकन पेन पकडला आणि करेक्शन केले. अजून एकदा सगळा फॉर्म वाचून चुका नसल्याची खात्री केली. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>सॉरी साहेब . खरंच चूक झाली . थँक यु</i>" - इति मी .</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>सगळा सावळा गोंधळ चाललाय इथे. मी बघतोय जॉईन झाल्यापासून. मी सगळ्यांना सरळ करणार आहे. </i>" स्वतःशीच बोलत मला सही करण्यासाठी त्यांनी खुणावले. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">पट्कन सही करून मी बाहेर धूम ठोकली. शिंदे आणि रव्या बाहेर थांबले होतेच. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>झाली का सही? येईल एखाद्या महिन्यात लायसन्स तुमचं. जावा आता घरी. </i>" शिंदेनी ग्वाही दिली. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">मी काही बोलणार तेवढयात शिंदेंना आतून बोलावणं आलं. पाच मिनिटांनी अगदी पडीक चेहरा करून शिंदे केबिन बाहेर आला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>घोळ झाला राव. साहेबांनी एकदम पाचर ठोकली.</i>" शिंदे आमच्याकडे येत म्हणाला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>ह्याच फॉर्म वर पंधरा वर्षे लायसन्स दिले सगळ्यांनी. पहिला आर टी ओ आहे ज्याने चूक पकडली.</i>" कौतुकवजा सुरात तो म्हणाला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>म्हणजे? तुम्हाला फॉर्म वर काय प्रश्न आहेत हे पण माहित नाही?</i>" चकीत होऊन मी विचारलं. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>नाही हो . एवढं इंग्रजी येत असतं तर हितं झक मारली असती का? असंच कुणीतरी कधीतरी भरलेला स्टॅण्डर्ड फॉर्म . तोच सगळ्यांना वापरतो आमी. आता हे असं काय होईल आम्हाला कधी माहितीच नव्हतं.</i>" शिंदे बोलला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><i>"धन्य आहे! बरं, नाव तरी बदलता अर्जदाराचे !"</i> म्हणत मी शिंदेसमोर हात जोडले. शिंदेचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>निघतो आम्ही आता!</i>" म्हणून मी आणि रव्याने शिंदेचा निरोप घेतला. आमचे पाय परत नीलम पण स्टॉल कडे वळले. सिगारेटची तल्लफ़ आणि मगाशीच्या केबिन मधल्या घटनेबद्दल रव्याची उत्सुकता , दोन्ही उतावीळ झाले होते. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">*********************************************</span><br />
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">सिगारेट संपवून आम्ही गाडीवर स्वार होणारच तेवढ्यात शिंदे आणि चार पाचजणं धावतच आमच्या दिशेनी आली. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>एक मिनिट , जरा थांबा!</i>" शिंदे दुरूनच ओरडला. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हटलं आता अजून काय प्रॉब्लेम झाला च्यायला!</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>ते जरा फॉर्म मधल्या सगळ्या प्रश्नाचे बरोबर उत्तरं लिहून द्या कि जरा. लई मदत होईल.</i>" शिंदे म्हणाला. त्यांच्यासोबतच्या चार पाच माना पण शिंदेच्या समर्थनात होकारार्थी डोलल्या. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>अहो ती काय प्रश्नपत्रिका आहे का , कि स्टॅंडर्ड उत्तरं असतील?</i>" मी डोक्यावर हात मारत म्हणालो. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">"<i>अहो , तुमी चिंता नका करू त्याची. सगळी इंग्रजी प्रश्न वाचा आणि आम्हाला अर्थ सांगा. आम्ही लिहितो उत्तरं त्याची. </i>" शिंदे त्याची नवीन स्टॅंडर्ड उत्तरपत्रिका बनवणार होता. </span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">मी त्यांना घेऊन टपरीसमोरच्या कट्टयावर बसलो , आणि एक एक प्रश्न मराठीत समजावून सांगायला लागलो. आणि सगळीजण मराठी भाषांतर लिहून घ्यायला लागली. निघताना सगळयांनी आग्रहाने आम्हाला परत एकेक सिगारेट पाजली. ती सगळी मंडळी , आम्ही दिसेनासे होईपर्यंत कृतज्ञ नजरेने आमच्याकडे पाहत होती.</span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;"><br /></span></div>
<div style="text-align: left;">
<span style="font-family: Times, Times New Roman, serif;">आज या घटनेला झाली असतील २० वर्षं ! आज लायसन्स काढून पहिले आणि सगळी कथा आठवली. दुर्दैवाने लायसन्स एक्स्पायर झाले आहे . नूतनीकरण करण्यासाठी बहुतेक परत आर टी ओ ऑफिस मध्ये चक्कर मारावी लागेलच. शिंदेला शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आता पस्तीस वर्षाचा अनुभव झाला असेल त्याला. आशा आहे कि लायसन्स फॉर्म वर नवीन प्रश्न आले नसावेत. किंबहुना , फॉर्मच सगळा मराठी मध्ये आला असेल , जेणेकरून इंग्लिश ना येणाऱ्या लोकांची अडचण होणार नाही . सगळं बदललं असेल... अब कि बार ... </span></div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-2716566807160950912015-02-18T08:10:00.001-08:002015-02-18T08:10:32.169-08:00एकमेव!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div>
इंटरनेट वर ब्राउजिंग करून कंटाळा आला होता. बाराला पाच कमी होते. लाईट ऑफ केली, आयपॅड चार्जिंगला लावला आणि बेडरूम कडे वळलो. तेवढ्यात फोन वर मेसेज टोन वाजला. रव्याचा परत एखादा Valentine day बद्दल रटाळ जोक असेल, उद्या वाचू असा विचार करतानाच, दोन चार नवीन मेसेजची रिंग वाजली. न राहवून मी फोन हातात घेतला. पाहतो तर मनोज ने नवीन ग्रुप तयार केलेला "WeWontGiveItBack". त्याच्यावर बरेच मेसेज आलेले. निमित्त होतं, इन्डिया-पाकिस्तान वर्ल्ड कप मैचचं. उद्या मनोजच्या घरी मैच पाहायला यायचं आमंत्रण होतं. चार पाच मित्रं, सोबत अनलिमिटेड बीअर, चिकन , छोले असा मस्त बेत. बराच विचार करून मी एक मेसेज टाकला " हो , मी येईन" असा.<br />
<br />
झोपताना विचार करत होतो. जवळपास तीन वर्षं झाली क्रिकेट बघुन. आताच्या टीममध्ये कोण कोण आहे त्याचीही काही कल्पना नव्हती. साला, एक वेळ अशी होती जीवनात की जेंव्हा वर्ल्ड कपचं शेड्युल सुद्धा तोंडपाठ असायचं. काळ सगळं कसं बदलून टाकतो, नाही का ? असो, बऱ्याच दिवसांनी मैच बघायची, ते पण इन्डिया-पाकिस्तान वर्ल्ड कप! मजा येईल बहुतेक असा विचार केला. आणि तसंही फेसाळत्या बीअरचं मन आपल्याच्याने नाही मोडवत बुवा !<br />
<br />
बरोबर साडे अकराला मनोज कडे पोचलो. मैच वेळेवर सुरु झाली. काही इंटरेस्ट, मजा मात्र येईना. वाटले पॉवर प्ले वगैरे मध्ये थोडे एन्टरटेनिंग असेल. पण नाही हो! पन्नास ओवर संपल्या. फ्रीज मधल्या बीअर, कढईतले चिकन पण संपत आले होते. पाकिस्तानची इनिंग पण सुरु झाली. तिसाव्या ओवर पर्यंत तर इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब पण झाले. बाकीचे सगळेजण फार एक्सायटेड होते. प्रत्येक बॉलला टाळ्या /शिट्ट्या पडत होत्या. मला मात्र एखादा रटाळ आर्ट पिक्चर पाहिल्यासारखे वाटत होते. मग मात्र मी तिथून निघायचे ठरवले. मित्रांनीही थांबायचा जास्त आग्रह केला नाही. त्यांनाही जाणवले असेल बहुतेक कि मी जाम बोअर होतोय.<br />
<br />
घरी येताना, एका मित्राचा मेसेज आला , इंडियानं मैच जिंकली म्हणून. मेसेजेसचा अविरत वर्षाव सुरु झाला. ईंडीयन टीमचं अभिनंदन पासून ते आफ्रिदीला घातलेल्या इथे लिहिता न याव्यात अशा शिव्या! मग फोन थोडा वेळ बंद करून विचार करायला लागलो, च्यायला झालंय तरी काय आपल्याला? असं का होतंय ? आधी, भारताने झिम्बाब्वेला हरवले, तरी धिंगाणा घालायचो, सेलीब्रेट करून. एक ना एक बॉल भक्तीभावाने पाहायचो टीवीवर. आणि आज अजिबात आनंद होत नाहीये. खरं तर काही फरकच पडत नाहीये आपल्याला. काय बदललं आहे बरं, तेव्हा आणि आत्ताच्या परिस्थिती मध्ये? <br />
<br />
आणि अचानक एका क्षणात मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली. म्हणजे एकंच उत्तर होतं - "सचिन तेंडूलकर!". मैदानात त्याला फलंदाजीला उतरताना पाहिलं की, देवदर्शन झाल्याचं फिलिंग यायचं. उगीच अंगावर मुठभर मास चढायचं. आपसूक तोंडातनं शीळ आणि हातांमधनं टाळ्या बाहेर पडायच्या. त्याला प्रत्येक बॉल खेळताना छातीत उगाच धडधड वाढायची. एखादा खराब शॉट खेळला तर जीव घशात यायचा. चौकार-षटकार मारताना पाहून डोळ्याचे पारणं फिटायचं! गांगुली कितीही फॉर्म मध्ये असला आणि कितीही फटकेबाजी करत असला तरी त्याला शिव्या घालायचो सचिनला स्ट्राईक देत नाही म्हणून. मग सचिनने बाकीचे सगळे बॉल रन्स न काढता घालवले तरी. माझ्यासाठी खरं म्हणजे एकंच सत्य होतं - "क्रिकेट म्हणजे सचिन, आणि सचिन म्हणजे क्रिकेट". आणि ते वेड सचिन सोबतच संपलं कदाचित. त्या देवाचे कोटी कोटी आभार, की त्याने या कालखंडात मला जन्माला घातलं, जेव्हा सचिन क्रिकेट खेळत होता. जीवनातले जादुई दिवस दिले सचिनने खरंच. दुसऱ्या कशालाच त्याची सर नाही येणार. असो, याला कोणी शुद्ध वेडेपणा म्हणू कि काही म्हणो. आपल्यासाठी तेच खरं आहे बाबा. आणि नो रिग्रेट्स!<br />
<br />
क्रिकेटच काय, तर जीवनात प्रत्येक बाबतीत/गोष्टीत आपला असाच एखादा एकमेव सचिन असतो. त्या गोष्टीचं अस्तित्व फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्या असण्यामुळे असतं, नाही का? पण आपल्याला उमजत नाही. त्या व्यक्तींच्या नसण्यामुळे थिंग्ज आर नॉट जस्ट द सेम. पण कधी कधी ते समजेपर्यंत फार उशीर झालेला असतो. खरंच एकमेव असतात काही जण !<br />
<br />
असो , क्रिकेट माझ्यासाठी तर दोन भागात विभागलेलं आहे. सचिन खेळत असताना आणि सचिन रिटायर झाल्यानंतर. दुसरा भाग खरच मैटर नाही करत. मग फेसाळणाऱ्या बिअरचं मन तुटलं तरी चालेल! आजच मनोजचा मेसेज आला , संडेला इंडिया - साउथ आफ्रिका मैच. नवीन मेन्यु वगैरे. शांतपणे वोट्स-एप च्या त्या ग्रुप मधनं बाहेर पडलो आणि आय पॅड हातात घेऊन यु ट्यूब वर पॉज केलेला शारजाच्या थंडरस्टोर्म मैचच्या हाय लाईट्सचा विडीओ रीज्युम केला. आणि काय आश्चर्य बघा , संडेला कुठेतरी आत दडून बसलेली ती शीळ आत्ता तोंडातून आपसूक बाहेर पडली. अगदी आधीसारखी!!! </div></div></div></div>Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-88808766823490431902015-01-27T07:57:00.002-08:002015-01-27T15:20:34.144-08:00वक्त ने किया...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div>
<i>"सहाला पाच कमी आहेत, आणि अजून इथेच आपण. शार्प साडे सातला सगळे येतील. आपण काय पार्टी संपल्यावर पोचायचे का? आटप तुझी रंग रंगोटी लवकर."</i> शौमिकचा पारा थोडा चढला होता.<br />
<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>का रे असं घालून पाडून बोलतोस नेहमी. नेहमी बघावं तेंव्हा वैतागलेला! पाच दहा मिनिटं इकडे तिकडे झाली तर काय जातं तुझं? अंघोळीला गेला होतास आत्ता , अर्धा तास बाहेर नाही आलास. भसाड्या आवाजात जोरजोरात गाणी म्हणत बसला होतास. तेंव्हा नाही झालं का वेळेचं भान? "</i> ओठ दुमडून लिपस्टिक नीट करत , आरशात बघत नताशा करड्या स्वरात उत्तरली.<br />
<br />
<i>"भसाडा आवाज ? लग्नाआधी , ह्याच आवाजात तासंतास गाणी ऐकायचीस माझ्याकडून. जाऊ दे, आणि पावणे पाचला निघायचं ठरलं होतं ना आपलं? मी शूज घालून तयार होतो पावणे पाचला. गेली दहा मिनिटं ताटकळत ठेवलंयस तू. "</i><br />
<i><br /></i>
<i>"तुझं काय रे , स्वतःच आटपलं कि झालं. परीचं कोण आवरणार? मलाच करावं लागत ना सगळं? म्हणे पावणे पाचला तयार होतो. आणि ठीक आहे, दहा मिनिटं वाट पहिली कधीतरी तर एवढं काय आकाश कोसळलं म्हणते मी? कॉलेज मध्ये असताना , तासंतास माझी घराबाहेर निघण्याची वाट बघत असायचा ना तू , खालच्या दुकानासमोर बसून ?"</i><br />
<i><br /></i>
<i>"आता जुन्या गोष्टी उगाळत बसू नकोस उगीच. चूक कबूल करायची सोडून नेहमी आपलं काहीतरी विषयांतर करायचं, झालं!"</i><br />
<i><br /></i>
<i>"हे बघ मलाही फारसा इंटरेस्ट नाहीये जुन्या गोष्टींमध्ये, पण सुरुवात तू केलीस म्हणून मीही आठवण करून दिली."</i><span style="font-style: normal;"> लालचुटुक साडीवर मैचींग पर्स शोधत नताशा म्हणाली.</span><br />
<span style="font-style: normal;"><br /></span>
<i>"परी, बेटा तो मिकी माऊसचा मास्क काढ पाहू! आपण पार्टी ला जातोय ना? मम्मानी एवढं छान सजवलंय तुला. आणि तुझी ती स्टारवाली टिकली कशी दिसणार सगळ्यांना, तू मास्क घातला तर?"</i><br />
<div style="font-style: normal;">
परीने मोठ्या समजूतदारीने मास्क काढून टेबलावर ठेवला. बाबांचं बोट धरून ती घराबाहेर पडली.</div>
<div style="font-style: normal;">
गाडीत बसल्यावर शौमिकने जगजीत सिंघ चं "मरासिम" लावलं. गाडीने वेग पकडला आणि हायवे ला लागली.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<i>"नेहमी काय हि रडकी गाणी! सदा न कदा ही एकच सीडी लावलेली असते. एक तरी बंद कर , नाही तर रेडीओ ऑन कर. "</i><br />
<i><br /></i>
<span style="font-style: normal;">शौमिक काहीच बोलला नाही. फक्त गाडीचा वेग वाढवला आणि उगीच समोरच्या कारवर खेकसला.</span><i> " साले, ईंडीकेटर क्यो ऑन रखा है , अगर टर्न नही लेना है तो? बाप का रोड है ना ? करो जो मर्जी है!"</i><br />
<i><br /></i>
<span style="font-style: normal;">"</span><i>शेवटचा टोला माझ्यासाठी होता वाटतं ! </i>" पुटपुटत नताशाने रेडीओ मिर्ची लावले.<br />
<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>हे बघ , उगाच भांडणं उकरून काढू नकोस. तुला काही बोललो का मी? मग काय प्रोब्लेम आहे?"</i><br />
<i><br /></i>
<i>"तोच तर प्रोब्लेम आहे रे शौमिक, मला काही बोलतच नाहीस तू!"</i><br />
<i><br /></i>
<i>"तुझ्यापर्यंत पोचत असेल तर बोलू ना ! नुसतं कानांनी ऐकणे म्हणजे ऐकणे नसते, नताशा. हृदयापर्यंत झिरपले पाहिजे. "</i><br />
<i><br /></i>
<br />
<div style="font-style: normal;">
दोघंही शांत झाली.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>ट्राफिक से परेशान! टेन्शन मत लिजिये दोस्तो, आप सबका चहेता आर जे मोहित आपके लिये लाया है एक सदाबहार नगमा.</i> " रेडीओ मिर्ची वरचा आर जे किंचाळत होता.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>वक्त ने किया क्या हसीन सितम, तुम रहे ना तुम , हम रहे ना हम… </i>" गीता दत्त गायला लागली.<br />
<div style="font-style: normal;">
डोळ्यातले अश्रू लपवत नताशा खिडकीबाहेर पाहू लागली. शौमिकने सिगारेट बाहेर काढली. गाडीतले परीचे अस्तित्व जाणवून परत ठेवून टाकली.</div>
<div style="font-style: normal;">
थोड्या वेळाने , काहीतरी बोलायचं म्हणून नताशा म्हणाली </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<i>"रणजीत जाम खुश होता. पार्टीचे आमंत्रण देताना म्हणाला, हीनाला आज काहीतरी सरप्राईज गिफ्ट देणार आहे. मैकबुक ओर्डर केलंय म्हणे ते मागच्या आठवड्यात रिलीज झालेलं. भारी आहे तो एकदम , सरप्राइज गिफ्ट वगैरे!"</i><br />
<i><br /></i>
<i>"हीना पण काही कमी नाहीये. ती पण अशाच भेटींचा वर्षाव करते त्याच्यावर."</i><span style="font-style: normal;"> शौमिक म्हणाला.</span><br />
<span style="font-style: normal;"><br /></span>
<span style="font-style: normal;">"</span><i>शौमिक, माझ्या भेटींचे काहीच महत्व नाहीये न तुला? दोन महिने वेळ काढून स्वेटर विणला रे तुझ्यासाठी. कोरडेपणाने नुसता म्हणालास हो चांगला आहे, थैक्स! एकदा सुद्धा बाहेर पडताना नाही घातलास रे."</i><br />
<i><br /></i>
<i>"हे बघ मला नाही तो रंग आवडत. आणि ऑफिस मध्ये थोडा भडक वाटेल. "</i><br />
<i><br /></i>
<i>"मग आज घालायचास ना? मला किती बरं वाटलं असतं. "</i><br />
<i><br /></i>
<span style="font-style: normal;">"</span><i>It's always about you ! मला शेवटचं कधी बरं वाटू दिलंस तू , लक्षात आहे का तुझ्या? गेल्या आठवड्यात तुला सरप्राईज म्हणून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन घरी आलो. आणि तू काय म्हणालीस? आज माझी पार्टी आहे मैत्रिणीसोबत, तू जेवून घे , आणि ग्रोसरिज घेऊन ये, संध्याकाळी! मला वाटलं होतं आपण दोघे कुठेतरी फिरायला जावं , थोडा वेळ घालवावा एकमेकांसोबत. "</i><br />
<i><br /></i>
<i>"अरे पण त्या पार्टी ला परी च्या टीचर पण येणार होत्या. आपल्या परीबद्द्ल त्यांच्याशी बोलायचं पण होतं. म्हणूनच तर मी गेले ना? आणि तू कधी करतोस का रे कॅन्सिल एखादी पार्टी माझ्यासाठी?"</i><br />
<i><br /></i>
<i>"हे बघ तुझी आणि माझी गोष्ट वेगळी आहे. माझं प्रमोशन ड्यू आहे तीन महिन्यांनी. गेल्या वर्षभर केलेल्या कामावर पाणी फेरू का? माझी नोकरीच तशी आहे, पार्टीज वगैरे ला जाणं भाग आहे. आणि परीचा विचार तू एकटीच नाही करत. पुढच्या वर्षी त्या इंटरनेशनल स्कूल ची फी किती असेल माहितेय न तुला?"</i><br />
<i><br /></i>
<br />
<div style="font-style: normal;">
परत गाडीत ती अवघडलेली , निरव शांतता पसरली. गाडी थोड्या वेळातच मैरिओट च्या पोर्च मध्ये पोचली.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>सात पंचवीस झालेत म्हटलं. पाच मिनिटं आधीच पोचलो ठरवल्यापेक्षा."</i><br />
<i><br /></i>
<i>"मी वाटच बघत होतो ह्या वाक्याची."</i><br />
<i><br /></i>
<i>"सॉरी तर तू म्हणणार नाहीयेस , मीच समजून घेते कि तू म्हणाला असशी…. "</i><br />
<i><br /></i>
<i>"चल, फंक्शन रूम मध्ये जाऊया आपण. नाहीतर असं करा तुम्ही दोघी व्हा पुढं. मी येतोच मागनं</i><span style="font-style: normal;">" नताशा ला अर्धवट तोडत शौमिक म्हणाला.</span><br />
<span style="font-style: normal;"><br /></span>
<i>"सिगारेट फुंकायची असेल, दुसरं काय?</i><span style="font-style: normal;">" म्हणत परीचा हात धरून नताशा लिफ्ट कडे वळली.</span><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
*******************************************************************</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>कसलं सॉलिड कपल आहे ना शौमिक आणि नताशा. धम्माल लोकं आहेत एकदम! फुल्ल ऑफ लाईफ !"</i> रणजीत कारला वेग देत म्हणाला.<br />
<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>हो ना, पार्टी मध्ये जान आली त्यांच्यामुळे. शौमिक चा सेन्स ऑफ ह्युमर भन्नाट आहे. आणि नताशा त्याचा वरचढ. एकमेकांना कोम्प्लीमेंट करतात दोघे. एक दुजे के लिये आहेत एकदम.</i>" हीनाने होकार दिला.<br />
<br />
<span style="font-style: normal;">"ग</span><i>ळ्यात गळा घालून होती पार्टी मध्ये पूर्ण वेळ. नताशा म्हणत होती की आजीबात करमत नाही शौमिक ला तिच्याशिवाय. महिन्यातून चारदा तरी सुट्टी घेऊन घरी बसतो. भरपूर फिरतात म्हणे दोघेही. "</i><br />
<i><br /></i>
<i>"शौमिक पण बोलला मला, म्हणे नताशा नेहमी फुलासारखं जपते त्याच्या मनाला. वाईट वाटेल त्याला असं कधीही बोलत नाही. म्हणाला फक्त बायकोच नाही तर त्याआधी एकदम चांगली मैत्रीण आहे ती."</i><br />
<i><br /></i>
<i>"आणि काय रे रणजीत, एक रोजेस चा बुके आणायला सांगितला होता मी तुला साधा, विसरलास ना ?"</i><br />
<i><br /></i>
<i>"अगं पण एवढी कामं होती मला, मित्रांना बोलावणे, पार्टी एरेंज करणे. विसरून गेलो असेल. तू कटकट नकोस सुरु करू"</i><br />
<i><br /></i>
<i>"कटकट ? अरे आजच्या दिवस तरी नीट बोल ! जाउदे मला सगळं माहितीय, पण तुला माहितीय न मला रोजेस किती आवडतात. प्रत्येक एनीवर्सरीला तू आणतोस ना फुलं माझ्यासाठी. आजकाल काय झालंय काय माहिती तुला. सगळा वेळ ती पार्टी एरेंज करणे, मित्र आणि दारू !"</i><br />
<i><br /></i>
<span style="font-style: normal;">"</span><i>काय म्हणतेस हीना, हे काय माझ्या एकट्यासाठी केले का मी ? तुला ना मी काहीही करो , महत्त्वच नाही कशाचं"</i><br />
<i><br /></i>
<i>"पैसे उडवणे म्हणजेच सगळं सुख आनंद असतो का रे?"</i><br />
<i><br /></i>
<span style="font-style: normal;">"</span><i>हे बघ तू फिल्मी होवू नकोस. तू एकदम मला विलन वगैरे असल्यासारखे फिलिंग द्यायला लागली आहेस. तुझ्याकडे सुद्धा आजिबात वेळ नसतो माझ्यासाठी. एखादा बुके विसरलो तर एवढं ओवररीएक्ट करायची गरज नाहीये. आणि मैक बुक कडे ढुंकून सुद्धा नाही पाहिलंस तू!"</i><br />
<i><br /></i>
<i>"मला नकोयत रे त्या सगळ्या एलेकट्रोनिक गोष्टी. जीवनाला जळू सारख्या चिकटून बसल्या आहेत त्या. सगळा मोकळा वेळ कसा अधाशासारख्या शोषून घेत आहेत. शुष्क बनवून टाकलंय त्यांनी जीवन"</i><br />
<i><br /></i>
<span style="font-style: normal;">"</span><i>याच साठी केला अट्टाहास ! धन्यवाद हीना , खूप बरं वाटलं हे ऐकून. तुला काही कल्पना आहे किती वेळ , एनर्जी खर्ची घातलीय मी त्या मैकबुक साठी. गेला महिना भर झालं झटतोय तुला आज ते गिफ्ट करता यावं म्हणून. एका वाक्यात तू त्या सगळ्याची बेकिंमत केलीस. "</i><br />
<i><br /></i>
<br />
<div style="font-style: normal;">
गाडी रस्त्यावर दौडतच होती. दोघेही मौन व्रत असल्यासारखी गप्प झाली होती. कुणालाही माघार घ्यायची नव्हती. स्वतः होऊन पुढच्याची समजूत काढायची नव्हती.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"कॉ</span><i>म्प्लेक्स येतो मला त्या शौमिक ला आणि नताशा ला बघून. आपण का नाही राहिलो आहेत तसे ? सगळं एवढं का बदललं आहे ? What really went wrong ? आधी सारखं काहीच नाही राहिलंय. " </i><br />
<i><br /></i>
<i>"सगळं आधीसारखंच आहे रणजीत , बदलला फक्त तू आहेस………. आणि कदाचित मी पण !"</i><span style="font-style: normal;"> हीना ने डोळे मिटून घेतले. </span><br />
<div style="font-style: normal;">
*******************************************************************</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
घरी पोचेपर्यंत परी कार मध्येच झोपी गेली होती. तिला बेडवर टाकून शौमिकने तिच्या अंगावर चादर टाकली. फ्रेश होऊन एक स्कॉचचा पेग बनवून बाल्कनीत जाऊन बसला. थोड्या वेळाने नताशा पण ग्लासात थोडीशी वाइन घेऊन त्याच्या शेजारी येवून बसली. बराच वेळ निशब्दपणे दोघेही तसेच बसून होते.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>खरंच सगळं किती बदललं आहे ना शोमु? आधी बोलायला लागलो कि थांबायचो नाही आपण. आणि आता विषयच सापडत नाही बोलायला. "</i><br />
<i><br /></i>
<i>"भांडायला सापडतात भरपूर."</i><span style="font-style: normal;"> स्कॉचचा जळजळीत घोट घशाखाली ढकलत शौमिक म्हणाला.</span><br />
<span style="font-style: normal;"><br /></span>
<span style="font-style: normal;">"</span><i>माहित नाही काय झालंय. आणि कशाची कमी आहे. सगळं आहे आपल्याकडे. फक्त माझ्याकडे तू आणि तुझ्याकडे मी नाही राहिलेय."</i><br />
<i><br /></i>
<i>"मी कधीच स्वतः हून नाही निघून गेलो तुझ्यापासून , तूच दूर केलंस मला नताशा."</i><br />
<i><br /></i>
<i>"तू काहीही म्हण रे , परिणाम एकच ना शेवटी त्याचा. "</i><br />
<i><br /></i>
<i>"परत सगळं आधीसारखे नाही होऊ शकणार का रे?"</i><br />
<i><br /></i>
<br />
<div style="font-style: normal;">
गप्प बसून तो स्कॉच रिचवित राहिला. बऱ्याच वेळानी त्याने तोंड उघडले</div>
<i>"हे बघ … मला असं वाटत…. "</i><br />
<i><br /></i>
<i>"अर्रे सॉरी शौमिक. मी विसरलेच. उद्या पाच वाजता उठायचं आहे मला. परी ची ट्रीप चाललीय न उद्या ! सॉरी , पण उद्या नक्की बोलू."</i><span style="font-style: normal;"> म्हणून नताशा आत पळाली.</span><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
बदलले काहीच नव्हते. सगळं जशास तसे आहे. बदलली आहेत ती फक्त माणसं. त्यांची स्वप्नं. स्वतःकडे जे नाहीये ते मिळवण्याची धडपड. ते मिळवण्यासाठी सुरु झालेला पैशांचा अनंत, न थांबणारा पाठलाग. त्यातून येणारे ताण , त्या ताण तणावानी बोथट केलेल्या सगळ्या भावना. नाती टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची गरज आहे ते म्हणजे एकमेकांसाठी दिलेला वेळ. या सगळ्या गोंधळात , वेळ शोधायचा कुठून?</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
दोन पेग संपवून शौमिक बेडरूम मध्ये पोचला. नताशा आणि परी गाढ झोपल्या होत्या. तोही आडवा झाला.</div>
<div style="font-style: normal;">
पाहिलं तर , बाजूच्या टेबलवर परी चा मिकी माऊस चा मास्क पडला होता. मनात विचार केला त्याने , आज पार्टी ला जाताना परीला तिचा मास्क सोबत नाही घेऊ दिला आपण. पण आपण दोघे मात्र आपापले मास्क्स घालून गेलो. असो, जपून ठेवले पाहिजेत, पुढच्या पार्टी मध्ये परत गरज पडेल त्यांची कदाचित !</div>
<div style="font-style: normal;">
******************************************************************</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
</div>
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-73812060128959588222014-12-23T05:47:00.001-08:002015-01-13T06:09:36.155-08:00असंच सुचलं म्हणून !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div style="font-style: normal;">
बरसणाऱ्या पावसाला पाहुन तुम्ही मनातनं भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका, हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत. पण अजूनही वेळ गेली नाहीये. बाहेर धो धो पाऊस बरसतोय, तो नेहमीसाठी असणार नाहीये. भिरकावून द्या ती छत्री आणि रेनकोट! आणि भिजून चिंब व्हा. ताण तणावाने काळवंडलेल्या, अदृश्य सुरकुतत्यांमागे लपत चाललेल्या चेहऱ्यावर झेला ते चमकते तुषार. गात्रागात्रामध्ये भिनू द्या तो थंडावा. निराशेची, असमाधानाची , काळजीची आवरणे वाहवून जाऊ द्या त्या ठिबकत्या अमृतात. चाखून पहा ती अवीट गोडी निर्मळ पाण्याची. पायातले ते पाश तोडून टाका. खोटे मुखवटे फाडून फेकून द्या. बेधुंद होऊन निरागस लहान मुलांसारखे नाचा. नाचताना तुमच्याकडे रोखलेल्या, कुत्सित हसणाऱ्या त्या नजरांची कीव करा. आयुष्याचा हा महोत्सव बेभानपणे साजरा करा.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhXOkJDRuSr8QkrsUWsDe09kXliEngIdypazJpebYjpXKf3_JxfjcDhaTcR1r9OAgbg9BNStwhOO_8cWvtc3XV8QyCrO0HKSdlpYZ-axRf94f1w0RCJlccWhyphenhyphen_7ia6bw3LRlXE55htSeiqZ/s1600/rain.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhXOkJDRuSr8QkrsUWsDe09kXliEngIdypazJpebYjpXKf3_JxfjcDhaTcR1r9OAgbg9BNStwhOO_8cWvtc3XV8QyCrO0HKSdlpYZ-axRf94f1w0RCJlccWhyphenhyphen_7ia6bw3LRlXE55htSeiqZ/s1600/rain.jpg" height="170" width="320" /></a></div>
ढगांकडून गडगडाटी हसणं शिका. विजेकडून तिचं लखलखणं शिकून घ्या. डोळे दिपून जातील सगळ्यांचे ,असं जगा. वाहत्या खळखळत्या पाण्याचा झरा व्हा, डबक्यासारखे साचून राहू नका. मनातलं साचलेलं सगळं वाहू द्या त्या झऱ्यासारखं. भन्नाट वाऱ्यावर मनाला डुलू द्या. त्याच्यासारखं गतिमान व्हा, आणि वेळ आली तर हळुवार फुंकर बनायला हि मागे पुढे बघू नका. ओल्या मातीचा गंध भरभरून लुटा. श्वासांमध्ये साठवून ठेवा त्याला. आयुष्यभर पुरणार तर नाहीचये तो गंध. पण हा क्षण सुद्धा परत नाही येणार आहे. हा पाउस पण नेहमीसाठी असाच मेहेरबान नसणार आहे. भिजणं रोज उद्यावर टाकत राहिलात तर एक दिवस तो उद्याचा दिवस पण नसणार आहे.<br />
चिंब व्हा !!!</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-78830191550658824422014-12-07T05:12:00.001-08:002015-01-13T06:09:36.158-08:00देवाघरची फुलं !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div style="font-style: normal;">
आपल्या चमकत्या निळ्या शर्टाची झोळी करून त्यात एवढी मोठी हिरवी-नारंगी काशिबोरं कशीबशी सांभाळत तो माझ्याकडे आला.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<i>"भैय्या , हे बगा काशिबोरं आणल्यायात तुमच्यासाठी. आवडतेत का तुमाला?"</i><br />
<i>"अरे व्वा ! का नाही? खूप आवडतात मला. धन्यवाद. " </i><span style="font-style: normal;">म्हणून मी हातातली कॅरीबैग त्याच्यासमोर धरली. मोठ्या उत्साहाने शर्टातली सगळी बोरं त्यात उपडी केली.</span><br />
<i>"तुमच्या देशात मिळत्यात का हो बोरं ? नसतील तर हिकडून घेऊन जावा. पायजेल तेवढी हायत आमच्या बागेत."</i><br />
<i>"नाही रे आमच्याकडे कुठली मिळायला एवढी छान बोरं. पण आत्तापुरती एवढी बास झाली. "</i><br />
<i><br /></i>
<br />
<div style="font-style: normal;">
ते निरागस , मधाळ स्मित परत त्याच्या चेहऱ्यावर चमकले. फारच गोड पोरगा होता तो. फार झालं तर ७-८ वर्षाचा असेल.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>हातात काय घातलंयस रे ते. चमकतंय कसलं बघ ना !"</i> मी विचारलं.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>हे व्हय ? सलमान खान ची फ़ैशन हाय. तेनं पण असलंच घालतोय कि हातात. वौन्टएड म्हणून एक पिक्चर हाय बगा त्याचा. "</i><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>बरं बरं, एकदम सही! मी तरीच आल्यापासून विचार करतोय तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतेय. आत्ता आले लक्षात , सलमान खान सारखा दिसतोस एकदम तू.</i>"<br />
<br />
मी त्याला उगाच म्हणालो. तसं पाहायला गेलं तर सलमान खान नावाचा मनुष्य काय घालतो आणि काय करतो त्याच्याशी माझं काही एक देणं घेणं नाही. पण एवढ्या गोड पोराला दुखावणं मला जमलं नसतं. अगदी लाजून गेला तो. काय बोलावे ते कळेना त्याला. उगीच इकडे तिकडे बघायला लागला. त्याचा अवघडलेपणा कमी करावा म्हणून मी उगीच विषयांतर केले.<br />
<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>इकडे कधी आला तू?"</i><br />
<i>"म्हागल्या वर्षी. मी आन माझी बहिण, ती तिकडं थांबल्याय बगा .</i><span style="font-style: normal;">" बाजूला एका गोठ्यात गाईला गोंजारत असलेल्या एका ५-६ वर्षाच्या मुलीकडे बोट दाखवून म्हणाला तो.</span><br />
<i>"कुठून आलात तुम्ही दोघं ?"</i><br />
<i>"परभणीला एक होस्टेल होतं. बंद पडलं गेल्या वर्षी, तवा तिकडचे सगळेजण हिकडं आलो."</i><br />
<i>"आणि परभणीच्या होस्टेल मध्ये कोण आणून सोडलं तुम्हा दोघांना ?"</i><br />
<i>"पोलिसांनी!"</i><br />
<i>"काय , ते कसे काय ?"</i><br />
<i>"नदीत सोडलं होतं म्हनं आमच्या आई बापानी लहान असताना आमाला. पोलिसांना सापडलो, आणि तेनी परभणी ला आणून सोडलं आमाला."</i><br />
<div style="font-style: normal;">
खाड्कन कुणीतरी थोबाडात मारल्यासारखं वाटलं मला. क्षणभरासाठी आजूबाजूचं सगळं गर्रकन फिरल्यासारखं झालं. काहीच बोलवेना. पोटात ढवळून आलं एकदम. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>चल , क्रिकेट खेळू , ती बघ दुसरी सगळी पोरं टीम पाडतायत!"</i> म्हणून मी त्याला तिथनं घेऊन चालू लागलो.<br />
<div style="font-style: normal;">
तेवढ्यात तिकडून गाईच्या गोठ्यातून ती गोड पोरगी -त्याची बहिण पळत आली आणि माझ्या हाताचे बोट धरून चालायला लागली.</div>
<i>"ओ , एक फोटू काडा कि माजा. </i><span style="font-style: normal;">" माझ्या गळ्यातल्या कॅमेरा कडे पाहत विनवणी केली तिने.</span><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>का नाही ? कुठे काढू सांग? त्या बागेजवळ काढायचा?"</i><br />
<i>"न्हाई, हितंच काडा. मी एक कविता म्हणते , नाचता बी येतं मला."</i><br />
<div style="font-style: normal;">
तिचं ते बोलणं ऐकून खुद्दकन हसू आलं मला.</div>
<i>"एक काय पाहिजे तेवढे फोटो काढू. तू म्हण पाहिजे तेवढी गाणी आणि मस्त डान्स कर!"</i><br />
<div style="font-style: normal;">
पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखी धुंदीत पळत गेली आणि आपल्या गोड आवाजात एक कविता म्हणून नाचू लागली. एवढे निखळ , निरागस दृश्य चुकवणे शक्यच नव्हते. गळ्यातला कॅमेरा काढून मी कामाला लागलो.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<i>"भैय्या , मी हात लावू का ओ तुमच्या कॅमेराला?</i><span style="font-style: normal;">" त्याने हळूच, बिचकत अपराधी सुरात विचारले.</span><br />
<i>"हो , घे ना. तुला फोटो काढायचे का तुझ्या बहिणेचे? हे बघ घे हा कॅमेरा."</i><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
मी त्याला फोटो कसा काढायचा समजावून सांगितले. खूप मजा वाटली त्याला. तो मन लावून फोटो काढायला लागला, त्याची बहिण पण अजून जोर जोरात नाचू लागली. हळू हळू ते पाहून बाकीची सगळी मुलं जमा झाली. सगळीजण कॅमेरा हाताळू लागली, एकेमेकांचे फोटो काढू लागली. मनमोकळ्या हसण्याच्या आवाजांनी ती जागा भारून गेली.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
सकाळी आलो तेव्हा हि सगळी पोरं अगदी बुजल्यासारखी होती. दुरूनच कुतुहुलाने पाहत होती. थोड्या गप्पा मारल्या , आणि एकदम मोकळी झाली सगळी. छान बोलू लागली , धीटपणे प्रश्न विचारू लागली. स्वतःबद्दल सांगू लागली. आज दिवाळीचा दिवस, सगळ्यांनी नवीन कपडे वगैरे घातले होते. हातात फटाक्यांचे पुडे वगैरे होते. जाम आनंदात होती सगळी पोरं. हासेगावच्या त्या गावापासून दूर निवांत जागी बांधलेल्या नंदनवनात आज चैतन्याचे वातावरण होते.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
लातूर जवळ थोड्याच अंतरावर रवि बापटले नावाच्या एका मित्राने अतिशय कष्टाने , श्रमाने फुलविली आहे हि जागा. नाव पण साजेसं "सेवालय"! एचआयवी ( एड्स ) ची लागण झालेल्या पोरक्या मुलांचा सांभाळ करतात. सरकार ची एका पैशाचीही मदत न घेता. अपवाद फक्त मुलांची औषधं , जे सरकारी हॉस्पिटल नित्य नेमाने पुरविते.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">घरदार, सुख , आराम सगळ्यांचा त्याग करून एकाच ध्येय डोळ्यासमोर ठेवून रवीने हे काम सुरु केले. एचआयवी बाधित जोडप्यांची मुलं पण बहुतेक संक्रमण झालेली असतात. आई वडील अर्थातच जास्त दिवस तग नाही धरू शकत. त्यानंतर हि मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात. अशिक्षित जनता, रोगाबद्दलाचे गैरसमज यातून जवळच्या नातेवाईकांकडूनसुद्धा या मुलांना वाळीत टाकलं जातं. औषधोपचारांचा अभाव, हेळसांड, दुर्लक्षामुळे झालेला मनावरचा आघात या सगळ्यांशी सामना करायला तेवढी ताकत नसते त्या कोवळ्या जीवांमध्ये. आणि परिणामी नको तो शेवट होतो त्यांचा. एका मुलीबद्दल रवीने सांगितले कि तिला जीवनाबद्दल एवढी निराशा आली कि तिने तंबाखू खाल्ली एक दिवस खूप. रागावून विचारल्यावर रडत म्हणाली कि "</span><i>मला जगायचं नाहीये. तंबाखू खाल्ल्यावर माणूस मरतो म्हणतात , म्हणून खाल्ली. </i>"<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>यांचं राहिलेले जीवन , जेवढे ही असो , सन्मानाने, हसत खेळत व्यतीत व्हावं. एवढीच एक इच्छा आहे माझी. योग्य औषधोपचार याचं जीवन मान बरंच लांबवू शकतात. आरोग्य तंत्रज्ञानात बरीच प्रगती झालीय. समाजाने यांचा स्वीकार करावा. सामावून घ्यावं यांना. लोकांच्या मनातून या रोगबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत. हाच हेतू आहे माझा</i>" रवी बोलत होता.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>यांचं कॉलेज वगैरे झालं कि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, म्हणून पण प्रयत्न करतोय मी. कारण आत्ता तरी यांची वय कमी आहेत. पण मोठी झाल्यावर यांच्यासाठी काहीतरी उद्योग मिळावा, म्हणून अजून थोडी जागा विकत घ्यावी म्हणतोय. म्हणजे यांची लग्न वगैरे होतील, संसार थाटतील, आणि उपजीविकेसाठी काहीतरी उद्योगही असेल. </i>"<br />
<span style="font-style: normal;">खूप खुजं आणि लहान झाल्यासारखं वाटतं मला रविसोबत बोलताना. कसलं मतलबी आणि स्वार्थी जीवन जगतो न खरं तर आपण. आपलं छोटंसं विश्व, तेवढ्यातच आपण केंद्रित असतो. अशा मुलांसाठी/ गरजू लोकांसाठी "</span><i>खरंच कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे.</i>" असं म्हणून थोडं वाईट वाटून घेऊन आपापल्या कामाला लागतो. म्हणूनच रविला त्रिवार सलाम.<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
आर्थिक गरज तर आहेच मुलांना. महिना १५००-२००० रुपये प्रत्येकाचा महिना खर्च आहे. ६०-७० मुलं आहेत सेवालायात. बऱ्याच मुलांचं पालकत्व काही चांगल्या लोकांनी घेतलं आहे ( महिना १५०० रुपये मदत एका मुलासाठी). पण राहिलेल्यांसाठी अजूनही झगडावं लागतं. आणि हो आर्थिक गरजेसोबतच मला जाणवलं कि मुलांना त्याही पेक्षा जास्त गरज आहे जवळीकीची. त्यांच्याशी जावून गप्पा माराव्यात , त्यांच्यासोबत वेळ घालवावा, त्यांच्या गप्पा ऐकाव्यात. खूप आनंदी आणि समाधानी होतात हि मुलं त्यामुळं.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
दिवाळी सारखा सण म्हणून बरेच नातेवाईक , मुलांना ४ दिवसांसाठी घरी घेऊन गेले होते. तरीही १०-१२ जण होते ज्यांना कुणीच नव्हतं. तीच सगळी मुलं भेटली मला त्या दिवशी.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>काय होणार रे मग मोठ्ठा होऊन ?</i>" मी सगळ्यांना प्रश्न विचारला.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>नर्स !"</i><br />
<i>"डॉक्टर!"</i><br />
<i>"सिस्टर!"</i><br />
<div style="font-style: normal;">
सगळ्यांची हीच उत्तरं. हि मुलं बाहरेच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर आणि नर्सेस लाच भेटतात. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्यांना तेच बनायचेय मोठे होऊन. तरीही, एवढ्या सगळ्या गोष्टीशी झगडत, एवढी आनंदी आहेत हि मुलं की काय सांगू? काय अधिकार आहे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचे दुखः मानत बसण्याचा. नको त्या फालतू गोष्टींचे टेन्शन्स घेऊन त्यांना गोंजारत बसण्याचा. खरंच, खूप काही शिकण्यासारखं आहे या मुलांकडून.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
काही फोटोज टाकले आहेत इथे. यातले बहुतेक(बरेच) फोटोज मुलांनी स्वतः काढलेले आहेत.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="font-style: normal; margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiRt8ZnqUl5zAC13F_gSCVIFAFwRZQtaA73cihTL7p-97SyGpc6ZEi6PZ0lJaZ4hvFo95xJajJf7J4O-eGlxRnRfT12447Xo84ycsssdfoPPIhgfqnYugoIMfPUOgVj6s8kpfLwK__8tPWI/s1600/P9710128.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiRt8ZnqUl5zAC13F_gSCVIFAFwRZQtaA73cihTL7p-97SyGpc6ZEi6PZ0lJaZ4hvFo95xJajJf7J4O-eGlxRnRfT12447Xo84ycsssdfoPPIhgfqnYugoIMfPUOgVj6s8kpfLwK__8tPWI/s1600/P9710128.JPG" height="240" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">सेवालय </td></tr>
</tbody></table>
<div style="font-style: normal;">
</div>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="font-style: normal; margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiiUMZHfjpq1KwiR0F_aZHXNT9XYKR57AYZkggxKiaDXayrUbRmTZHZxQHFDsLV5M2adDenX2_rtOChYWLu7jADFhJSd-oMQAcEO_AZdfQj0tZOo6cn4xgBUriYlxRV97on_WV67VfH6vAv/s1600/P9710110.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img alt="" border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiiUMZHfjpq1KwiR0F_aZHXNT9XYKR57AYZkggxKiaDXayrUbRmTZHZxQHFDsLV5M2adDenX2_rtOChYWLu7jADFhJSd-oMQAcEO_AZdfQj0tZOo6cn4xgBUriYlxRV97on_WV67VfH6vAv/s1600/P9710110.JPG" height="320" title="Ravi" width="240" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">रवी बापटले ! ध्येयवेडा माणूस … <span style="text-align: left;"> </span></td></tr>
</tbody></table>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="font-style: normal; margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhs30mXJvHD-wcag0Y2O46sEuZAFaaljcj-62UvantRXpAjQ0LbOQFuRs1qDuUSesLvc_ydpRAymfGOyWU6y00sUitaDVlN2UvMAEHh6UgYBi_2NPfrsJmHb9kSXBKHWP7AcdDujgK2H-zv/s1600/P9710120.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhs30mXJvHD-wcag0Y2O46sEuZAFaaljcj-62UvantRXpAjQ0LbOQFuRs1qDuUSesLvc_ydpRAymfGOyWU6y00sUitaDVlN2UvMAEHh6UgYBi_2NPfrsJmHb9kSXBKHWP7AcdDujgK2H-zv/s1600/P9710120.JPG" height="240" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">रवीने नंदनवन फुलवले आहे हासेगाव मध्ये. फुलं आणि बागा मन लावून वाढवल्या आहेत. </td></tr>
</tbody></table>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="font-style: normal; margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhokiKPzbmu3jbInpTHsOO3BWxmoFSffWVMj_A_MWhVykFpFehyphenhyphenYJkIg8cRKuBepl0H_KGob1YXyJj613EU5z7Y9IRrnserwLvsra7VmWh-pHhMR7eOvV2RRLJV6sSDvOtqDV4GENpbt8k4/s1600/P9710138.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhokiKPzbmu3jbInpTHsOO3BWxmoFSffWVMj_A_MWhVykFpFehyphenhyphenYJkIg8cRKuBepl0H_KGob1YXyJj613EU5z7Y9IRrnserwLvsra7VmWh-pHhMR7eOvV2RRLJV6sSDvOtqDV4GENpbt8k4/s1600/P9710138.JPG" height="240" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">मराठवाड्या सारख्या भागात पाण्याची समस्या नेहमीची. एक छोटासा तलाव बांधला आहे पावसाचे पाणी साचवण्यासाठी… </td></tr>
</tbody></table>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="font-style: normal; margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjS9jrSd4BMVoUpIBelB8cs4kj60kLQM1JhVNSxP7BY5N3dqAB4PY-Wjw21sgWvJBRbIolVmr_4qfChiPAdAHz6LIpVC2h88o0h-7GwiArRiQc8FRFTNWxwAt4v4Sds0ogjrKrZDpKeouY6/s1600/P9710140.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjS9jrSd4BMVoUpIBelB8cs4kj60kLQM1JhVNSxP7BY5N3dqAB4PY-Wjw21sgWvJBRbIolVmr_4qfChiPAdAHz6LIpVC2h88o0h-7GwiArRiQc8FRFTNWxwAt4v4Sds0ogjrKrZDpKeouY6/s1600/P9710140.JPG" height="240" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">मुलांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी अशी साधीच पण छान कुटी बांधली आहे … </td></tr>
</tbody></table>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
(रविला बरीच गरज आहे. मोठा व्याप आहे, दिवसेंदिवस मुलांची संख्या वाढत आहे. मदतीची इच्छा असेल तर कळवा मला नक्की! )</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-85407526585506198722014-12-05T07:40:00.000-08:002015-01-13T06:09:36.161-08:00कॉफी विथ करन !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<i>"ड्रेस कसला सुंदर आहे गं तुझा ! इंडियाहून घेतलास का?"</i><br />
<i>"थैन्कस ! हो, मागच्या वेळी मुंबई ला गेले होते, तेंव्हा घेतला. ते पानेरी नावाचं एक छान दुकान आहे बघ अंधेरीला."</i><br />
<i>"अगदी कुछ कुछ होता है मधल्या काजोल सारखा आहे बघ ! आठवला ना ? "</i><br />
<i>"ओह, हो का ? नाही आठवत बुवा !"</i> सौ मनातून स्वतःच्या खरेदीवर खुश होत म्हणाली.<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
बायका, आणि त्यांचे निरीक्षण ! फक्त हिरोईन चे कपडे , दागिने , नवीन डिजाईन्स इकडेच लक्ष असते. पिक्चर मरो तिकडे. असो… लुसलुशीत पनीर कबाब वर मी अजूनच जास्त लक्ष केंद्रित केले आणि मन लावून खायला लागलो. तसंही चार बायका एकत्र आल्या कि त्यांच्या शॉपिंगच्या गप्पा ऐकणे यासारखी निरस गोष्ट कुठली नसेल. बीअर पण संपत आली होती. ती रिपीट करण्यासाठी वेटरला माझे डोळे चातकाप्रमाणे शोधत होते. बायकांच्या गप्पा सुरूच होत्या.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
"काय मस्त पिक्चर होता ना केकेएचएच ?"</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
जोरात ठसका लागला मला. माझ्या अभिप्रायाप्रित्यर्थ माझ्याकडे बघणाऱ्या चेहऱ्याकडे कसनुसे हसत बीअरचा एक घोट रिचवला. नाही म्हणावं तर रूड दिसेल, हो म्हणावं तर मन नाही मानणार. अशा वेळी ठसके कसे देवासारखे धावून येतात.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<i>"करन जोहर किती छान सिनेमे बनवायचा ना आधी. पण काय झाले काय माहिती त्याला ? तो फालतू कभी अलविदा ना कहना बनवला. तेव्हापासून मी त्याचे पिक्चर बघायचं सोडून दिलं., नाहीतर काय ?"</i><br />
<i><br /></i>
<div style="font-style: normal;">
गरमागरम कबाबला तोंडापर्यंत पोचवणारा माझा हात तिथेच थबकला. सहन करावं हो माणसानी , पण किती? चक्क कभी अलविदा ना केहना ला फालतू म्हणावं कुणीतरी? अंगात बाजीप्रभूंनी संचार करावा तसं वाटून संभाषणात आवेशाने उडी घेतली मी.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>का………य?, फालतू चक्क ? मला वाटते करन जोहर ने एकच चांगला आणि सेन्सिबल पिक्चर बनवलाय आणि तो म्हणजे कभी अलविदा न कहना!</i>" मी तावातावाने म्हणालो .<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>काही काय म्हणतोस. काहीही दाखवलंय त्यात. तो अभिषेक बच्चन एवढा चांगला असतो, आणि राणी मुखर्जी तरीही शाहरुखच्या प्रेमात पडते. असं कधी होत असते का ?</i><br />
<i>"हो ना, काय संदेश जातो असल्या पिक्चर मधनं. समाजावर काय परिणाम होतील."</i><br />
<i>"मूर्खपणा दाखवलाय सगळा !" </i><br />
<i>"तसाच आहे तो शाहरुख, नेहमी दुसऱ्याची बायको नाहीतर प्रेयसी पळवतो. अगदी कुठलाही पिक्चर घ्या त्याचा!"</i><br />
<i><br /></i>
<div style="font-style: normal;">
बघता बघता शत्रुपक्षाने चढाई केली. अगदी एकाकी पाडला मला सगळ्यांनी. मी काही बोलायच्या आतच एकजण अस्मिताला म्हणाली -</div>
<i>"सांभाळ गं बाई नवऱ्याला. नको तसले पिक्चर आवडायला लागलेयत त्याला !"</i><br />
<div style="font-style: normal;">
हास्याच्या फवाऱ्यात माझे शब्द हवेतच विरून गेले. त्यामुळे मी अजून काही बोलण्याचा नाद सोडून दिला आणि वेटरला पुढच्या बीअरसाठी इशारा केला.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">पार्टी संपवून घरी आलो. पण ते संभाषण काही माझ्या डोक्यातून जायला तयार नव्हते. आता करन जोहर तसा बऱ्यापैकी सिनेमे बनवतो (म्हणजे तसा एकच). कुछ कुछ होता है एक बरा सिनेमा होता. मी इंजीनीअरिंग च्या शेवटच्या वर्षी असताना आलेला. तेव्हा ते वयच तसं होतं कि आवडावा सिनेमा. नंतर थोडी समज यायला लागली तेव्हा त्या पिक्चर मधला फोलपणा अधिकाधिक ठळक व्हायला लागला. सगळी स्वप्नाची दुनिया. श्रीमंत बापांची श्रीमंत पोरं. पैसे कमवायचे/अभ्यासाचे टेन्शन नाही. '</span><i>प्यार दोस्ती है'</i> वगैरे डायलॉग मारत, हातावर टाळ्या आणि नाकावर टिचक्या देत , कोपरापर्यंत फ्रेंडशीप बैन्ड बांधून प्रेम करतात. डोकं फिरल्यासारखं ती काजोल लग्न न करता थांबते शाहरुखसाठी. जणू राणी मुखर्जी मरायचीच वाट बघत होती. राणी पण अगदी कन्विनिअन्टली टाईम वर देहत्याग करते. वर ती अति शहाणी ८ वर्षाची पोर, अकाली प्रौढत्व आलेली. आज्जीबाई सारखी बडबड करते. सलमानची एन वेळी फजिती करून शेवटी यांचं लग्न वगैरे. आकाशातले तारे वगैरे पण एकदम टाइम वर तटातटा तुटतात. अरे काय पांचट पणा लावलाय? असले पिक्चर पब्लिक ला जाम आवडतात. माझ्या एका मित्राने पिक्चर संपल्यावर अगदी मार्मिक विश्लेषण केलं होतं. म्हणाला<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>एकदम अन एक्सपेक्टेड स्टोरी निघाली यार!"</i><br />
<i>"का रे ?"</i><br />
<i>"नाहीतर काय, हॉरर पिक्चर होता राव. राणी मुखर्जीचं भूत दाखवलंय त्यात !"</i><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
लोकांना असे पिक्चर आवडतात कारण लोकांना स्वप्नाची दुनिया आवडते. असं काही नसतं हे माहित असूनसुद्धा , माणसं स्वतःला त्या पिक्चर मध्ये कुठेतरी हुडकण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला सुखावून घेतात. ताण तणावाच्या जीवनात तेवढेच थोडे विरंगुळ्याचे क्षण! खोट्या स्वप्नांमध्ये रमून जातात. हिरो हिरोइन चं सुखकर आयुष्य बघून,</div>
<div style="font-style: normal;">
हैप्पी एंडिंग्ज बघून समाधानी होतात. सत्य परिस्थितीचा काही एक संबंध नसतो अशा पिक्चरचा. संस्कार , समाजाला संदेश वगैरे म्हणाल तर त्या नावानं शंख आहे सगळा. कसला संदेश देतो हो हा पिक्चर सांगा बरं मला. कुणाचेतरी लग्न सुरु आहे आणि तिथे जाऊन ते मोडून त्याच्या होणाऱ्या बायकोशी लग्न करा? आणि ते का तर , हिच्यापेक्षा जास्त कुणीतरी आवडत होती म्हणून आठ वर्षापूर्वी हिला नाकारली होती. आणि आता बायको मेल्यावर, लगेच चान्स मारून घ्यायचा. कि ८ वर्षांच्या मुलांनी बापाचे हरवलेले प्रेम हुडकायचे, हा संदेश? की इकडे एखाद्याला लग्नाचे वचन देऊन , समर कॅम्प मध्ये जुन्या मित्राला भेटून पावसात नाचायचे वगैरे, ते पण नको तेवढे जवळ येउन. कम ऑन , स्टौप फूलींग योरसेल्वज!</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
ढोंगी झालो आहेत आपण. स्वतःला फसवून फसवून एवढे एक्स्पर्ट झालोयत की , आता तसं काही करतोय ,त्याची जाणीव हि नाही राहिली. सत्य परिस्थिती चा सामना नाही करू शकत आपण. त्यापासून लांब पळतो. कारण सत्य आपल्याला आपण काय आहोत याची जाणीव करून देते. आणि मग कारण नसताना अपराधाची भावना मनात येते. कोण सांगितलीय ती उठाठेव? म्हणून बरं का, आम्हाला ना कुछ कुछ होता है जाम आवडतो, पण कभी अलविदा न कहना … रीडीक्युलस, अगदी नो नो !</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
उलट , कभी अलविदा न कहना चे वेगळेपण ह्या अशाच सगळ्या पिक्चर्स मुळे उठून दिसतं. मी असं म्हणत नाही की अगदीच सुंदर चित्रपट आहे तो. पण दमदार कथा आहे. विचार करायला लावणारी. वास्तवातली. सत्य परिस्थितीशी समझोता ना करणारी. आणि संदेश वगैरे म्हणाल तर ते काही पिक्चरच काम नाहीये हो. पिक्चर म्हणजे मनोरंजनाचे एक साधन आहे. त्यात कसला संदेश आलाय , डोंबल ! संदेश हवाय , चांगले विचार हवेयत तर चांगली पुस्तकं वाचा , देवभक्ती करा. भक्तीपर चैनल्स लावून बसा दिवसभर. संदेश कसला घेताय पिक्चर मधनं. त्यापेक्षा कॅमेरा वर्क एप्रिशियेट करा, लेखकाची ताकदवान स्क्रिप्ट पहा. तेवढ्याच कौशल्याने दिग्दर्शक ती कथा कशी मांडतो आपल्यासमोर ते बघा. कुठेतरी ह्रदयाला एखादा प्रसंग हलवून सोडतो की नाही ते बघा. मोजक्याच शब्दात बरंच काही सांगून जाणारे डायलॉग, त्याचं कौतुक करा. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
खूप बोलायचंय कभी अलविदा ना कहना वर. पण जास्त मोठे मोठे ब्लॉग नाही लिहायचे असं ठरवलेय. काहीजणांनी सुचवले की फारच लांबलचक होतात. म्हणून भाग-२ मध्ये "के ए एन के " बद्दलची माझी मतं ! लवकरच भेटीन !</div>
<div style="font-style: normal;">
(क्रमशः)</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-25844295964626221062014-12-03T03:55:00.002-08:002015-01-13T06:09:36.147-08:00सावधान !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div style="font-style: normal;">
बऱ्याच दिवसांत काही लिहिणे झाले नाही. महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले नाही का? कारणं दोन त्याची. एक म्हणजे काही सुचतच नव्हतं. डोकं दुसऱ्याच गोष्टींनी व्यापलं होतं (म्हणजे अजून पण आहे) . दुसरं म्हणजे इंटरनेट कनेक्शन नव्हतं घरी. आता हॉंगकॉंग सारख्या ठिकाणी इंटरनेट शिवाय पंधरा दिवस म्हणजे थोडं विचित्र वाटेल ऐकायला! पण झालं तसंच. मोठी कहाणी आहे , परत कधीतरी. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
अर्धशिशी (बरं राहिलं , शब्दार्थ: मायग्रेन) ने परत डोकं वर काढलं, आणि दोन दिवसांची सक्तीची विश्रांती पदरी पडली. सवय होऊन गेलीय आता त्याची. सुरुवातीला वैताग यायचा मायग्रेनचा, पण हळू हळू समजलं कसं डील करायचं त्याच्याशी ते. फार विचित्र नातं आहे माझं त्याच्याशी. पहिल्यांदा त्याची ओळख झाली माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी. हो! हळदीचा कार्यक्रम वगैरे उरकला आणि लग्नगावी जायची वेळ आली, आणि अचानक व्हिस्कीचे ४-५ नीट पेग मारल्यासारखं डोकं गरगरायला लागलं जाम. उमजेनाच की काय होतंय ते.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
"<i>पित्त हो , अजून काय ? मला पण होतं असंच अधून मधून. "</i><br />
<i>"करणी /भानामती तर नाही न गं केली कुणी?. चांगलं बघवत नाही लोकांना आजकाल. "</i><br />
<i>"दुपार पर्यंत चांगला होता हो. उन्हात अनवाणी जावं लागलं हळदी नंतर बाजूच्या मंदिरात. सहन नसेल झालं. शहरात राहून नाजूक झालीत आजकालची पोरं. नाहीतर, आमच्या वेळी …. "</i><br />
<i>"अगं दुपारी एक फकीर आला होता दाराशी. काहीतरी पेटी वगैरे देऊन गेला ह्याच्या हातात, मेल्यानी काहीतरी जंतर मंतर तर नाही केले ना ? हा महेश पण पिडत होता त्याला किती वेळ!"</i><br />
<i>"नाही गं मावशी. मी होते न तिथे? तो फकीर आला न त्याने एक रुपयाचे नाणे मागितले त्याने महेशकडे. त्याच्या हातात दिल्यावर काहीतरी हातचलाखी करून त्याची गळ्यात घालायची पेटी बनवून महेशच्या हातात दिली त्याने. दक्षिणा म्हणून १० रुपये मागायला लागला. महेश म्हणाला १० काय १०० रुपये देतो , पण जादू कशी केली ते शिकव मला. वैतागून निघून गेला बिचारा फकीर. "</i><br />
<i>"कुठंय ती पेटी , बघू इकडे."</i><span style="font-style: normal;"> म्हणत मावशीने लांब कुठेतरी झुडपात भिरकावून दिली ती. भरभर देवघरातून थोडा अंगारा आणून माझ्या डोक्याला लावला.</span><br />
<i>"नजर काढ गं पोराची. बिना आईचं लेकरू. कुणी नजर पण काढत नाही. "</i><br />
<i>"हो , हो"</i><span style="font-style: normal;"> म्हणत कुणीतरी मीठ मिरची घेवून आलं. भराभरा नजर काढली.</span><br />
<div style="font-style: normal;">
"<i>शांत रहा! मी औषधं देते त्याला. स्ट्रेसनी होतं कधी कधी असं थोडी विश्रांती घेऊ द्या त्याला.</i>" कांचन सुटकेला धावून आली.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
डोळे उघडून किलकिल्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पाहिलं. ही गर्दी लोकांची! माझ्या डोकं गरगरन्याची कारणमीमांसा आणि उपायांना ऊत आला होता नुसता. कुणी दिसतंच नव्हतं. आजूबाजूचं सगळं गोल गोल फिरत होतं. एकमेकांत मिसळून गेलं होतं. हातानीच खुण केली सगळ्यांना गप्प रहायची आणि परत डोळे मिटून शांत पडून राहिलो.</div>
<br />
<div style="font-style: normal;">
बघता बघता संध्याकाळ झाली. लग्न गावी निघायची वेळ झाली. उद्या दुपारचा मुहूर्त होता. निघणे गरजेचे होते. कसाबसा उठलो, सतीश मामाच्या आधाराने बाथरूम मध्ये जाऊन तोंडावर पाण्याचा हात फिरवला. आणि कार मध्ये जावून बसलो. काहीच भान नव्हतं आजूबाजूचं. अस्मिता काळजीने परेशान झाली होती. तिच्याकडे पाहून कसेबसे हसून खोटा धीर देत होतो. ड्रायवर ने उदबत्ती वगैरे लावून गाडी स्टार्ट केली. आपली फेवरेट गाण्यांची सीडी ऐटीत लावून , गाडीला वेग दिला.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<i>"ये दुनिया , ये मेहफील , मेरे काम कि नही !"</i><span style="font-style: normal;"> रफी विव्हळायला लागला.</span><br />
<i>"बंद कर रे ते गाणे. काय सिच्युएशन आणि काय गाणी लावलियस ?</i><span style="font-style: normal;">" मामा ड्रायवर वर खेकसले. हिरमुसून बिचाऱ्यानी गाणी बंद केली. मामावरचा राग एक्सलरेटर वर काढून भन्नाट वेगात गाडी पळवायला लागला.</span><br />
<span style="font-style: normal;"> </span><br />
<div style="font-style: normal;">
दोन तीन तासांनी लग्नगावी पोचलो. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं. सासूबाई हातात आरतीचे ताट वगैरे घेऊन उभ्या. सगळं लग्नघर स्वागतासाठी घराबाहेर जमलेलं. त्याचक्षणी मायग्रेनला भन्नाट ऊत आला. डोकं गरगरणे एकदम तीव्र झाले. कसाबसा मामाच्या खांद्यावर हात ठेवून मी बाहेर पडलो. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
अनपेक्षित होतं हो सगळ्यांना असं काही. नटून थटून थांबलेल्या लग्नघरातल्या मुली, स्वतःला ,हम आपके है कौन मधला सलमान समजणारी पोरं, अशाच काहीतरी सनसनीखेज गोष्टीची वाट पाहणारे शेजारी पाजारी, नातेवाईक सगळेजण आश्चर्यचकित होवून माझ्याकडे पाहत होते.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>जावई बापूंनी येताना रस्त्यातच घेतली काय थोडीशी ?"</i> कुणीतरी कुजबुजले.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>अग्गं बाई, काय तब्येतीचा प्रॉब्लेम वगैरे आहे काय, लग्नाच्या आधी लपवून ठेवले होते वाटते."</i><br />
<i>"तरीच, हुंडा वगैरे नाही घेतला वाटतं"</i><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>ही आय टी मधली जनरेशन असलीच बघा. मरमर कामं करायची आणि दारू ढोसायची. लग्नाच्या दिवशी तर कंट्रोल करावा कि नाही ?"</i><br />
<span style="font-style: normal;">लोकांची कुजबुज सुरु झाली होती. मला मजा वाटत होती ऐकून. जाउन सरळ बेडवर लवंडलो. लागलीच डॉक्टर वगैरे आले, चेकअप वगैरे करून गेले. सगळ्यांची रीघ लागली माझी विचारपूस करायला. सासऱ्यांनी सगळ्यांना थोडे जोरातच बजावून सांगितले. "</span><i>विश्रांती घेऊ द्या प्लीज त्यांना."</i><br />
<i><br /></i>
<div style="font-style: normal;">
तेवढ्यात एका मित्राचा फोन आला.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>काय रे काय झालं ?"</i><br />
<i>"अरे काही नाही थोडीशी चक्कर येतेय आणि डोकं पण दुखतेय"</i><br />
<i>"च्यायला काय झाले? काय थोडीशी घेतली कि काय तू आज ?"</i><br />
<i>"वेडा आहेस का ? लग्नाच्या आधी महिनाभरापासून सोडून दिलीय मी."</i><br />
<i>"हम्म , आय नो वोट्स रॉंग, अरे काट्यानी काटा काढायचा. एक काम कर तू २ पेग मार, चक्कर बंद होऊन जाइल."</i><br />
<div style="font-style: normal;">
काही न बोलता मी फोन ठेवून टाकला. मनाशी विचार केला की लग्न पोस्टपोन होणार आपले. अस्मिताची आणि तिच्या पालकांची जास्त काळजी वाटू लागली, कि एवढी तयारी केलेली, वाया जाणार सगळी. पर्याय नव्हता ना पण काहीच. विचार करता करता झोप लागली. गरगरणे अजूनही थांबले नव्हते.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
सुदैवाने सकाळी जाग आली आणि मायग्रेन बराच कमी झाला होता. अस्मिता गरमा गरम कॉफी घेऊन आली. पिउन ताजेतवाने वाटले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शन पण थोडे दूर झाले. आणि फायनली मी बोहल्यावर चढलो. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
रामदास स्वामी बोहल्यावर चढले आणि "सावधान" म्हणताच त्यांना ईशारा मिळाला असं म्हणतात. त्यांनी त्याच क्षणी तिथनं धूम ठोकली होती. देव सगळ्यांना तसाच वेगवेगळ्या प्रकारे इशारा तर देत नसेल?</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
ओके, ओके अस्मिता ! जोक होता हा ! आई गं , …. लाटणं लाकडी असलं तरी लागतं जोरात अगं !</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-91534300421918771372014-10-22T10:25:00.001-07:002015-01-13T06:09:36.163-08:00परवाना !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div style="font-style: normal;">
लाईट जाणं वगैरे प्रकार परदेशात राहून विसरायला झाले होते. भारतात आलो आणि थोड्या वेळातच विजेने सायोनारा केले आणि धूम ठोकली. दिवेलागणीची वेळ, आणि वर बेभरवशाचा कारभार आपल्याकडे सगळा, वीज कधी परत येणार माहित नाही. इनवर्टर पण एन वेळी खराब झालेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याची डागडुजी करायला पण कुणी येत नव्हतं. बाहेर रिमझिम सुरु झाली होती नुकतीच पावसाची. जीव वैतागून गेला , पण करणार काय ? पर्याय नव्हता. वीज परत येण्याची वाट बघायचं नुसतं!</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
काडेपेटी शोधून मेणबत्ती पेटविली. त्या प्रकाशात घर कसं अगदीच वेगळं भासायला लागलं. निरनिराळ्या वस्तूंच्या लंबुळक्या सावल्या भिंतीवर कशा दिमाखानं डौलू लागल्या. ज्योतीच्या फरफरण्याने हातात हात गुंफून नाचायला लागल्या . सावल्यांचे ते खेळ पाहण्यात रंगून गेलो असताच, अचानक त्याचं आगमन झालं. पावसात ज्योतीच्या प्रकाशाने आकर्षित होऊन एक पतंग (फ़ुलपाखरू) आलं होतं. कुठून कसा सुगावा लागला कोण जाणे त्याला? पण आला! एखाद्या बेभान , वेड्या प्रेमवीराप्रमाणे सुसाट आला आणि मेणबत्तीच्या ज्योतीकडे झेपावला. तिच्या अगदी जवळ जाउन एक शानदार घिरकी घेतली , आणि जसे काही तिच्या मनाचे रंजन करतोय त्याप्रमाणे वेडीवाकडी वळणे घेत तिच्याभोवती फिरू लागला.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
"<i>जपून रे जरा! फार जवळ नकोस जाऊ तिच्या.</i> " मी काळजीने म्हणालो. जसं काही त्याला समजणारच होतं.<br />
<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>तुला काय कळणार रे यातली नशा? तुला नाही समजणार.</i>" म्हणून आपल्या घिरट्या तशाच सुरु ठेवल्या त्याने. काय आश्चर्य !!! पतंग चक्क बोलायला लागला होता. बरं झालं , कुणीतरी बोलायला भेटलं. एकाकीपणानं मी ही वैतागून गेलो होतो. पुढे बोलायला लागला तो.<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<i>"दोन तीन महिने झाले असतील , पहिल्यांदा भेटलो हिला तेंव्हापासून. सगळं कसं कालच घडल्यासारखं वाटतंय बघ. पाहता क्षणी प्रेमात पडलो हिच्या. तिचं ते तेजाळलेलं रूप , वेडं करून टाकलं त्याने मला. वाऱ्याच्या झुळकीसरशी तिचं ते ग्रेसफूल लवलवणे, हळूच मान खाली घालून , अचानक माझ्या डोळ्यात डोळे घालून आवाहनात्मक पाहणं, सगळं कसं स्वप्नवत वाटतं. असं वाटतं कि आयुष्यभर असंच हिच्यासोबत राहावं, हिच्याभोवती फिरत , हिचं मन रिझवीतच माझं जीवन व्यतीत व्हावं. "</i><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>एवढं प्रेम करतोस तिच्यावर ?</i>" मी विचारलं.<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<i>"हो ना , आणि ही वीज सुद्धा माझ्याच बाजूने आहे. सगळं समजत असल्यासारखी रोज बरोबर याच वेळी दबक्या पावलांनी निघून जाते. जाताना हळूच डोळे मिचकावते माझ्याकडे पाहून. म्हणते , भेटून घे मनाजोगतं. थोडा एकांत मिळूदे तुम्हा दोघांना. पण लवकर आटपा. येते परत अर्ध्या तासात. या अर्ध्या तासात दिवसभराचं सगळं जगून घेतो मी. एक एक क्षण मनापासून उपभोगतो अगदी,"</i><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<i>"अरे, ते सगळं ठीक आहे, पण तिचं काय ? तिलाही तेवढाच आवडतोस का तू ?"</i><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>कदाचित ……असावं तसंच </i>" हे म्हणताना त्याच्या आवाजातला कंप जाणवला मला. एक प्रकारचा गोंधळलेपणा होता त्याच्या बोलण्यात.<br />
<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>काय रे काय झालं ?</i>" . मी विचारलं.<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>पहिल्यांदा भेटलो तिला , तेंव्हा खरंच प्रेमात पडलो होतो रे आम्ही एकमेकांच्या. करमायचं नाही एक दुसरयाशिवाय एक क्षण ही. असंच रोज दिवेलागणीच्या वेळी भेटतो आम्ही. खूप गप्पा मारायचो. बिचारी फार एकटी असते रे. म्हणून बाहेरच्या जगाचं सौंदर्य सांगून तिच्या चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न करायचो . पहिल्या पावसाचा तो शरीरासोबत मन ही चिंब करणारा अनुभव ,मोगरा आणि जाईचा तो मंद वेडावणारा सुगंध, उगवत्या सूर्याची ती लाली , पौर्णिमेच्या चंद्राचा तो शीतल गारवा, आकाशाचे ते जादुई निळे निळे रंग , वनराईचा तो हिरवागार गालीचा, पहाटेच्या वाऱ्याचा तो सुखावणारा सहवास. सगळं कसं भरभरून सांगायचो तिला. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून जीवन सार्थकी लागल्यासारखे वाटायचे मला. फडफडून तीही आनंदानं शहारून जायची. रोज माझी चातकासारखी वाट बघायची. म्हणायची मलाही घेऊन चल रे तुझ्यासोबत. फारशी बोलायची नाही , पण कधी कधी प्रकाशाच्या गमती जमती सांगायची. त्या मेणाची तक्रार करायची , फार चिकट आहे म्हणे तो. वीजेवरही नाराज असायची कधी कधी. म्हणायची , परत यायची फार घाई असते तिला ! अस्तित्वच संपायचं ना रे तिचं त्या दिवसापुरतं , एकदा वीज परत आल्यावर. "</i><br />
<i><br /></i>
<i>"अरे , पण त्या मेणाला काढलं तर अस्तित्वच काय उरतं तिचं? त्याचं समर्पण बघ ना! रोज झुरतो , वितळतो तिच्यासाठी. तिला तेवत ठेवण्यासाठी , रोज थोडं थोडं वितळून मरतोच ना तो ?</i><span style="font-style: normal;">" मी म्हटलं </span><br />
<div style="font-style: normal;">
.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>नाही रे मन रमत तिचं त्याच्या सोबत. दोघांच्या संमतीने नाही काही ते नातं जुडलेले. दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून जवळीक झालेली त्यांच्यात . दुसऱ्या कुणीतरी विणले म्हणून काही नात्यांच्या रेशीमगाठी घट्ट नसतात होत. नुसताच एक अलिखित करार बनतो ते नातं. एक पर्यायहीन , शुष्क , लादलेलं नातं . मी नव्हतो तेंव्हा त्या मेणानं जीवन व्यापलं होतं तिचं. कंटाळवाणी , चिकट , रंगहीन सोबत त्याची आयुष्यभराची. त्यात कसलं आलंय समर्पण, डोंबल ! एकच आयुष्य मिळतं , कसं भन्नाट , बेभान जगलं पाहिजे. बाहेरचं रसरसलेलं, खळखळून वाहणारं जीवन , त्याचा परिचय मीच करून दिला तिला. एकदा बोलून गेली ती, कि खऱ्या अर्थानं जीवन काय असते ते कळाले माझ्यासोबत राहून. आणि मेणाचं काय रॆ , वितळल्या सारखं दाखवतो नुसता . वितळून परत पूर्व रुपाला येतो , ती ज्योत नाहीशी झाली की. त्याचं अस्तित्व कधीच मिटत नाही . हि ज्योत संपली , तर कदाचित काही दिवसांनी दुसऱ्या ज्योतीसोबत दिसेल तो. "</i><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
मंद हसून मान डोलावली मी .</div>
<i>"पण काहीतरी बिनसलंय तुझं हे नक्की! आवाज थरथरतोय बोलताना तुझा. ती ज्योतही फारशी डोलत नाहीये तू आल्यापासून.</i><span style="font-style: normal;"> " मी विचारलं.</span><br />
<span style="font-style: normal;"><br /></span>
<i>"बरोबर ओळखलंस तू . गेल्या काही दिवसांपासून पूर्वीसारखं बोलत नाही ती माझ्याशी. असं जाणवतंय की , ह्या नात्यामध्ये मी एकटाच आहे. आहे.ती कुठे नाहीचये त्यात. मी एकटाच धडपडतोय हे एकतर्फी नातं जपण्यासाठी . हे असं तोडण्यासाठीच का जोडतो आपण ? फारसं लक्ष नाही देत ती . मला जाणवेल असं दुर्लक्ष करते. मी बोललो तरच बोलते. ते हि कामापुरतं . तिला नाही कळत का , तिचं हे वागणं कसं काळीज चिरतं माझं . कदाचित तिला जाणवले असेल कि माझे जीवन अगदी वेगळे आहे, ती कधीच माझ्यासोबत मुक्त बागडू नाही शकणार. मुद्दामहून करीत असेल बहुतेक . कसल्यातरी निर्विकार , निर्जीव, निरसपणे कशीबशी तेवत असते."</i><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>दुसरा एखादा पतंग तर नाहीये न आवडला तिला?</i>" माझ्या मनातली शंका बोलावून दाखविली मी .<br />
<i><br /></i>
<i>"माहिती नाही , तशी शक्यता फार मला तसं काही असण्याची. पण हे मात्र अगदी खरा आहे कि माझ्या प्रेमातला तो आवेग , ती काळजी , ओलावा तिच्यात कुठे दिसताच नाहीये . आतून जळतोय रे मी ! माझ्या ह्या सुंदर पंखाचं ओझे वाटायला लागलेय मला. जीव गुंतलाय तिच्यात माझा. कधी वाटतं , ह्या मेणा साठीच असं वागतेय माझ्याशी ती असं . एवढी वर्ष सोबत घालवलेली त्याच्यासोबत, तिला पण सोडवत नसेल. बोचत असेल कुठेतरी !कळत नाही कुणाचं आणि काय चुकतंय .</i><span style="font-style: normal;">" हताश स्वरात तो बोलत होता .</span><br />
<span style="font-style: normal;"><br /></span>
<i>"मग आता ? काय करायचं ठरवलंय ? एवढे सुंदर पतंग असतात रे, एका पेक्षा एक. निवड त्यातलीच एक. विसर हे सगळं . नव्याने आयुष्य सुरु कर. हे आगीशी खेळणं सोडून दे. </i><span style="font-style: normal;">" असाच एक अनाहूत सल्ला दिला मी .</span><br />
<div style="font-style: normal;">
माझ्याकडे पाहून वेड्यात काढल्यासारखं हसला नुसतंच तो . निशब्दपणे आपले पंख पसरून मेणबत्तीच्या त्या ज्योतीकडे झेपावला तो. अगदी जवळ पोचला तिच्या . त्याच्या त्या लगटीमुळे, अचानक अंधाराने झाकोळून गेलं घर सगळं , अगदी क्षणभरासाठी ! पुढच्याच क्षणी तिच्या पायाशी राख होऊन पडलेला होता तो! समर्पणाचा अर्थ उमगला मला त्या क्षणी .</div>
<div style="font-style: normal;">
मेणबत्ती त्याच निर्विकारपणे तेवत होती. मेणाचा एक ओघळ वितळून कसनुसा होत खाली सरकला. खिडकीतून बाहेर पाहिलं मी, मगाशीचा पाउस आता धाय मोकलून बरसत होता ….</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-11085396042817707872014-10-14T09:10:00.000-07:002015-01-13T06:09:36.141-08:00गीत प्रेमायण… प्रेमात पडल्यावर ( पार्ट २ )<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div style="font-style: normal;">
प्रेमात पडल्यावर तशी फारशी स्पेशल गाणी नाहीयेत. प्रेमात पडलेला माणूस बहकलेला असतो. काहीही गायलं तर त्याला छान वाटतं. तो काळंच तसा असतो. सातव्या आस्मानावर असतो माणूस. घरासमोरची ती बाभळ ही गुलमोहरासारखी वगैरे भासायला लागते. आपली प्रेयसी, दीपिका (चीखलीया नव्हे , पदुकोन ) पेक्षा सुंदर, आणि आपला हिरो ह्रिथिक पेक्षा वरचढ भासायला लागतो. प्रेम म्हणजे एक नशा आहे. मदिरा फिकी पडते त्यासमोर. एकेमेकांसाठी काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं. पुढच्याशिवाय जगण्याचा विचार हि करवत नाही. रस्त्यावरून जाणारी एकदम सुंदर पोरगीही तुमचं चित्त विचलीत करू शकत नाही. प्रेमात सर्वस्व वाहून टाकलेले असतं तुम्ही.<br />
<br />
<b><a href="http://www.youtube.com/watch?v=bRUzf7LgjLM">१) पेहेला नशा… </a></b><br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/bRUzf7LgjLM?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br />
प्रेमात पडलेला प्रत्येकजण या गाण्याच्या पण प्रेमात पडला नसेल, तर नवलंच! नवीन नवीन प्रेम. पाय जमिनीवर टिकत नाहीत. दिवसा जागेपणी सुद्धा तिची स्वप्नं पडत असतात. प्रत्येक भेट अपुरी वाटायला लागते. कितीतरी बोलावसं वाटतं. चुकून स्पर्श जरी झाला तर अंगात विजेचा करन्ट दौडतो. पुढच्या जीवनाची स्वप्नं रचली जातात. रोज आठवणीने एखाद फुल, चोकलेट , ग्रीटिंग कार्ड यात पैसे उडवले जाऊ लागतात. पुढच्याच्या आवडी निवडी जाणून घेऊन, कटाक्षाने पाळल्या जातात. कधीपासून मनात आकर्षण निर्माण झालं, आवडायला लागलं वगैरे गोष्टींच्या कबुली दिल्या जाऊ लागतात. व्यसनं वगैरे (तात्पुरती का होईना!) सोडली जातात. रात्री झोप लागत नाही. फोनचं बिल भस्मासुरासारखं वाढायला लागतं. प्रेमाचा थाटच निराळा असतो ह्या काळात.<br />
<br />
<b><a href="http://www.youtube.com/watch?v=0w1FLAuMdA0">२) दिल मे कुछ हो रहा है</a></b><br />
<b><br /></b>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/p3s5r92aeEc?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br />
फ्रिकी चक्र नावाचा एक चित्रपट. बहूतेक २००१-२००२ च्या काळात कधीतरी आला होता. मल्टीप्लेक्स त्या काळी हळूहळू मशरूम उगवावेत तसे उभारले जात होते पुण्यात. मल्टीप्लेक्स मध्ये पाहिलेला पहिला पिक्चर असावा माझा हा. पस्तीस रुपयाचे पॉप कॉर्न विकत घेऊन पाहिलेला! तसा पिक्चर ओकेच होता. एक हे गाणे सोडले तर लक्षात ठेवण्यासारखे काहीच नव्हते त्यात. अत्यंत एकलकोंडी दीप्ती नवल एकटे राहून राहून विक्षिप्त झालेली असते. सगळ्या जगाला दुष्मन समजत जगत असते. आणि एके दिवशी एक मुलगा तिच्या जीवनात येतो. प्रेम माणसाला कसं बदलून टाकतं ते या गाण्यात दाखवले आहे. बाकी, दीप्ती नवल तरुणपणी जेवढी होती तेवढीच रसहीन आणि अनाकर्षक दिसते अजून पण!<br />
पण ,माझं अत्यंत आवडते गाणे आहे हे. बहुतेक सगळ्यापेक्षा जास्त …आणि तसंच राहील पण….<br />
<br />
<b><a href="http://www.youtube.com/watch?v=3Y1kouWRi1s">३) आंखो की गुस्ताखीयां माफ हो </a></b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/3Y1kouWRi1s?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<b><br /></b>
जसे जसे दिवस पुढे सरकतात , तसा तसा थोडा अवघडलेपणा कमी होतो. जाणीवपूर्वक एकमेंकांचे स्पर्श होऊ लागतात. लपून छपून ,लडिवाळ खेळ सुरु होतात. दोघांना वाटत असतं कि आजूबाजूच्या जगाला काही माहितीच नाहीये. पण तसं नसतं. सगळ्यांना कळत असतं काहीतरी चाललंय ते ! असो, लव्हबर्डस ना त्याची काय फ़िकर. चोरून भेटणे, हळूच हात पकडणे. टेबलाच्या खाली पायांचे खेळ ( निशब्द मध्ये अमिताभ चा एक सीन होता, मजेशीर होता एकदम).<br />
हम दिल दे चुके सनम "वो सात दिन" ची कॉपी आहे, हे मला बऱ्याच दिवसांनी , किंबहुंना अलीकडे २-३ वर्षांपूर्वी माहित झाले. चांगला सिनेमा होता. ऐश्वर्या तशी मला आवडत नाही, पण या गाण्यात अगदी सुंदर दिसलीय. सलमान नेहमीप्रमाणे बावळट ध्यान आहे. पण गाण्यात सूट होतो. इस्माईल दरबारनी (द वन फिल्म वंडर) अगदी अप्रतिम संगीत दिलंय. बहुतेक जेवढं येत होते तेवढे सगळं या पिक्चरलाच देऊन टाकलं वाटतं. नंतर गायबच झाला तो. बऱ्याच दिवसांनी बिग बॉस मध्ये वगैरे दिसलेला.<br />
संजय लीला भन्साळी ने चित्रीकरण पण लाजवाब केलंय गाण्याचं. लग्नाच्या ठिकाणी असे प्रकार बरेच बघायला मिळतात. ऐश्वर्या डोळ्यांची उघडझाप करून खुणेने सलमानला बोलावते तो क्षण … जेवढ्या वेळी मी तो सीन बघतो , तेवढ्या वेळी माझं ह्र्दय दोन क्षणांसाठी गप्पकन बंद पडतं. अजूनही. <br />
<br />
<b><a href="http://www.youtube.com/watch?v=w7lNCCSFowk">४) और हो … </a></b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/w7lNCCSFowk?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<b><br /></b>
रॉकस्टार हे रेहमानचं आत्तापर्यंतच सर्वोत्कृष्ट काम आहे असं मला वाटतं. मोहित चौहान चा मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज. आणि वर रणबीर कपूरचा जीव तोडून केलेला अभिनय. प्रेमातली उत्कटता, बेभानपणा, असहायता सगळं काही हे गाणं सांगून जातं. एक ओळ आहे या गाण्यात " तुझी पेहेली बार मै मिलता हुं , हर दफ़ा!" काय अर्थपूर्ण गाणं आहे! तो ब्रिज वरचा सीन जेव्हा ती पळत सुटते , आणि मागे फिरून परत रणबीर च्या कवेत येते. प्रेमातली विवशता , असहायता खरंच एवढ्या परिणामकारक रीतीने दाखविलेली मी तरी पहिली नाही. खूप खूप लिहायचं आहे या गाण्याबद्दल , पण शब्दच नाहीयेत माझ्याकडे. कधी सापडलेच, तर एक स्वतंत्र पोस्ट लिहीन.…<br />
मला मनापासून आवडलेला चित्रपट… इम्तियाझ अलीज् बेस्ट वर्क!<br />
<br />
<b><a href="http://www.youtube.com/watch?v=Ykis7ix3QXw">५) रौन्धे है मुझको तेरा प्यार</a></b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/Ykis7ix3QXw?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br />
प्यार तुने क्या किया नावाचा एक रटाळ पिक्चर! अंजाम , डर वगैरे सारखे रोल करत होता शाहरुख, तेव्हा कुणाला तरी वाटले कि एक फिमेल वर्जन काढूया तशीच स्टोरी ठेवून. उर्मिला मार्तोंडकरला अशा सायकौटिक भूमिका खूप चांगल्या वटवता येतात. उदाहरणार्थ कौन, भूत वगैरे सिनेमे. फरदीन खान, त्याच्याबद्दल तर न बोललेच बरे.<br />
असो , तर हे बरंच अनयुज्वल गाणं आहे या यादीमधलं , हो ना ? थोडी डार्क साईड आहे या गाण्याला. आणि अलिशा चिनॉय शिवाय दुसऱ्या कुणाचाच आवाज मी इमैजीन नाही करू शकत या गाण्यासाठी.<br />
प्रेम जसं गोड गोड वाटू देतं , तसंच तळमळवतंही. अस्वस्थ करून टाकतं. तो किंवा ती आपल्यासोबत नसेल , तर सगळं कसं अर्थहीन होऊन जातं. मंद वाऱ्याची झुळूक पण त्रासवून सोडते. क्षणाचाही विरह सहन होत नाही. अतिशय सुंदर गाणं. अर्थपूर्ण लिरिक्स, शोभणारं संगीत. दुर्दैवाने डब्बा सिनेमा असल्यामुळे , गाणं पण डब्ब्यात गेलं.<br />
<br />
असो, जसं मी सुरुवातीला म्हणालो, की फारशी गाणी नसणार या यादीमध्ये , कारण प्रेमात असताना कुठलंही गाणं छानच वाटतं. त्यामुळे लवकर आटपत घेतोय. (डोकेदुखीमुळे पण फारसं लिहायची इच्छा होत नाहीये). पुढच्या पार्ट मध्ये … प्रेमानंतर… त्यात मात्र बरीच गाणी आहेत लिहिण्यासारखी. शोर्ट लिस्ट करायला वेळ लागेल थोडा …<br />
तोपर्यंत… अलविदा ! </div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-48233532056430062932014-10-12T08:11:00.000-07:002015-01-13T06:09:36.150-08:00गीत प्रेमायण… प्रेमात पडताना ( पार्ट १)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div style="font-style: normal;">
प्रेम म्हणजे प्रेम असतं .<br />
तुमचं , आमचं सेम असतं …<br />
<br />
प्रेम आणि गाणी, यांचा तसा बघायला गेलं तर खूप जवळचा संबंध. प्रेमात पडलेला माणूस काही विशेष गाणी खूप ऐकतो. वर अजून, आपल्या हिंदी पिक्चरचा परिणाम. एकापेक्षा एक गाणी आहेत प्रेमाबद्दल . प्रत्येक प्रसंगासाठी एखादं गाणं हमखास सापडेलंच. अशीच काही गाणी नेहमीसाठी लक्षात राहतात. असं, बऱ्याच दिवसांनी कधी एखादं गाणं ऐकण्यात येतं आणि मग रेशमाच्या लडी उलगडत जाव्यात तसा एखादा कालखंड किंवा प्रसंग डोळ्यासमोर परत उलगडत जातो. असं एखादं गाणं , वाऱ्याच्या हळुवार झुळूकीसारख्या मनावर कशा अलगद फुंकर मारून जातं. माझ्या आवडीची अशीच काही गाणी आणि त्या गाण्याबद्दलचं माझं मत किंवा एखादी आठवण कुठेतरी नोंदून ठेवावी अशी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण करतोय.<br />
<br />
माझ्या मते प्रेमाचा काळ ढोबळ मानाने तीन भागात विभागता येइल. प्रेमात पडताना, प्रेमात पडल्यावर आणि प्रेमानंतर ( म्हणजे एक तर लग्न किंवा दुसरं/पुढचं प्रेम !). हि गाणी एकदम जनरल आहेत. म्हणजे बरेच मित्र , मैत्रिणी, जवळची लोक , यांना वरच्या तिन्ही फेज मधून जाताना मी पाहिलेलं आहे. ज्या प्रकारचं संगीत ऐकण्यात येत असायचं ते किंबहुंना सारखंच असायचं. कोण जाणे , इथलं एखादं गाणं तुमच्याही आठवणीतली एखादी नाजूक तार छेडेल.<br />
<br />
<b>१) ना जाने मेरे दिल को क्या हो गया … </b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/GUn7Hvzmv-0?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br />
डीडीएलजे मधलं हे गाणं ! पडद्यावर कुणी प्रेम करावं तर ते शाहरुख खाननंच. तसा मी अमिताभचा भक्त आहे, पण रोमांटिक सीन्स मध्ये शाहरुख खरंच अनभिषिक्त बादशाह आहे. त्यातल्या त्यात हा पिक्चर आणि हे गाणं तर एकदम भन्नाट! पृथ्वीच्या पाठीवरची बहुतेक प्रत्येक प्रेम कहाणी कदाचित अशीच सुरु होत असेल. तो आणि ती. बऱ्याचदा, भिन्न स्वभाव. आणि काही कारणांनी एकमेकांसोबत बराच वेळ व्यतीत होतो. एकमेंकाशी बोलायला , सोबत वेळ घालवायला मन आतुर होतं. थोडावेळ ही तो किंवा ती नजरेआड झाली तर मनाला हुरुहूर लागून राहते. आरशात उगीच स्वतःला न्याहाळून बघण्यात तास न तास जातात. मनाला कळत नाही कि काय होतंय. मुखवट्या आडचे स्वभावाचे पैलू कळायला लागतात. आजुबाजूचं सगळं विसरायला होवू लागतं. हळूच नजरेच्या कटाक्षांची देवाण घेवाण सुरु होते. मनाला गुदुगुल्या होवू लागतात. सगळं जग कसं प्रसन्न वाटायला लागतं. आणि शेवटी तो दिवस उजाडतो वेगळं होण्याचा. पोटात गोळा येतो. मन भक्क उदास होऊन जातं. वाटतं कि वेळेनी इथेच थांबून जावं. पण आपण हतबल असतो.<br />
आणि नंतर अगदी ह्या गाण्यासारखं सगळं होऊन जातं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. उदित नारायण आणि लताने अगदी जीव टाकून गायलंय हे गाणं. गाण्याचे बोल, संगीत , गाण्याचं चित्रीकरण, शाहरुख , काजोल सगळं कसं अगदी छान जमून आलंय. काहीच त्रुटी नाहीयेत ह्या सगळ्यात.<br />
<br />
<b>२) यु सैंग टू मी … </b><br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/MY4YJxn-9Og?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br />
मार्क एन्थनी, एक असाच साधारण गायक. काही फारसा यशस्वी वगैरे नाही झाला तो. पण एक गाणं आहे त्याचं. प्रेमात पडणं म्हणजे काय ते अगदी सुंदरपणे उलगडून दाखवतो. बराचसा वेळ सोबत घालवलेला, पण पुढच्याला अगदी "फॉर ग्रांटएड" घेतलेलं. आणि एका दिवशी अचानक साक्षात्कार होतो की अरे आपण तर प्रेमात पडलोय. कळालं कसं नाही आपल्याला? त्याची किंवा तिची किंमत ती नसताना कळते. जाणीव होते की तिच्याशिवाय बाकी कशातच अर्थ नाहीये. सगळं कसं अर्थहीन वाटायला लागतं . मन बंड करून उठतं. आणि निर्धार पक्का होऊन जातो की मनातलं प्रेम बोलून दाखवायचंच. सुंदर गाणं आहे अगदी.<br />
<br />
<b>३) व्हेन यु आर गॉन … </b><br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/9wUMKD1Zp2E?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br />
ब्रायन एडम्स राजा माणूस आहे. देवाने संगीताची देणगी भरभरून वाहिलीय पदरात. बरीच चांगली चांगली गाणी गायली आहेत त्याने. एकापेक्षा एक. पण हे गाणं मला अगदी वेगळं वाटत. जाम आवडतं. स्वतःच्या मनाला फसवत असतो आपण कि प्रेम वगैरे सगळं झूट आहे. पण दुसरीकडे मन अस्वस्थ होऊन गेलेलं. रेडीओ वर एखादं गाणं लागतं , तिची आठवण ताजी करून टाकतं. वैतागून आपण रेडीओ बंद करतो. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट राहून न राहवून मनाला छेडायला लागते. आपण त्या विचारांपासून जेवढं दूर पळू तेवढ्याच तीव्रतेने बूमरयांग सारखे परत येउन आदळायला लागतात. मन हतबल होऊन जातं. वेड्यासारखं आपण त्याच नेहमीच्या रस्त्यांवर ती भेटेल या आशेनी उगीच चकरा मारायला लागतो. सगळ्या जवळच्या लोकांमध्ये असूनपण एकटेपण कुरतडायला लागतं. शेवटी मन हार मानतं. आणि परिस्थितीला सामोरं जातं. ती /तो परत येण्याची वाट बघत बसतं. प्रेमाने जग व्यापून टाकलेलं असतं. मनानी स्वतःला पुढच्याच्या स्वाधीन करून टाकलेलं असतं. सगळं नियंत्रण सुटलेलं असतं. प्रेमाची गाडी भन्नाट वेगाने दौडू लागलेली असते.<br />
<br />
<b>४) ये दिल … दिवाना … </b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/uLAZReIUR9w?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br />
सोनू निगमचं एक मास्टरपीस! बेताल झालेलं ह्र्दय. चुकतंय चुकतंय सांगून पण लहान मुलाप्रमाणे तिकडेच दुडूदुडू धावणारे मन. हजार वेळा समजावून पण न ऐकणारं हट्टी मन. स्वतःच्या पोराच्या सगळ्या चुका शेवटी पोटात घालतो त्याप्रमाणे अशा न ऐकणाऱ्या , हट्टी , जिद्दी मनाचं वर अजून कौतुक किती ते ! वर म्हणे काय करू , काही पाप थोडीच केलंय ह्या मनाने ! सांगतोय एवढं जीव तोडून , आता ऐकतच नाही तर काय करू? टेरिफिक आणि अगदी ठेका धरायला लावतं हे गाणं. माझा एक मित्र , क्यासेटच्या जमान्यात , दोन्ही साईड ला हेच गाणं रेकॉर्ड करून आला होता. आणि ती क्यासेट अविरत वाजत असायची टेपरेकोर्ड वर . सगळ्यांना अगदी तोंडपाठ झालेलं हे गाणं.<br />
<br />
<b>५) अब मुझे रात दिन … </b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/zmR1VFrMBo0?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br />
प्रेमात पडलेल्यांची कहाणी आहे हे गाणं. सोनू निगम चा मधाळ आवाज. ह्रदयाच्या आतून गायलंय गाणं हे पठ्ठ्यानी. कुणीतरी माझ्या माहितीतलं. प्रेमात पडलं होतं आणि हेच गाणं परत परत ऐकायचं. पुढच्याला मनातलं सांगता तर येत नव्हतं. खोदून खोदून विचारल्यावर बऱ्याच दिवसांनी सांगितलं आम्हाला काय झालंय ते. पुढच्याला बघितल्या / भेटल्या खेरीज मनाला चैन पडत नाही. ह्रदयावर कसलंच नियंत्रण राहत नाही. प्रियकर /प्रेयसी म्हणजे सर्वस्व होऊन जातं. सगळ्या कक्षा, बांध पार पाडून वेडेपण शिगेला पोचतं. मनाच्या वीणेच्या तारा मधुर ध्वनी करायला लागतात. प्रेमात वाहवून गेलेला असतो माणूस! सोनू निगम , टेक ए बो !<br />
<br />
<b>६) प्यार तो होना ही था … </b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/nSgpQjgn3Rs?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<br />
प्यार तो होना हि था. एक तद्दन भिकार चित्रपट. वर्षानुवर्षे अंघोळ न केल्यासारखा दिसणारा अजय देवगण आणि झोपाळलेली काजोल. ए फ्रेंच किस ची भिकारडी कॉपी. पण हे गाणं लाजवाब. हो हो , माहितीय मला गाण्याची सुरुवातीची ट्यून ब्रायन एडम्सच्या "हैव यु रिअली लव्हड अ वुमन" वरून उचललेली आहे. पण त्याच्यामुळे गाण्याचं महत्व कमी होत नाही. गाणं ऐकून कुणी प्रेमात नाही पडलं तर नवलंच. अतिशय इंटेन्स कि काय म्हणतात तसं आहे हे गाणं. नीट लक्ष देऊन ऐकाल तर गाण्यात जे सिम्पट्म्स आहेत ते कधीतरी तुम्हाला पण झाले असतील. कुणीतरी मला म्हणालं होतं कि प्रेमात पडल्यावर पुढच्याची अगदी चुकीची गोष्टसुद्धा एकदम छान वाटायला लागते. काहीही केलं त्याने /तिने , अगदी कसं गोड वाटायला लागतं. कदाचित म्हणूनच प्रेम आंधळं असतं असे म्हणत असावेत.पुढच्याचे सगळे प्रॉब्लेम्स आपले स्वतःचे वाटायला लागतात. स्वतःची प्रत्येक गोष्ट बैकफुट वर जाते, आणि पुढ्च्याचे साधे साधे प्रॉब्लेम्स कसे सोडवावेत ह्याचा विचार करण्यात सगळी एनर्जी खर्ची पडते. पुढच्याच्या चेहऱ्यावर एक साधे हसू बघून जग जिंकल्याची , आत्यंतिक समाधानाची फिलिंग येते. प्रेम एकदा तरी करावं बघून!<br />
<br />
<b>७) क्या करे क्या ना करे … </b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/JTF9wpICQ80?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<br />
प्रेमात पडलेल्या सगळ्यांची म्हणजे अगदी शंभर टक्के लोकांची हि स्थिती कधी न कधी तरी झाली असेल. आता किती जणांचं मनातच राहिलं आणि किती जणानी बोलून दाखवलं तो हिशेब वेगळा. सगळं ठीक आहे हो प्रेम झालं वगैरे , पण सांगायचं कसं ? सगळ्यात अवघड पार्ट कुठला असेल तर हाच. रेहमाननी सोनं केलंय ह्या गाण्याचं. प्रेमवीराच्या मनातली उलथापालथ ह्या गाण्यापेक्षा जास्त परिणामकारक रीतीने व्यक्त नसेल करता येणार. रोज मन ठरवत असतं आज बास झालं काही झालं तरी सांगून टाकायचं , आणि तो/ती समोर आला की शब्दच फुटेनासे होतात. गिळलेल्या आवंढयासोबत शब्दही गिळले जातात. तोंडाला कोरड पडते. हातपाय थरथरायला लागतात. आणि प्रेम व्यक्त करायचं उद्यावर पोस्टपोन होवून जातं. दिवसांमागून दिवस जातात आणि मन पिळवटून निघायला लागतं. सैर भैर होऊन जातो जीव. राम गोपाल वर्मा , जागे व्हा! प्लीज असे काहीतरी सिनेमे बनव. काय करून घेतलयंस स्वतचं ?<br />
<br />
असो , असा प्रवास पूर्ण होत , कधीतरी प्रेम व्यक्त केलं जातं. पुढ्च्यानी स्वीकार केला तर फेज टू मध्ये जातं. नाहीतर मनातंच राहून जातं. नकार दिला तर कुणी देवदास बनतं. तर कुणी रिपीट अटेम्पट करत फेज १चाच परत !<br />
<br />
गाडी दुसऱ्या टप्प्यावर जेव्हा जाउन पोचते , तेव्हा वेगळीच गाणी ऐकली , गुणगुनली जातात. पुढचा पार्ट त्याच्यावरच लिहीन. तोपर्यंत … अलविदा !<br />
एखादं तुमच्यापण ह्रदयाच्या अगदी जवळचं गाणं असेल तर कॉमेंट मध्ये टाकायला विसरू नका , नक्की!</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-24720636791812219432014-10-01T18:13:00.001-07:002015-01-13T06:09:36.144-08:00बरसात कि एक रात !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div style="font-style: normal;">
फ़र्रकन्न काडी पेटवून शिंदे काकांनी मेणबत्ती पेटवली, आणि परत पानाला चुना लावायला सुरुवात केली.</div>
<div>
"<i>पावसानं वाट लावलीय राव, आणि वर ह्या लाईटचा लपंडाव! धंद्याची वाट लागलीय.</i>" शिंदे काका म्हणाले.<br />
<br /></div>
<div style="font-style: normal;">
समीर, दया, संदीप आणि मकरंद हे चौघं रूममेट्स. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. आजही रोजच्या प्रमाणं, जेवण करून टपरीवर पोचलेले. गल्लीत, स्पेशली त्या एरियामधलं, एकुलत एक पानाचं दुकान होतं शिंदे काकाचं. रोज, मेसवर जेवण झाले कि एक मस्त पान आणि सिगारेट ठरलेली पोरांची. इथेच थांबून इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. आणि मग रूमवर परत.</div>
<div>
"<i>धंदा कसला बुडतोय ह्याचा, आपल्याशिवाय कुणी गिऱ्हाईक तरी येतंय का ह्याच्या टपरीवर.</i>" दया पुटपुटला. </div>
<div>
"<i>ओ काका, अहो सुपारी टाका ना जरा हात मोकळे सोडून, रोज काय कंजुषी करता?</i>" समीर म्हणाला. पानात सुपारी जास्त लागायची त्याला. </div>
<div>
<i>"अरे समीर, सुपारी महाग झाल्याय खूप, नाही परवडत. "</i></div>
<div>
"<i>असली चिन्धिगिरी करतो हा ह्रिथिक, म्हणून तर टपरी चालत नाही याची.</i>" समीर वैतागून हळूच म्हणाला. </div>
<div>
<div style="font-style: normal;">
शिंदे काकांच्या उजव्या हाताला सहा बोटं होती. म्हणून तो ह्रिथिक …. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
असो… पावसानी आता उग्र रूप धारण केले होते. पत्र्यावरच्या थेंबांच्या आवाजामुळे एकमेकांचा आवाजही ऐकू येत नव्हता. सिगारेट पाण्यामुळे चुकून उगीच वाया गेली असती, म्हणून लगेच रूमवर जायचा प्लान ठरला. तोंडात पान टाकून चौघही रूमकडे वळले. लाईट गेली होती, चाचपडत, अंदाज घेतच रुममध्ये वावरत होते सगळे . मेणबत्ती, टोर्च, काही सापडत नव्हतं. सिगारेटी फुंकून झाल्या, तोवर दयाने बाजूच्या रूममधल्या विशाल कडून एक बारीक मेणबत्तीचा तुकडा मिळवला. त्या मिणमिणत्या प्रकाशाने, रुममध्ये जरा बरे वाटायला लागले. समीरने वौकमन मध्ये '<i>किशोर के दर्दभरे नग्मे'</i> लावले आणि त्या छोट्याश्या स्पीकरमधनं किशोर आपल्या मुलायम आवाजात गायला लागला. लाईट गेलेली, त्यामुळे अभ्यास तर अशक्यच होता, आता काय करावे हा प्रश्न सगळ्यांसमोर आ वासून पडला होता. </div>
<div>
<i>"चला, पत्ते खेळू यार!" </i></div>
<div>
<i>"कंटाळा आला रे पत्त्यांचा. आणि त्यावर तो चौकट गुलामचा पत्ता पण गायब आहे."</i></div>
<div>
<i>"आणि अंधारात हळूच दुसऱ्याची पानं पण चोरून बघता नाही येणार. ही ही!"</i></div>
<div>
<i>"चौकट गुलाम ,खालच्या मजल्यावर चौकट राणी कडे गेला असेल."</i></div>
<div>
<i>"चौकट राणी ? कोण, ती खालची ब्रम्हे काकू ?"</i></div>
<div>
<i>"हो ना . अरे तिचा चेहरा एकदम त्या चौकट राणी सारखा दिसतो. कोईरालांची मनीषाच एकदम! आणि भरीस भर म्हणून ब्रम्हे काका एकदम त्या चौकट राजा मधला दिलीप प्रभावळकर सारखा आहे. म्हणूनच म्हटलं, कि चौकट गुलाम गेला असेल तिकडे…. गुलामी करायला! "</i></div>
<div>
<i>"सभ्य व्हा पोरांनो. काकूंना ऐकू आलं खालच्या मजल्यावरून, तर अवघड आहे आपलं."</i></div>
<div>
<i>"हो ना यार, लेडी अमिताभ आहे ती. आणि उंची पण त्या लंबू अमिताभ सारखीच आहे. खाली थांबली तरी वरच्या मजल्यावरचं दिसत असेल तिला. "</i></div>
<div>
<i>"बहुतेक, आईच्या पोटात असताना सुद्धा आईच्या बरगड्यांना पकडून लोंबकळायची वाटतं. कसली ताडमाड आहे बघ ना!"</i><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
</div>
<div>
<i>"असो … काय रे , संद्याचं पोट खराब झालाय दिसतं. सारखं पळतोय संडासाकडे. "</i></div>
<div>
<i>"पावसाळ्यात पाणी पुरी खाऊन दुसरं काय होणार. मानसं कमी आणि डुक्कर जास्त असतात त्या भेळच्या गाडीभोवती. "</i></div>
<div>
<i>"अरे अंदर कि बात ये है की, त्या सवितासाठी झुरतंय रे ते येडं , दिवसभर तिच्या झेरोक्सच्या दुकानांसमोर थांबलेलं असतंय . मेक्यनिक्स च्या सेम नोट्स च्या रोज झेरोक्स काढून घेतो तिच्याकडून. येडं झालंय पार तिच्या प्रेमात. दुकानासमोरच्या त्या भेळपुरीवाल्याकडे दिवसभर चरत असतंय."</i></div>
<div>
<i>"अरे, संद्या जेवढा चुत्या, तेवढीच ती स्मार्ट पोरगी आहे. सगळ्या पोरांना तसंच भुलवते ती. तूच विचार कर,बाजूच्या सुयोग झेरोक्स मध्ये काळं कुत्रं नसतं. आणि ह्या सविताकडे मोठ्ठी रांग. गेलं की, अशी मुरकुन हसते यार, कोऱ्या पानाची पण झेरोक्स काढून घेतील लोकं. "</i></div>
<div>
<div style="font-style: normal;">
तेवढ्यात संद्या परत आला. पार गलितगात्र झाला होता जाऊन जाऊन.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
"<i>एक भन्नाट आयडिया आहे माझ्याकडे! प्लांचेट करूया आपण. मागच्या वर्षी, अहमदाबादला माझ्या मामाने केले होते. माझ्या आज्जीच्या आत्म्याला बोलालावलेले. खूप धम्माल आली होती.</i>" समीर बोलला.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>काय? आपला विश्वास नाही भूताखेतावर , नुसता टाईमपास असतो!. आपल्याला नाही करायचे</i>" मकरंद म्हणाला.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>अरे, खरंच सिरियस असतं सगळं , आज्जीने आम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तर सांगितली. जाताना म्हणाली आजोबांशिवाय करमत नाही. लवकर या! आजोबांनी नंतर लय शिव्या घातल्या मामाला, प्लांचेटच्या भानगडीसाठी. पण, गेले खरंच दोन महिन्यात, ते पण!</i>"<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>होय रे, मी पण ऐकलंय. पण फाटली आहे माझी. आधीच अंधार, लाईट गेलेली, मुसळधार पाऊस पडतोय. वर भूतांना बोलावयाचे म्हणजे …. जाऊदे, यार दुसरं काहीतरी प्लान करू. पोटात कळ येतेय नुसता विचार करूनसुद्धा</i>." इति संदीप .<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>चला बे, खरंच करू समऱ्या म्हणतोय तसं. माझी पण बऱ्याच दिवसांपासून इच्छा आहे प्लांचेट करायची.</i>" दयाने पण संमती दर्शविली.<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
हो-नाही म्हणता म्हणता सगळेजण तयार झाले. सगळी सूत्रं समीरकडे होती. अनुभव होता ना त्याच्याकडे! भराभरा एका पांढऱ्या कागदावर A टू Z बाराखडी , चार शब्दं मोठ्या अक्षरात - "येस", नो","हाय","गुड बाय" आणि १ ते १० आकडे काढले.</div>
<i>"अरे, ते सगळं खरं , पण बोलवायचं कोणाला ?</i><span style="font-style: normal;">" समीर म्हणाला.</span><br />
<i>"हं , नातेवाईक वगैरे नको यार. असंच कुणीतरी सेलिब्रिटी बोलावू. "</i><br />
<i>"आयडिया चांगली आहे, संजीव कुमार, अमजद खान, नर्गिस?"</i><br />
<i>"ए बाबा, तो अमजद खान वगैरे नको. काही आत्मे म्हणे एकदा आले कि जात नाहीत परत लवकर. काहीतरी मागतात म्हणे परत जाण्यासाठी. एक वाटी रक्त , एखादा दात वगैरे असलं काही"</i><br />
<i>"हो ना तिच्यायला, जर जाताना म्हणाला, ये हाथ मुझे दे दे दया, तर काय करायचं ?"</i><br />
<i>"हो ना चड्डी पिवळी होईल तसं काही मागितलं तर!"</i><br />
<i>"बघ ना , आणि बदलता पण नाही येणार कारण तो खवीस गब्बर हात पण घेऊन गेला असेल, ! ही ही "</i><br />
<i>"एक सुचलंय, किशोर कुमार…, कसं वाटतंय ? बोलवायचं का त्याला. हे बघा, आपल्या सगळ्यांचा फेवरेट तर आहेच. आणि, कसं जरा, प्रेमळ मवाळ व्यक्तिमत्व आहे. मस्त गमती जमती सांगेल. बोला पटतं का ?" - समीर. </i><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>ये हुई ना बात !! हो हो त्यालाच बोलावू."</i><br />
<div style="font-style: normal;">
एकमताने, सगळ्यांचा निर्णय झाला कि किशोरच्या आत्म्याला येण्याचे आवाहन करायचे. एक-दोन तास गप्पा मारू, प्रश्न विचारू आणि मग जायला सांगू.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>आता सिरियस व्हा रे सगळ्या जणांनी. डोळे मिटा , ह्या कॉईन वर आपलं एक बोट अलगद ठेवा आणि मनापासून किशोर कुमारचा धावा करा</i>." समीर म्हणाला. <br />
<div style="font-style: normal;">
त्या अल्फाबेटस आणि नंबर्स लिहिलेल्या कागदावर दोन रुपयाचे नाणे ठेवले होते. सगळ्यांनी एक एक बोट त्या नाण्यावर ठेवले. एकदा का आत्मा आला, आणि बोलायला लागला, कि ती कॉईन आपोआप फिरेल म्हणे. जाम उत्सुकता लागली होती प्रत्येकाला, की आता पुढं काय होइल? संदीपच्या पोटातली कळ जाऊन आता मोठ्ठा गोळा आला होता.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>एक सांग, किशोरला हिंदीत बोलवायचं कि मराठीत? तसं किशोरनी मराठीत पण गाणी गायलीत म्हणा, पण मराठी कळतं की नाही काय माहिती?</i>" मकरंदची एक उगीच आपली शंका.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>अबे आत्मा आहे तो. सगळ्या भाषा येत असणार"</i> दयाने ज्ञान पाजळले.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>तुला काय माहिती रे? कुठला आत्मा ओळखीचा आहे तुझा ?"</i><br />
<i>"आहे ना, तो…. मेस मध्ये जेवण वाढणारा आत्माराम , ख्या ख्या ख्या !"</i><br />
<i>"मनातून धावा करा की रे. जी भाषा येते त्यातनं. काय येडझवेपणा लावलाय? सिरियस व्हा म्हणून सांगतोय कधीपासनं!" </i><span style="font-style: normal;">समीर डाफरला.</span><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
सगळे मनापासून धावा करायला लागले किशोरचा. ते भेसूर वातावरण, बाहेरचा मुसळधार पाऊस , नाही म्हटलं तरी प्रत्येकाची थोडी टरकली होतीच. भीती , उत्सुकता , कुतुहूल, काहीतरी नवीन करण्याची हौस , अशा सगळ्या भावनांचे ढग प्रत्येकाच्या मनात दाटून आले होते. २-३ मिनिटं गेली असतील, आणि अचानक कॉईन हलली. सगळ्यांची कॉईनवरची बोटंपण हळूहळू सरकायला लागली. प्रत्येकाने, आश्चर्याने खाली पहिले. कॉईन हळू हळू "हाय" कडे सरकत होती. सगळ्यांचा मूड चेंज झाला होता. "हाय" वर येउन थांबली कॉईन. किशोरनी आगमनाची वर्दी दिली होती. काहीतरी अतर्क्य , थरारक घडत होतं.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
</div>
<div>
"<i>आता रे समऱ्या, काय करायचं?</i>" घशातला आवंढा गिळत मकरंदनी विचारलं.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>मला पण कळेनासं झालंय राव. बघू खरंच किशोरच आहे का. </i>"<br />
<span style="font-style: normal;"> "</span><i>किशोरदा, स्वागत है आपका. अगर आप ये सून रहे है, तो क्या आप हमे आपका असली नाम बता सकते है?</i>"<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>A….B….H….A…A….S</i>" कॉईन फिरली.<br />
<i>"धन्यवाद , और शादीया कितनी की थी आपने कुल मिलाकर?"</i><br />
<div style="font-style: normal;">
कॉईन "४" वर जाऊन थांबली.</div>
<div style="font-style: normal;">
किशोर कुमार आल्याची खात्री पटली होती सर्वांना.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>वो तुम्हारी सही मे रफी के साथ दुष्मनी थी क्या?</i>" कुणीतरी भोचक प्रश्न विचारला.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>NO</i>" - कॉईन.<br />
<i>"दुष्मनी कसली, रफी एनी टाईम बेटर होता राव किशोरपेक्षा!</i><span style="font-style: normal;">", संद्या - आमच्यातला एकुलता एक रफी फैन कुजबुजला.</span><br />
<i>"किशोरदा, चारो बिबियोमे ,सबसे ज्यादा किसको प्यार करते थे आप?"</i><br />
<div style="font-style: normal;">
२ मिनिट गेले, कॉईन हलेचना. प्रश्न दोन-तीनदा विचारून झाला पण कॉईन हलायला तयार नाही.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>एवढ्या रात्री कशाला बोलावलं , झोपले कि काय किशोरदा?"</i><br />
<i>"गप्प ए, बहुतेक लय पर्सनल प्रश्न विचारला काय आपण ?"</i><br />
<i>"नाही रे, जनरली आत्मे त्यांची थट्टा उडवली, अपमान केला, की नाराज होतात. बहुतेक मगाशी संद्या म्हणाला कि रफी चांगला होता तुझ्यापेक्षा, त्याचा राग आलाय वाटते किशोरदांना!"</i><span style="font-style: normal;"> समीरने माहिती पुरविली.</span><br />
<i>"थांब , त्यांनाच विचारून बघु. किशोरदा, क्या आप संदीप से नाराज है?"</i><br />
<i>"YES" </i><span style="font-style: normal;">- कॉईन.</span><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>क्या आप उसे पनिशमेंट देना चाहेंगे?"</i> समीरची अतिहुशारी.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>YES</i>" - परत कॉईन.<br />
<i>"बोलिये दा! जो बोलोगे वोह मंजूर है , काय हो कि नाही रे संद्या"</i><br />
<div style="font-style: normal;">
संद्याची मान नुसतीच डोलली. अचानक खोलीतल्या पसरलेल्या दुर्गंधीने सगळ्यांनी नाक आक्रसून घेतली. संदीपचा पराक्रम असावा तो.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>जाऊदे रे घाबरू नको, ऐकून तर घेऊ किशोरदा काय म्हणतायत ते."</i><br />
<i>"K…O…M…B….A….D…..A"</i><span style="font-style: normal;"> - कॉईन.</span><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>बहुतेक, कोंबडा व्हायला सांगतायत. चला संदीपराव, पक्क पक्क पक्काक!"</i><br />
<i>"अरे पण किती वेळासाठी. कितनी देर के लिये जी?"</i><br />
<i>"१…०…. M… I … N</i><span style="font-style: normal;">"- कॉईन.</span><br />
<div style="font-style: normal;">
संद्या बसला कोंबडा होऊन. दुर्गंधीला सरावून जाणार होती सगळ्यांची नाकं बहुतेक. कारण ,आधीच संद्याचं पोट खराब आणि वर तो कोंबडा बनलेला. आता कोंबडा तर आरवनारच ना? त्याला कोण थांबवू शकणार.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
किशोरला बरीच प्रश्न विचारली जावू लागली. सगळी बहुतेक त्याच्या फिल्म्स आणि खाजगी जीवनाबद्दल होती . सगळ्यात आवडीचं गाणं कुठलं, ड्यूएट कुणासोबत गायला आवडायचं, आवडीचं सुट्टीचे ठिकाण कुठले, लता-आशा मध्ये नक्की खरंच सगळं आलबेल आहे का बिनसलेलं आहे. सगळ्यांनी अगदी भंडावून सोडलं किशोरला. सगळेजण जाम खुश झाले होते. प्लांचेट खरंच असतं राव. किशोर सगळी उत्तर अचूक देत होता. समीर होताच ना पडताळणी करायला. किशोरभक्त होता अगदी तो. </div>
<span style="font-style: normal;">"</span><i>झाली का रे दहा मिनिटं ? आता कंट्रोल नाही होत!</i>" संद्या कण्हत ओरडला.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>हो हो अरे विसरलोच आम्ही तुला, सोड आता कोंबडा. ये बस इकडे"</i><br />
<i>"बसायचं , पण कमोडवर आधी… "</i><span style="font-style: normal;"> म्हणत संद्याने धूम ठोकली.</span><br />
<span style="font-style: normal;">वौकमन मधली कैसेट संपली तेवढ्यात '</span><i>किशोर के दर्दभरे नगमे</i>' ची . समीर बदलायला उठला, तेवढ्यात मकरंद म्हणाला,<br />
<i>"समऱ्या, यार आलीशा चिनॉयचं मेड इन इंडिया लाव रे. बोर झाले ते नग्मे ऐकून. "</i><br />
<div style="font-style: normal;">
आपण काय बोललो ते कळाले आणि जीभ दाताखाली चावली मकरंदने. पण फार उशीर झाला होता. सजा तो बराबर मिलनेवाली थी. पुढच्या दोन तीन प्रश्नांना किशोर परत रुसून बसलेला. पुन्हा किशोर के नग्मे लावले तरी कळी खुलेना.</div>
<span style="font-style: normal;">हताश होऊन समीर म्हणाला "</span><i>किशोरजी , लगता है, मक्याकी उस बात पे नाराज हो गये आप, लेकिन प्लीज बात किजिये हमसे आप. चाहे जो सजा दे दिजीये मक्या को !</i>"<br />
<div style="font-style: normal;">
संद्या आपली चौथी फेरी आटपून आला होता. जाम उत्सुकतेने ऐकायला लागला.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>C …A….B…R….E</i>" - कॉईन.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>म्हणजे काय रे ?"</i><br />
<i>"अरे कैब्रे डान्स म्हणायचं असेल बहुतेक. "</i><br />
<i>"अरे पण स्पेलिंग cabaret आहे."</i><br />
<i>"जाउदे रे इंग्लिश चांगलं नसेल त्यांचं एवढं. भावनाओं को समझ मेरी जान. " </i><br />
<i>"कैब्रे डान्स, नाही नाही शक्य नाही ते" </i><span style="font-style: normal;">- मकरंद म्हणाला.</span><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>आपलं काय चालणार बाबा , जे सांगितलं ते तर करायलाच पाह्यजे. आत्म्याची नाराजी नको ओढवून घेऊ ना. साडेसाती लागलं उगीच मागं!</i>" दयाने सुज्ञ सल्ला दिला.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>मी टौर्च मारतो अंगावर तुझ्या बंद चालू बंद चालू. म्हणजे इफेक्ट येईल कैब्रेचा. "</i><br />
<i>"आणि हो गाणं! ते रात बाकी लाव रे दया. नमक हलालची कैसेट पडलीय तिथंच बघ"</i><br />
<i>"अर्रे , पण कपडे ? कैब्रेची खरी स्पेशालिटी आहे कपडे. किशोरदा नाराज होऊन अजून अवघड पनिशमेंट द्यायचे नाहीतर.</i><span style="font-style: normal;">" समीर ने सुचवले. </span><br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
मकरंदची पार फाटली होती, किशोरला खुश करायला काहीही करण्याची तयारी झाली होती. मगाचा तो भूताखेतांवरचा अविश्वास वगैरे, कुठल्या कुठे पळून गेलं होतं. जाम भीती वाटायला लागली होती.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>टू पीस पाहिजे. त्याशिवाय मज्जा नाही. कैब्रे कसा कैब्रे सारखा वाटला पाहिजे."</i><br />
<i>"आता खालचा एक पीस तरी आहे VIP माझी, पण वरचा पीस कुठून आणायचा?"</i><br />
<i>"कंचुकी ? हात तिच्या , खाली दोरीवर वाळू घातली असेल. ब्रम्हे काकूंनी. घेऊन ये"</i><br />
<i>"गप्प ए, काही काय!"</i><br />
<i>"हो अरे दोन तर आहेत त्यांच्याकडे. एक लाल आणि निळा ब्लाउज. एक तरी नक्की सापडेल."</i><br />
<i>"मी आणतो , मी आणतो"</i><span style="font-style: normal;"> , म्हणत दया पळत सुटला खाली. मोठ्या शिताफीने, कामगिरी फत्ते करून, एका हातात लाल ब्लाउज घेऊन हजर झाला.</span><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>दोन्ही होते दोरीवर, पण म्हटलं कैब्रे ला लाल जास्त सूट होईल."</i><br />
<i>"दोन्ही ? मग आज काय घातलं… "</i><br />
<i>"गप्प बसा रे" </i><span style="font-style: normal;">वाक्य कापत , विषय तिसरीकडेच चाललेला पाहून समीर खेकसला. </span><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>चला चढवा टू पीस मकरंद उर्फ परवीन बाबी , आणि करा सुरु"</i><br />
<div style="font-style: normal;">
खट्टकन, टेप चे बटन दाबले गेले. आशा आपल्या मादक आवाजात गायला लागली.</div>
<i>"रात बाकी …. बात बाकी … होना है जो … हो जाने दो. "</i><br />
<div style="font-style: normal;">
कैब्रे येतोय कुणाला? चित्रविचित्र अंगविक्षेप करत, त्या टू पीस वर मकरंद नाचायला लागला. समीर शिताफीनं टोर्च चमकवत होता. घुसळनारी कंबर, कसनुशी खाली वर होणारी ती लाल ब्लाउज मधली छाती, चेहऱ्यावरचे मादक(?) हावभाव, अगदी बरोबर जागा हुडकून टोर्च मारत होता समीर. परवीन बाबीच्या भुताने जर तो डान्स पहिला असता तर परत आत्महत्या केली असती. हसून हसून मुरकुंडी वळली होती सगळ्यांची. डोळ्यात पाणी आलं होतं. पोटात दुखायला लागलं होतं. पाचवी फेरी मारावी लागणार होती संदीपला बहुतेक.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
गाणं संपल्या संपल्या अंगावरची पाल झटकावी तसं ते ब्लाउज काढून फेकून दिलं मकरंदने. लगबगीने कपडे चढवले अंगावर. पण घाई घाईत काढताना टर्रकन फाटलं ते ब्लाउज.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>जाउदे, एक काम करू, इथेच कचऱ्यात फेकून दे. घेईल नवीन शिवून ती. "</i><br />
<i>"अरे पण दोनच आहेत न त्यांच्याकडे?"</i><br />
<i>"तुला काय एवढी चिंता, बघतील काय करायचं त्या."</i><br />
<div style="font-style: normal;">
असं म्हणून त्या ब्लाउज ची रवानगी कचरापेटीत झाली.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>निळू फुले असणार काकू आता आठवडभर!"</i><br />
<i>"म्हणजे?"</i><br />
<i>"म्हणजे एकाच ब्लाउज वर …. निळ्या फुला फुलांच्या! ही ही"</i><br />
<div style="font-style: normal;">
ओशाळलेल्या चेहऱ्याने येउन बसला मकरंद कॉईन वर बोट ठेवून. मात्र ,किशोर कुमार जाम फिदा झाले होते वाटत डान्स बघुन. प्रश्नांची भराभरा उत्तर देत होते. सगळेजण भारावून गेले होते.</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<span style="font-style: normal;">"</span><i>किशोरजी, अब आपसे क्या छुपाना, वो सविता झेरॉक्स वाली सवितापे दिल आ गया है अपना. लेकिन उसके मन मे क्या है कुछ समझ नही आ रहा. आपही बोलिये क्या किया जाये? क्या मुझसे भी उतनाही प्यार करती ही वो?</i>" संदीपने विचारले.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>YES</i>" - कॉईन.<br />
<div>
"<i>तो क्या करू मै आगे? आप ही कुछ सुझाइये</i>" संद्या सातव्या आस्मानावर होता. हुरळून गेला होता अगदी. </div>
<div>
"<i>H….O….L….D….H….E….R…..H….A….N….D"</i> - कॉईन </div>
<div>
"<i>धन्यवाद किशोरदा! लाईफ बन गयी अपनी तो. कल ही जाकर उसका हात पकडता हुं, और बोल देता हुं उसे. और एक बात… आजसे रफी गया तेल लगाने. आप हि मेरे भगवान हो. मेरे फेवरेट सिंगर हो. "</i></div>
<div>
<i>"अच्छा, किशोरदा आप ये बताइये , हम मे से सबसे छोटा दिल किसका है?"</i></div>
<div>
<i>"D….A….Y….A"</i> - कॉईन तत्परतेने उत्तरली. </div>
<div>
"<i>काय रे काय विचारलंस? क्या छोटा है? ऐकू नाही आलं मला. </i>" दया वैतागून म्हणाला. बाकी सगळे वेड्यासारखे हसत होते. </div>
<div>
<i>"अरे, आपलं ते हे… दिल विचारलं मी" </i></div>
<div>
<i>"खरंच ना समऱ्या?"</i></div>
<div>
<i>"अरे हो रे बाबा , तुला काय वाटलं"</i></div>
<div>
<i>"काही नाही , कुठं काय , जाउदे". </i></div>
<div>
<i>"सगळेजण माझ्याकडून पैसे उसने घेतात, आणि किशोर म्हणतो, माझं मन छोटं आहे. साठी बुद्धी नाठी झाली काय किशोरदा?"</i> जाम वैतागून गेला होता दया.<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
</div>
<div style="font-style: normal;">
बास…… ! वयाच्या उल्लेखाने किशोरदांचा मूड परत घालवला. काही केल्या दाद देईनात. परत जा म्हटलं तर परत जायला तयार नाहीत. </div>
<div>
दयाकडे पाहून स्वतःचे कान पकडत मकरंदनी विचारले. "<i>दया से नाराज हो आप किशोरदा?</i>"</div>
<div>
"<i>YES</i>" - कॉईन.</div>
<div>
"<i>कुछ पनिशमेंट देना चाहेंगे ?"</i></div>
<div>
<i>"H….I….T…Y…O….U…R…S….E….L…..F</i>" - कॉईन.</div>
<div>
"<i>कितनी देर के लिये ,किशोरदा?"</i></div>
<div>
<i>"५…. M… I … N</i>"- कॉईन उत्तरली.<br />
<div style="font-style: normal;">
खाडखाड आपल्या गालात वाजवून घ्यायला लागला दया. भीतीने गाळण उडाली होती त्याची. हसून हसून बाकीच्यांचा जीव कासावीस झाला होता. तिरमिरीत दयाला काय झाले काय माहिती, आणि धाड्कन त्याने लोखंडी कपाटावर डोके आपटून घेतले. जोरात लागले बहुतेक. निपचित होऊन पडला.</div>
<div style="font-style: normal;">
मकरंदने पळत जाऊन एका मगात पाणी आणले आणि त्याच्या तोंडावर शिंपडले. दया खडबडून उठून बसला.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>झाली का रे पाच मिनिट ?"</i><br />
<i>"हो हो झाली. डोंट वरी"</i><span style="font-style: normal;"> समीर म्हणाला.</span><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>यार, बास झाले , परत पाठवू किशोरदान्ना!</i>" संदीप म्हणाला. सगळ्यांचा माना होकारार्थी डोलल्या.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>हो यार, बास झाले. पटले आपल्याला प्लांचेट खरे असते ते. पण जायला सांगू त्यांना आपण.</i>"<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>ओके. किशोरदा आप से बाते करके हमे बहोत अच्छा लगा. अब हम आपको जादा तकलीफ नाही देना चाहते. आप जा सकते ही अभी. प्लीज चले जाइये.</i>" समीर ने विनवणी केली.<br />
<div style="font-style: normal;">
सगळेजण मनातून धावा करू लागले. किशोरदांची विनवणी करू लागले कि त्यांनी परत जावे. पण कॉईन काही "गुड बाय" वर जायला तयार नाही. च्यायला आता रक्त बिक्त मागतो काय हा परत जाण्यासाठी , असा विचार करून सगळ्यांची टरकली.</div>
<i>"क्या चाहिये किशोरदा आपको? जाने से पेहले क्या कुछ सेवा कर सकते ही आपकी?"</i><br />
<div style="font-style: normal;">
हळू हळू कॉईन फिरू लागली.</div>
<i>"M… I….L…K".</i><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>अरे पण दुध कुठून आणायचे आत्ता?"</i><br />
<i>"च्यायला, ११:३० वाजता कात्रज डेअरी च्या बाजूच्या त्या टपरी वर जावे लागणार. बाकी तरी कुठे दुध मिळायचा चान्स नाही".</i><br />
<i>"एक काम करू, दया आणि मकरंद, तुम्ही दोघं जाऊन या दुध घेउन. संद्याची तर काही परिस्थिती नाहीये. मी सांभाळतो किशोरदान्ना तोवर. गाणे वगैरे ऐकवतो."</i><br />
<span style="font-style: normal;">"</span><i>ओके</i><span style="font-style: normal;">", म्हणून गाडी काढून दया आणि मकरंद निघाले. तशा मुसळधार पावसात कात्रज डेअरीला जाणे म्हणजे दिव्य होतं एक. अर्ध्या तासांनी दुधाची बाटली घेऊन परत रूम वर पोचले. थोडं दुध एका वाटीत काढलं समीरने आणि त्या प्लांचेटच्या कागदाजवळ ठेवलं.</span><br />
<i>"आपकी इच्छा के मुताबिक दुध हाजीर है किशोरदा!"</i><br />
<div style="font-style: normal;">
२ मिनिटांनी कॉईन परत हालली "गुड बाय !". शेवटचं हलली ह्या वेळी.</div>
<div style="font-style: normal;">
धाड्कन सगळ्यांनी बेडवर अंग टाकून दिलं. एका फारच अवघड प्रसंगातून सुटका झाल्यासारखे वाटत होते. किशोर कुमारने वाट लावली होती सगळ्यांची. एकमेकांशी एक अक्षरही न बोलता शांत पडून होते चौघंही. प्रत्येकाच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं.</div>
<span style="font-style: normal;"><br /></span>
<span style="font-style: normal;">"</span><i>भुतं खेतं असतात म्हणजे तर. आज विश्वास बसला आपला. परवीन बाबी केली आपली आज किशोरनी.अरे हो </i><i>आणि ब्रम्हे काकू बाजूच्या "डीलक्स टेलर" कडे जाणार उद्या. उद्या, ब्लाउज गायब आहे हे कळल्यावर काय चिडतील ना त्या?</i>" मकरंद विचार करत होता.<br />
<span style="font-style: normal;"><br /></span>
<span style="font-style: normal;">"</span><i>सविता मेरी जान! आज किशोर कुमारांनी सिग्नल दिलाय. उद्या येउन हळूच तेरा हाथ थामुंगा मै. बहोत इंतेजार करवाया जालीम तुने. इतना चाहती थी मुझे, कभी इकरार किया होता. जाउदे येतोय उद्या मी. च्यामारी, पण भीती खूप वाटतेय भूतांची. पोटात एवढ्या कळा येतायत पण एकट्याला संडासकडे जायची भीती वाटतेय. असं वाटतंय कि दार उघडलं तर समोर कमोडवर किशोरदांचं भूत बसलेले असेल असं माईक वगैरे हातात घेउन. नकोच च्यायला, जातील कळा आपोआप थोड्या वेळानी. असू देत.</i>" संदीप च्या डोक्यात चक्र चालू होते.<br />
<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>लय मार लागलाय राव. येड्यासारखं हाणून घेतलं आपण पण गालात फाड फाड. डोक्याचं टेन्गुळ कसलं विनोदी दिसतंय. बरं झालं थोडक्यात निभावलं. अजून काही करायला नाही सांगितलं किशोरच्या भूतानी. पण एक प्रश्न जीव खातोय राव, ते सगळ्यात छोटं , नक्की 'दिल'बद्दलंच विचारलं होतं न समऱ्यानी? नीट ऐकू नाही आलं.</i>" दयाला झोप येत नव्हती.<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
समीर उठला, ग्लास मध्ये दुध ओतलं.</div>
<span style="font-style: normal;">"</span><i>कुणी पिणार का रे दुध?</i>" सगळे गप्प. हुं नाही कि चू.<br />
<span style="font-style: normal;">गटागटा दुध पिऊन घेतले. जाऊन वौक्मन वर किशोर के दर्दभरे नगमे परत लावले. दया,संदीप आणि मकरंद एकदाच ओरडले "</span><i>बंद कर यार समऱ्या त्या किशोरची गाणी. झोपूदे आता निवान्त… प्लीज.</i>"समीर तसाच बेडवर जाउन पडला.<br />
<span style="font-style: normal;">"</span><i>च्यायला, जाम घाबरलेत तिघंही. येडचाप आहेत तिघं. कसं कळलं नसेल ह्यांना कि मीच कॉईन सरकवत होतो. किशोरची हिस्टरी तर कोळून प्यायलो आहे मी. मग किशोरचा आत्मा बरोबर उत्तरंच देणार ना रे बाबांनो! संद्या कुत्र्यासारखा मार खाणार आहे सविताचा उद्या. ते येडं मक्या लई उड्या मारत होतं भूत नसतं , भूत </i><i>नसतं म्हणून! आता काय बिशाद आहे यापुढं त्याची तसं म्हणायची. कसं नाचवलं ब्लाउज घालून! तसं ,दयानं जरा जोरातच मारून घेतलं राव. असू दे. आणि दुध प्यायची इच्छा पण पूर्ण झाली आपली. और क्या चाहिये लाइफमे .</i><br />
<i>त्या बाजूच्या विशालने, आपली बरीच उधारी थकवलीय , व्याजासहित परत हवी असेल तर 'प्लांचेट की एक रात विशाल के साथ !'</i> केलीच पाहिजे."<br />
<br />
<div style="font-style: normal;">
थोड्या वेळाने सगळ्यांना कशीबशी झोप लागली. 'किशोर के दर्दभरे नग्मे' च्या कव्हर वरचा किशोर मात्र नेहमीप्रमाणेच गालातल्या गालात मंद हसत होता.….</div>
</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
</div>
<div style="font-style: normal;">
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-49428773311100821252014-09-27T06:25:00.001-07:002015-01-13T06:09:36.152-08:00एकवीस वर्षांपूर्वी...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
<h3 style="text-align: left;">
२९ सप्टेंबर १९९३ </h3>
<div>
-----------------------------------------१----------------------------------<br />
<br /></div>
"गोदावरी जगताप !", नर्सने नाव पुकारताच एकदम भानावर आली ती. अगदी हायसं वाटलं तिला. वाट बघून बघून कंटाळा आला होता. सकाळी नऊ वाजल्यापासनं वाट बघत होती ती. २ तासांनी आत्ता कुठे नम्बर आला होता तिचा. देशपांडे बाईंकडे नेहमी अशीच पेशंटची रीघ असायची. आत घाबरत घाबरतच गेली , देशपांडेबाई मान वर न करताच म्हणाल्या<br />
<i>"बस गं , गोदावरी!"</i><br />
<i>"म्याडम, जाउद्या मी उभीच बरी हाय. काय रिझल्ट आला ओ त्या टेष्टचा?"</i><br />
<i>"पेढे दे गोदे ! पेढे ! पोटुशी आहेस तू ! मुल होणार आहे तुला !"</i><br />
आनंद गगनात मावेना गोदावरीचा ते ऐकून. गप्पकन पाय पकडले तिने देशपांडे बाईंचे.<br />
"<i>देवादुतावानी बातमी सांगितलीत म्याडम! पाय्हजेल तेव्हढे पेढे देते बघा !"</i><br />
<i>"अगं , पाय सोड आधी. आणि , असं एकदम हालचाली करणं बंद कर आता. नीट काळजी घे स्वतःची"</i><br />
दवाखान्यातून बाहेर पडताना जणू अस्मानात तरंगत होती गोदावरी. बारा वर्ष ! जवळपास एक तप झालं म्हणजे! एवढ्या दिवसांनी पाळणा हलणार होता तिच्या घरात. सगळी आशा सोडून दिली होती गजाननरावांनी आणि तिने. डॉक्टर झाले , वैद्य झाले , देवं झाली, नवस झाले. पण काही फायदा नाही. '<i>देवा, लई वाट बघायला लावलीस रं, पण पावलास रं बाबा शेवटी !</i>' मनात म्हणाली ती.<br />
गजाननराव तर तालुक्याच्या गावी गेले होते. कधी एकदा त्यांना भेटून हि बातमी सांगावीशी वाटत होती. पण उद्यापर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. औषधं घरी ठेवताना एकदम घड्याळाकडं लक्ष गेलं तिचं, '<i>अगं बया, साडे अकरा झाले, पाहुणे येणारच असतील. लाडू बांधायला बोलावलंय सोनावणे बाइंनी, घाई करायला पाह्यजे.'</i> असा विचार करत लागाबगा ती सोनावणे बाईंच्या घराकडे पळाली.<br />
<br />
गावातल्या बसस्टेंड ला अगदी लागून तो वाडा होता. मोजून सहा घरं होती वाड्यात. डावीकडून सुरु केलं तर जगतापांचं पहिलं घर. गजाननराव जगताप आणि गोदावरी जगताप , दोघंच रहायची तिथे. बारा वर्षं झाली लग्नाला, मुल बाळ नाही अजून , म्हणून परेशान असायची. पण यापुढे नाही.<br />
<br />
<div>
-------------------------------------२---------------------------------------<br />
<br /></div>
दुसरं घर सोनावणे बाईंचं . नवरा मास्तर होता, बाजूच्या गावात. दिवसभर पोरांना संस्काराचे धडे शिकवून रात्री जाम पिउन यायचा. पाच मुलं. सगळ्यात मोठी संतोषी, बावीस वर्षाची झाली होती. तिचं अजून लग्न जमत नाही म्हणून अस्वस्थ वातावरण होतं घरात. दिसायला अगदी नक्षत्रासारखी, पण कुंडलीतला मंगळ आडवा येत होता. सगळ्यात छोटा , शेंडेफळ म्हणजे शंभू, सहा वर्षाचा. फार म्हणजे फारच जीव या जोडप्याचा शंभूवर. चार मुलीनंतर झालेला एकुलता एक पोरगा म्हणून.<br />
'<i>माझ्या संतोषीनं नशीब काढलं!</i>', सोनावणे बाई विचार करत होत्या. '<i>पोराचं किराणा दुकान हाय म्हनं, ते पण अगदी गावात. दीड-दोनशेचा तर कमीत कमी धंदा होतोय रोज म्हनं. सासूचा तरास नाही, घरात फक्त सासरा आन नवरा. कामाचा ताण भी नाय पडणार संतोषीवर. काय बी असू, तशी कामाला वाघ हाय माझी पोर. आज जर पसंद केली पावण्यानी तिला , तर ११ नारळाचं तोरण बांधीन रे नीलकंठेश्वरा !</i>' सोनावणे बाई मनाशी म्हणाल्या. <br />
"<i>वैषे, बघ गं संतोषीचं आवरून झालं कि न्हाय ते?</i>" त्या म्हणाल्या.<br />
<br />
गेला अर्धा तास स्वतःकडे न्याहाळून बघत होती संतोषी. '<i>काय कमी आहे माझ्यात , म्हणून एवढी वाट बघायला लावतोय रे देवा ? वर्गातली एक तरी पोरगी एवढी चांगली दिसते का सांग बरं. मग मलाच का कुणी पसंद करत नाही मग ? ह्या वेळी पसंती येवू दे तिकडून. खरं सांगते, मायनं सांगीताल्यावानी तिचा शालुच नेसते लग्नामध्ये. नको नवीन साडीचा हट्ट मला. जाउदे, चला अण्णांच्या पाया पडून घेते' </i> म्हणून ती वडिलांच्या खोलीकडे निघाली.<br />
<br />
'<i>देवा, लई चुकतंय रे माझं, पण काय करू हि दारू सुधारु देत नाही.</i> ' सोनावणे गुरुजी विचार करत होते. '<i>काल रात्री म्हणे मी शम्भूच्या कानफटात वाजवली! आठवत पण नाही मला. हात का नाही तुटले माझे ते करण्याआधी ? आजकाल काही ताळतंत्रचं नाही राहिला स्वतःवर. शंभू व्हावा म्हणून काय देव देव आणि नवस नाही केले , आणि त्याच्यावरच हात उचलला आपण? रुसून बसलंय पोर बिचारं कालपासनं. आज सकाळी जाउन त्याच्या आवडीचे काळे बूट आणले , पण ढुंकूनही नाही बघितले त्यानी त्याकडे. उद्यापासून दारू सोडायची. बास झालं आता. '</i> तेवढ्यात संतोषी आशीर्वाद घ्यायला खोलीत आली.<br />
"<i>शंभू , जा रे , जरा राणीताई ला बोलावून आन. म्हणावं, ती तोहफा मधल्या जयाप्रदा सारखी वेणी घालायाचीय संतोषीताईला!</i>" संतोषीने शंभू ला फर्मान सोडलं. '<i>लहान आहे , म्हणून सगळेजण मलाच पळवतात.</i>' शंभू विचार करत होता. '<i>आबांनी काल का मारलं तेच कळत न्हाई! चुकून आपला बॉल त्यांच्या वरणाच्या वाटीत पडला, म्हणून काय एवढं जोरात हाणायचं ? अजूनपण कानानी नीट ऐकू येईना गेलंय. बाकी, ते काळे बूट लय भारी आणलेत आबांनी. पण लय राग आलाय त्यांचा, म्हणून बघितलं बी नाही तिकडे . पण हळूच त्यांची नजर चुकवून घालून बघणार आहे एकदा. जमलं तर उद्या शाळेतबी घालून जातो. संज्याची लय जळणार हाय माझे बूट बघून, एवढं मात्र नक्की</i>' विचार करत करत राणीच्या घरी पोचला तो.<br />
<br />
<div>
---------------------------------३-----------------------------------------<br />
<br /></div>
ते तिसरं घर होतं,कांबळे काकांचं. काका आणि त्यांची एकुलती एक मुलगी राणी दोघंच राहायची तिथे. राणीची आई दोन वर्षापूर्वीच कॅन्सरने वारली होती. फार जीव बापलेकीचा एकमेकांवर. पण वयाप्रमाणे , राणी गेल्या दोन महिन्यांपासून बाजूच्या भोसलेंच्या बंडूच्या प्रेमात पडली होती. खूप आवडायचा तिला तो. पण लहान गावात प्रेम प्रकरण वगैरे जरा अवघडच असतं. लगेच लोकांना कळतं, चर्चा होते. '<i>काल तर मीनाच्या आईनी बघितलं त्या गोठ्यामागं , आपल्याला नि बंडूला! चिठ्ठ्या देऊनच बोलावं लागतं तसं बी आम्हाला. उघडं बोलायची सोय नाही. आणि वर ह्या मीनाच्या आईला सकाळी सकाळी शेण लागतं गोवऱ्या थापायला. जाउदे, शेवटचा दिवस आजचा, उद्या सगळ्यांची तन्तरुन जाइल मी आन बंडू पळून गेल्यावर. आमचं लगीन होत आसंल तुळजापुरात आणि हिथं बसली असतील सगळी तर्क वितर्क करत. एक अण्णांचंच तेव्हड वाईट वाटतंय. काय वाटेल त्यांना मी पळून गेलेय असं कळाल्यावर ? जावूदे, पुढच्या आठवड्यात येणारच हाय परत महाबळेश्वरहून. समजूत काढली तर ऐकतील, राग पळून जाइल लगेच. ते हनिमून कि कशाला महाबळेश्वरला घेऊन जाणाराय म्हनं बंडू. जितेंद्र हाय माझा तो. एका साईडनं अगदी त्या मवाली मधल्या जितेंद्र सारखा दिसतो. मज्जा येणार हाय त्याच्यासोबत. आई भवानी , नीट पार पडू दे गं सगळं! खणा नारळानं वटी भरीन तुझी!</i>'<br />
<i>'राणी ताई , संतोषी ताई बोलावायलीय तुला , ती कसली तरी वेणी घालाय्चीय म्हनं तिला. "</i><br />
शंभूचा आवाज येताच राणी तयार व्हायला लागली. 'सं<i>ते , तुझ्यासारखं छान लगीन थोडीच नशिबात असतंय बाई सगळ्यांच्या !</i>' असं म्हणून आरशात पाहून गंध लावायला लागली. '<i>जाउदे, तुझ्या मागनं माझा नंबर आधी लागतोय बघ. चट मंगनी न पट शादी ! माझ्या जितूला ला लई आवडते मी असा शिरीदेवीसारखा गंध लावते तवा. </i>' ती आरशात पाहून विचार करत होती.<br />
<br />
<div>
--------------------------------------४--------------------------------------<br />
<br /></div>
<div>
चौथं घर भोसल्यांचं . जेवढा शांत भोसले काका, तेवढीच कजाग भोसले काकू. बंड्या एकुलता एक पोरगा त्यांचा. </div>
<div>
"<i>श्यान्नव कुळी हाओत आपण! लाज नाय वाटत म्हाराच्या पोरीसोबत लगीन लावून द्या मनायला ?</i>" भोसले काकू तळमळीने बंड्याला बोलत होत्या. बंड्याला एकदम जितेंद्र वगैरे झाल्यासारखे वाटत होते.<br />
"<i>जात पात मानत न्हाई मी. सच्चा इश्क किया है राणी के साथ. तुला काय कळणार म्हातारे. परवानगी न्हाय मागत , सांगतोय तुला. परवानगी दिलीस तर हिथं वाड्यात मंडप लागंल न्हाईतर तुळजापुरात, सांगून ठेवतोय !. ठरीव आता काय करायचं"</i></div>
<div>
<br /></div>
<div>
भोसले काका आजीबात लक्ष न देता शिवाजी महाराजांच्या फोटो खाली बसून प्लेट मधला शिरा संपवत होते. भोसले काकांचा हिरो होता बंड्या. आयुष्यभर काकुंना जे बोलू शकले नाही ते बंड्या बोलायचा. अजिबात घाबरायचा नाही. काकांची बंड्याच्या प्रत्येक गोष्टीला मूक संमती असायची. राणी त्यांना मनापासून आवडायची. बंड्याला राणीपेक्षा चांगली मुलगी नाही मिळणार हे त्यांना अगदी पटले होते. सकाळीच जाउन तुळजापूरची दोन रिजर्वेशन चांगली दोन तास लायनीत थांबून काढून आणली होती त्यांनी बसस्टेंडवरून . आज रात्री काकू झोपल्या, कि बंड्याच्या हातात ते तिकिट ठेवणार होते ते. "<i>आयुष्यभर हिने वैताग दिला मला फक्त. मनाचं काहीच नाही करू शकलो मी. हि घे तिकीट, आणि जा निघून. राणीसारखी पोरगी नको घालवू हाताची. जात पात महत्वाची नाही , तर मनं , स्वभाव महत्वाचा असतो</i>", असं सांगून बंड्याला घरातनं रवाना करणार होते.</div>
<div>
महाराजांच्या फोटो समोर हात जोडून काका म्हणाले " <i>शक्ती द्या महाराज. यश द्या माझ्या बंड्याला. </i>"</div>
<div>
"<i>बंड्या , चल रे, मंडळाचा गणपती निघालाय विसर्जनाला</i>." बाहेरून मित्रांची हाक येताच बंड्या शर्टाच्या गुंड्या लावत बाहेर पडला. आज एकच मागणं होतं बप्पांकडे त्याचं , '<i>राणीशी संसार थाटायला मदत कर रे बाबा मोरया!'</i></div>
<div>
रागारागानी भोसले काकू पण पोतदार बाईंकडे निघाल्या. त्यांनीच तर सांगितलं होतं बंड्या आणि राणी बद्दल सगळं . </div>
<div>
<div>
----------------------------------------५------------------------------------<br />
<br /></div>
</div>
<div>
"<i>आहेत का मीनाच्या आई घरात?</i>" भोसले काकूंचा आवाज ऐकून पोतदार बाईंनी दार उघडले.<br />
<br /></div>
<div>
पाचव्या घरात राहायचे पोतदार कुटुंब. पोतदार गुरुजी तालुक्याच्या गावी शिक्षक, एकदम अबोल स्वभाव. चार मुली अन दोन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी तिचं नाव मीना. म्हणून पोतदार बाईंना सगळ्या वाड्यात "<i>मीनाची आई</i>" म्हणूनच ओळखलं जायचं. नवऱ्यावर फार जीव त्यांचा. गेल्या वर्षी नवऱ्याचं डायबेटीसचं निदान झाल्यापासून, एकही गोष्ट गोड नव्हती लागत पोतदार बाईंना. कारण म्हणजे पोतदार गुरुजींना गोड पदार्थ खूप आवडायचे. बाई त्यांना रोज काही न काही गोड करून द्यायच्या. पेढे , बासुंदी , शेवयाची खीर अगदी काहीच नसेल तर कमीत कमी सुधारस तरी असायचाच. गेले एक वर्ष झालं घरात काही गोड धोड बनलं नव्हतं. आज अगदी एवढी अनंत चतुर्दशी असून साधे मोदक सुद्धा नव्हते केले. खूप जीव तुटायचा पोतदार बाईंचा. वाटायचं, नवऱ्याला काय काय गोड धोड बनवून खाऊ घालावं! पण हाय रे डायबेटीस. </div>
<div>
पण कालच गुरुजींच्या पगार वाढीची गोड बातमी मिळाली होती. महिना चक्क २०० रुपये वाढले होते.आणि गेल्या एका वर्षाची थकबाकी म्हणीन २४०० रुपये पण मिळणार होते. आनंद गगनात मावत नव्हता त्यांचा. म्हणून पोतदार बाईंनी सरळ सांगून टाकले. </div>
<div>
"<i>हे बघा , मी उद्या तुमच्या आवडीचे गुलाबजाम करायचं ठरवलंय. आज किती दिवसांनी अशी छान बातमी ऐकायला मिळालीय. आज रात्री तयारी करते मी. उद्या शाळेतून आलात कि गरम गरम गुलाबजाम खायला घालते. जीव आसुसला असेल न हो तुमचा काही तरी गोड खायला? मी मेलीने मात्र काल चक्क २ जिलेबी खाल्ल्या हळदी कुंकाला गेले होते जगतापांकडे तर!</i>" असं म्हणून डोळ्याला पदर लावला त्यांनी.</div>
<div>
पोतदार गुरुजी मात्र जाम खुश होते. उद्याचे गुलाबजामचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. गेल्या एक वर्षाचा गोडधोडाचा उपवास सुटणार होता उद्या. मनातल्या मनात गणपती बाप्पाला नमस्कार केला त्यांनी. </div>
<div>
"<i>अगं , त्या बाजूच्या पिंकी द्यायला विसरू नको बरं का गुलाब जाम . तिलाही फार आवडतात.</i>" ते म्हणाले.<br />
<br /></div>
<div>
<div>
-------------------------------------६------------------------------------<br />
<br /></div>
</div>
<div>
सहावं आणि शेवटचं घर घोडकेंच. घोडके काका लोहाराचं काम करायचे. बैलाची नाल , बैलगाडीच्या चाकाची आरी वगैरे असल्या गोष्टींसाठी सगळं गाव त्यांच्याकडे यायचं. पण बायकोच्या आजारपणात सगळी कमाई जायची. बायको अंथरुणाला खिळून, दम्याने त्रस्त. एकुलती एक पोरगी पिंकी , तिची मात्र खूप हेळसांड व्हायची. वेळेवर खायला नाही मिळायचं, पैशांची चणचण तिला अगदी लहान वयातच कळाली होती. अकाली वयातच प्रौढत्व आलं होतं तिला. तशी , फारच समजूतदार मुलगी होती. </div>
<div>
तिच्या शाळेची सहल जाणार होती पुढच्या आठवड्यात सोलापूरला. उद्यापर्यंत शाळेत पैसे जमा करायचे होते. पस्तीस रुपये ! तिला तर अप्पांचा चेहरा बघूनच कळले कि नाही जमणार हे. तरीही अप्पा म्हणाले , " <i>बघतो, मी काही जमतेय का</i>". तिला माहिती होतं कि नाही जमणार. फक्त गोड हसून ती म्हणाली<br />
<i>" नाही अप्पा,माझाही खूप अभ्यास राहिलाय, मलाच जायचे नाही सहलीला. तुम्ही नका विचार करू त्याचा. " </i><br />
<i><br /></i></div>
<div>
सकाळपासनं हातोडीचे घाव ऐरणीवर नाही तर स्वतःच्या काळजावर बसल्यासारखे वाटत होते घोडके काकांना. ' <i>पिंकीचं लय वाईट वाटतंय. तिचं वय काय, करावं काय लागतंय तिला. बाराव्या वर्षी तीन लोकांचा सगळा स्वयंपाक करते. आजारी आईला काय हवं नको ते बघते. एवढं करून शाळेत पयला नंबर दर वर्षी. कदी नाही ते पोरीनं कायतरी मागितलं आणि आपल्याला नाही जमत. थु हाय आपल्या जिंदगीवर! ते काय नाही , काही करून पिंकी ला सहलीला पाठवायचं. आजच भोसले साहेबांना विनवणी करून एक पन्नास रुपये उधार घेतो. पण पिंकीला सहलीला पाठवणारच!</i>"</div>
<div>
तो विचार करून घोडके काकांना बरे वाटले. </div>
<div>
<i>"पिंके , जा ग सहलीला , उद्या सकाळी शाळेत जायच्या आधी देतो पैशे तुझ्याकड"</i></div>
<div>
अप्पांचे बोल ऐकून पिंकीच्या मनात आनंदाचे कारंजे उडाले. मन थुइथुइ नाचायला लागलं. कधी एकदा मैत्रिणींना ही गोष्ट सांगतेय असं झालं. देव्हारातल्या साईबाबा च्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केला आणि कणिक तिम्बायाला घेतली तिनं. <br />
<br /></div>
---------------------------------------------------------------------------<br />
<h3>
३० सप्टेंबर १९९३ </h3>
<div>
गाडीला करकचून ब्रेक लागला , आणि मला जाग आली. डोळे उघडून पाहतो तो तर वाहनांची लांबच लांब लाईन लागलेली. पोलिस, चेकिंग केल्याशिवाय एकही गाडी पुढे सोडत नव्हते.</div>
<div>
<i>"पर्मिशन हाय का ? नसंल तर ट्रक वळवायचा हिथनंच म्हागं!"</i> हवालदार म्हणाला. </div>
<div>
उत्तरासाठी ड्रायव्हरने माझ्याकडे बोट दाखविले. खिशातला कागद काढून हवालदाराकडे दिला मी. </div>
<div>
<i>"कलेक्टरची परमिशन आहे. जाउद्या लवकर प्लीज"</i></div>
<div>
कागद न्याहाळून बघत हवालदार म्हणाला. </div>
<div>
<i>"कुटले , किल्लारीचे का तुमी? लय वंगाळ झालं बगा. होत्याचं नवतं केलं या भुकंपानं!"</i></div>
<div>
<i>"हो, किल्लारीचे आम्ही"</i></div>
<div>
<i>"घरचे सगळे बरे तर हायत नव्हं ? कुणालाबी इचारा , २-४ मानसं तर गेलेलीच हायत घरातली"</i></div>
<div>
<i>"नाही, देवाच्या कृपेने सगळे बरे आहेत, आज सकाळीच माझे आई वडील लातूरला पोचले. पण घाई घाईत घराला कुलूप सुद्धा लावायचं राहिलं. महत्वाची कागदपत्रं , आणि थोडं सोनं नाणं तसेच आहे कपाटात. राहिलं असेल आत्तापर्यंत , तर शोधून घेऊन जावे म्हणून चाललोय किल्लारीला. "</i></div>
<div>
<i>"असं व्हय , चला जावा बिगीबिगी"</i>, असं म्हणून हवालदाराने आमची सुटका केली. </div>
सकाळचा प्रसंग काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता माझ्या. सकाळी चारच्या सुमारास भूकंपाने घर हादरले तेव्हापासून जागाच होतो. लातूरला एवढा धक्का बसला तर किल्लारीला काय झाले असेल म्हणून माझी बहिण तेव्हापासून रडतच होती. टेन्शन तर मला पण जाम आले होते. आई वडील किल्लारीलाच असायचे. काय झाले असेल त्यांचे, हा विचार पोटात गोळा आणत होता. शेवटी सात वाजता एका सायकल रिक्षामधनं दोघेही घरी आले तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. अंगावरच्या कपड्यावर तसेच आले होते ते. काही सामान सोबत न घेता , जीव मुठीत घेऊन, पहिले वाहन मिळेल ते घेऊन लातूरला आले होते. आम्हाला पाहताच, ताईला जवळ घेऊन खूप रडले वडील. त्यांना माझ्या जीवनात पहिल्यांदाच रडताना पाहत होतो मी. भूकंपाचे त्यांनी सांगितलेलं वर्णन ऐकून अंगावर काटा आला आमच्या. थोड्या वेळानी , माझे काका आणि मी किल्लारीला जायचं ठरलं. सगळं सामान , स्पेशलि कागदपत्रं आणि, सोनं-नाणंतरी परत घेऊन येवू असा विचार होता.<br />
गावात पोचल्यावर बघवत नव्हतं काहीच. आक्रोश, ती झालेली पडझड, मदतकार्याचा गोंधळ खरंच काही बघवत नव्हतं. गाव ओळखूच येत नव्हतं मला. घरातलं समान गोळा करून झालं . ट्रक मध्ये चढवलं. सुदैवानं आमचं घर सिमेंटचं असल्यामुळे माझे आई वडील सुखरूप राहिले होते. अगदी गेल्याच वर्षी जुन्या वाड्यातून नवीन घरी शिफ्ट झाले होते. परत निघताना विचार केला, जरा जुन्या वाड्यात तर जाऊन येवू. आपले जुने शेजारी वगैरे , त्यांचे काय हाल आहेत विचारून येवु. ड्रायवरला थोडा वेळ थांबायला सांगून काका व मी वाड्याकडे निघालो. दगड मातीच्या चा खचातून कसाबसा रस्ता काढत तिथे पोचलो.<br />
<br />
वाडाच नव्हता तिथे! सगळा जमीनदोस्त झाला होता. फक्त दगड मातीचा डोंगर राहिला होता. बाजूला १०-१२ प्रेतं पांढऱ्या कपड्याखाली झाकून ठेवली होती. जगताप काका डोक्याला हात लावून बसले होते.<br />
"<i>एक माणूस आहे हो आमच्या घरचा अजून मातीखाली, माझी बायको. काढा हो तिला!</i>" मदतकार्या साठी आलेल्या जवानांना विनंती करत होते. बिचाऱ्या जगताप काकांना माहितीच नव्हतं की , एक नाही तर दोन जीव अडकलेत मातीखाली. आज जगताप काकू त्याचीच गोड बातमी सांगणार होत्या.<br />
सोनावणेच्या घरी फक्त सोनावणे काका वाचले होते. ते पण डोक्याला हात लावून सुन्न बसले होते. "शंभू शंभू" एवढंच पुटपुटत होते. एवढा मोठा धक्का! दारू सुटणार नाही त्यांची आता आयुष्यभर. कसं पचवायचं हे सगळं ? कांबळे , भोसले दोन्ही कुटुंब गायब होती , जात काय न पात , शेवटी एकाच मातीत मिसळली होती दोन्ही कुटुंब ! आणि त्यांचं न जोडलं गेलेलं नातंही. पोतदारांच्या घरी फक्त पोतदार काका गेले होते, गोड खायची इच्छा अपुरी ठेवूनच. पोतदार काकू भोवळ येउन पडल्या होत्या. मुलं आक्रोश करत होती. घोडकेंच्या घरी, काका एकटेच बचावले होते . आजिबात रडत नव्हते ते. पाणी आटलं होतं डोळ्यातलं त्यांच्या बहुतेक. राहून राहून खिशातली पन्नासची नोट चाचपत होते , तेवढाच एक त्यांच्या जिवंत असण्याचा पुरावा होता.<br />
<br />
बाजूला, सगळ्यांच्या संसारातल्या सापडतील त्या गोष्टींचा ढीग रचून ठेवला होता. त्यात जगताप काकूंनी नुकतेच विणायला घेतलेलं स्वेटर होतं. संतोषीचा शालू होता. मातीचा थर चढून कसनुसा दिसत होता अगदी. शंभूचे काळे बूट मातीने पांढरे पडले होते. बंडूने अगदी प्रेमानी घरी लावलेल्या "हिम्मतवाला" च्या पोस्टरला काहीच झालं नव्हतं. जितेंद्र आणि श्रीदेवी अगदी प्रेमानी एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. राणीचा मेक अपच्या सामानाचा डब्बा विखरून पडला होता. पोतदार काकूंनी गुलाबजामसाठी आणलेला खवा एका कागदात पडून होता. पिंकीने उत्साहाने भरायला सुरु केलेली सहलीची बैग फाटून चिंध्या झाल्या होती. <br />
<br />
मन बधीर झालं. दुःखाची परिसीमा वगैरे म्हणतात ते यापेक्षा वेगळ काही नसावं. देवाने आणि दैवाने केलेली क्रूर थट्टा होती ही. अंत्यदर्शन, वगैरे भानगडीत न पडता सरळ लातूरला निघालो. त्यात विश्वास नाही माझा. माणसांचे निष्प्राण चेहरे बघून अंत्यदर्शन घेण्याचा कसला हा शिष्टाचार? मला नाही पटत. आयुष्यभर मग तोच चेहरा समोर येईल ना त्या माणसाची आठवण झाल्यावर ? कशाला ते अंत्यदर्शन? त्यापेक्षा ते हसरे खेळते सजीव चेहरेच लक्षात ठेवायला आवडतं मला. लोकं नाव ठेवतात , म्हणतात कमकुवत आहे मी किंवा काहीजण म्हणतात की , अत्यंत दगडी ह्रदयाचा आहे मी इत्यादी इत्यादी. जे पण असेल, पण मी नाही घेत आणि नाही घेणार कधी ते अंत्यदर्शन ! पण त्या स्वप्नांचे काय ? त्यांचे अंत्यदर्शन मी चुकवू शकलो नव्हतो. त्यांची ती राखरांगोळी कशी विसरू शकणार होतो मी ? <br />
<br />
हळूहळू , दहा/वीस हजार मानसं गेली भूकंपात अश्या बातम्या यायला सुरु झाल्या. एक गोष्ट सांगायचे विसरले बातमीदार , माणसांपेक्षाही जास्त स्वप्नं मेली होती त्या दिवशी….<br />
<br />
<br />
<br />
<br /></div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-2072143915962165322014-09-20T08:10:00.001-07:002015-01-13T06:09:48.915-08:00गुंतागुंत - (पार्ट -२)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-weight: normal;">
<div style="font-style: normal;">
<a href="http://thodyashyagappa.blogspot.com/2014/09/blog-post.html">पार्ट -१</a> इथे वाचा.<br />
<br />
"<i>सत्याएन्शी रुपये साठ पैसे झाले साहेब</i>", या वाक्याने जाग आली अभयला. रिक्षात झोपी गेला होता तो. स्टेशनहून ससूनपर्यंत रिक्षा पोचली, तेव्हाच झोप लागली बहुतेक आपल्याला. शंभराची नोट रिक्षावाल्याचा हातात देत म्हणाला "<i>राहू द्या काका वरचे चहा पाण्याला</i>", आणि घराकडे वळला. प्रवासानी अंग शिणून गेलं होतं. काश्मीर पासून पुणे, कितीही नाही म्हटलं तरी थकवणारा प्रवास होता. नेत्राला वाटेत डेक्कन वर ड्रोप करून आला होता. संध्याकाळी भेटायचं पण ठरलं होतं त्याचं. घरी जाऊन आता एक मस्त झोप काढणार होता तो .<br />
<br /></div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
अकरा वाजता जाग आली. उठल्या उठल्या खालच्या एसटीडी बूथ वर गेला आणि नेत्राला फोन केला. काही विषय नव्हताच बोलायला , आत्ता चार तासांपूर्वीच भेटलेले, तरीही अगदी अर्धा तास गप्पा मारल्या. राहिलेल्या कॉईनसचं काय करावे हा विचार करतानाच अभयला वाटले कि चला अबोलीला फोन करूया. तिलाही हि गोड बातमी सांगितली पाहिजे. त्याची प्रत्येक गोष्ट आधी अबोलीला माहित असायची. तिचा नम्बर फिरवला, तिकडून मंजुळ आवाज आला </div>
<div style="font-style: normal;">
"<i>अबोली हिअर" </i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"अगं , अभय बोलतोय"</i></div>
<div style="font-style: normal;">
काही क्षण पिन ड्रौप सायलेन्स. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"बोल रे , कशी झाली काश्मीर ट्रीप ?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"तुला कसं माहिती ट्रीप बद्दल?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"अरे, मंदार ने जायच्या दिवशी फोन केला होत. त्यानेच सांगितलं तू पण येतोयस सोबत"</i></div>
<div style="font-style: normal;">
एकदम सूर पालटला तिचा. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"आणि आपलं फोन नाही करायचं ठरलं होतं अभय? का अवघड करून ठेवतोयस सगळं ?"</i></div>
<div style="font-style: normal;">
"<i>अगं , ऐकून घे. तुला खूप खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. एक काम कर, आज ऑफिस नंतर शिवसागरला भेटूया. पुढे काहीच विचारू नकोस. बाय"</i>. </div>
<div style="font-style: normal;">
एवढे बोलून अभयने फोन ठेवला. आज जवळपास दीड -दोन महिन्यांनी बोलले होते ते. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
आज ऑफिस ला उशिराच जाणार होता तो. असं करू , अबोलीला "शिवसागर" मध्ये भेटू साडे सहाच्या सुमारास. एखाद्या तासांनी , आठ वाजता नेत्रा सोबत जवळपासच डिनर घेऊ. कामात मन लागत नव्हतं आज. अबोलीला कधी एकदा नेत्राची आणि त्याची बातमी सांगतोय असा झालं होतं. कुठलीही गोष्ट तिच्यासोबत शेअर केल्याशिवाय चैन नाही पडायची अभयला. ठरलेल्या वेळेआधीच, जाऊन पोचला शिवसागर वर, सहा पस्तीसला अबोली आली. दिवसभराच्या कामाच्या थकव्यानी असेल बहुतेक पण एकदम थकल्यासारखी दिसत होती. अभयला पाहून जाम खुश झाली. </div>
<div style="font-style: normal;">
"<i>काय गं , विरहात वेडी झाली का माझ्या?</i>" मिश्किल स्वरात अभय म्हणाला. </div>
<div style="font-style: normal;">
"<i>नाही रे , तू गेल्यापासून एवढे चौइस मिळालेत कि , कुणाला निवडावे या विवंचनेत आहे."</i> हसत हसत ती मिळाली. </div>
<div style="font-style: normal;">
एका क्षणात रुसवे, फुगवे पळून गेले. असेच होते दोघंही . कितीही दिवसांनी भेटले तरी अवघडलेपणा आजीबात नसायचा. नातंच तसं होतं त्यांचं. काश्मीर ट्रीप च्या गप्पा सुरु झाल्या. तोपर्यंत , गरमागरम वडा सांबारच्या डिश आल्या टेबलवर. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"बोला , काय गोष्ट सांगायची आहे? अतिरेकी वगैरे झालास का तिकडे जाऊन?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"अतिरेकी तर तू आहेस , कामाचा अतिरेक करतेस"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"गप्प रे, सांग आता जास्त उत्सुकता ताणू नकोस. ए पण ऑन अ सिरिअस नोट, तू खूप वेगळाच दिसायला लागला आहेस. असं काहीतरी समाधान, आत्मविश्वास, आनंद झळकतोय तुझ्या चेहऱ्यावर"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"Thanks, अगं गोष्ट अशी आहे , कि मी प्रेमात पडलोय"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"काय, खरंच ? कोणाच्या ? आय होप एखाद्या मुलीच्या !"</i> डोळे मिचकावत म्हणाली ती. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"हो , नेत्रा !"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"काय?" </i>काही क्षण काहीच बोलली नाही ती. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"हिरा आहे रे हिरा ती पोरगी. कसली छान चोइस आहे तुझी. मी खूप खुश आहे , फायनली यु मेड अ राईट डिसिजन एंड चोइस. "</i></div>
<div style="font-style: normal;">
तो भरभरून बोलायला लागला त्याच्या आणि नेत्राबद्दल. काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. ते कसे भेटले, त्याचं आजारपण , तिने पकडलेला त्याचा हात सगळं काही नॉन स्टोप सांगत सुटला. अबोली नुसतं कौतुकाने ऐकत होती. घड्याळात पहिले अभयने तर पावणे आठ झालेले. </div>
<div style="font-style: normal;">
"<i>अगं , किती बोलतोय मी एकटाच. बहुतेक आता निघावे लागेल, नेत्रा येईल आठ वाजता सुभद्रा वर."</i></div>
<div>
<i>"ओके , लगेच संपवते कॉफी "</i><i style="font-style: normal;"> </i>ती म्हणाली</div>
<div>
<i>"काय गं अबोली , पण तू काय ठरवले आहेस पुढचे?"</i></div>
<div style="font-style: normal;">
कडक उन्हं पडलेली असावीत , ढगांचा मागमूसही नसताना अचानक धो धो पाऊस पडावा तशी अचानकच ती रडायला लागली. गांगरून गेला तो. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"अगं काय झालं?"</i></div>
<div style="font-style: normal;">
ती काहीच बोलायला तयार नव्हती. नुसती रडत होती. काही सुचेनासं झालं अभयला. </div>
<div style="font-style: normal;">
<i> "सॉरी रे , मी खूप वाईट आहे बहुतेक. पण तू सांगितलंस हे सगळं , आणि खुश होण्याच्या ऐवजी खूप वाईट वाटतंय मला. खूप राग येतोय नेत्राचा अन तुझा. खूप एकटे एकटे वाटायला लागलंय. विसरणार तर नाहीस ना रे मला? तुझ्याशिवाय गेले दोन महिने कसे गेले माझे मलाच माहिती. सॉरी रे ! मी काय बोलतेय आणि काय करतेय हे? बहुतेक ही माझी जेलसी आहे. प्रत्येक मुलीच्या जीवनात एक असा क्षण येतो , कि एखाद्याला ती सर्वस्व बहाल करते. भरभरून प्रेम देते, मी ते तुझ्यावर केलं होतं. पण बहुतेक आपल्या नशिबी सोबत राहणं नाहीये. आणि मीच कारणीभूत आहे त्याला . चल, बेस्ट लक नेत्राला आणि तुला !" </i></div>
<div style="font-style: normal;">
असं म्हणत मागच्या वेळेसारखीच कॉफी अर्धी टाकून निघून गेली. सुन्नं होवून बसून राहिला अभय बराच वेळ तिथे. काहीच सुचेनासं झालं त्याला. काय गुंतागुंत होऊन बसली हि सगळी. च्यायला आपल्या जीवनात कुठली गोष्ट सरळ म्हणून होत नाही. शापित आहे जीवन सगळं. त्याच विचारात घाईघाईत सुभद्रा वर जाऊन पोचला. नेत्रा आधीच हजर होती. एकदम छान सजून आली होती. सोबत गुलाबाचं एक सुंदर फुल पण आणलं होतं त्याच्यासाठी. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"का रे , किती उशीर हा? लग्नानंतर हे चालू नाही देणार!"</i></div>
<div style="font-style: normal;">
कशाने काय माहिती पण त्याचा मूड मगाच्या गोष्टीमुळे अगदी ऑफ झाला होत. उगीच लटके हसू चेहऱ्यावर आणून हसला तो नेत्राकडे पाहून. "<i>सॉरी</i> " एवढंच म्हणाला. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"अरे , कशी दिसतेय मी? बघ तुझ्या आवडीच्या रंगाचा पिंक ड्रेस घातलाय"</i></div>
<div style="font-style: normal;">
अभयच लक्षच नव्हतं. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"अगं , हो ना कसली छान दिसतेयस. वॉवं !"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"हे बघ अभय, मला सरळ दिसतेय कि काहीतरी बिनसलंय तुझं आज. तसं असेल तर डिनरचा प्लान क्यान्सल करू आपण "</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"नाही गं , पुण्यात गाडी चालवणं म्हणजे डोकं भंजाळून जातं. सॉरी. चल, जाम भूकेजलोय . "</i></div>
<div style="font-style: normal;">
अभयने पूर्ण प्रयत्न घेतले मूड परत आणायचे . बऱ्याच अंशी त्याला त्यात यशही मिळाले. नेत्रा एकदम खुशीत होती. <i>"पुढच्या महिन्यात मी चाललेय सुरतला, काकांशी बोलीन तेव्हा. तू पण बोलून घे घरी तुझ्या. "</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"हो चालेल"</i> म्हणून अभयनी तिला तिच्या घरी सोडलं. </div>
<div style="font-style: normal;">
घरी पोचल्यावर त्याला झोपच यायला तयार नाही. अबोली सोबतची ती भेट राहून राहून आठवायला लागली. अबोली आपल्यावर अजूनपण खूप प्रेम करते. वेड्यासारखं अगदी. तिला फक्त समजत नाहीये कि काय महत्वाचे आहे तिच्यासाठी जीवनात. आपल्याला कोण आवडते खरंच? अबोली कि नेत्रा? आपण चूक करतोय का नेत्राला वचन देऊन. कदाचित अबोली ला वाईट वाटावे म्हणून तर आपण नाही न नेत्राला प्रपोज केले? कि खरंच प्रेम आहे आपले नेत्रावर? कि फक्त एक कोम्प्रमाइज केलंय आपण तिला लग्नाच वचन देऊन? आपल्याला नेत्राच्या प्रेमाबद्दल एवढ्या शंका का येत आहेत ? अबोलीच आहे का आपलं खरं प्रेम ? तिला एवढे वाईट वाटतंय त्याचं आपल्याला का एवढं वाईट वाटतंय? काहीच समजेना झालं त्याला. जाम टेन्शन आले. रात्रभर जागाच होता अभय. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
त्या दिवशीपासून , अबोलीने फोन घेणंच बंद केले त्याचे. पण त्या दिवशी तिनं ,तसं बोलून इक्वेशन बदलून टाकले होते सगळे. नेत्राला हळू हळू इग्नोर करायला लागला अभय. भेटीगाठी टाळू लागला. नेत्राने बरेच खोदून खोदून विचारले पण अभयने काही सांगितले नाही. एक दिवशी अचानकच त्याचा घरी येउन थडकली नेत्रा. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"काय रे अभय , काय झालेय? फोन वर नीट बोलत नाहीस, दिवस रात्र ऑफिस मध्ये बिझी असतोस. आधीसारखं हसून बोलत नाहीस?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"नाही गं तसं काही नाहीये. जरा काम जास्त आहे एवढेच"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"बरं , ऐक उद्या मी सुरत ला चाललेय. काकांशी बोलून झाल्यावर, ते तुला फोन करतीलच"</i></div>
<div style="font-style: normal;">
गप्प बसला अभय. शेवटी धीर एकवटून म्हणाला </div>
<div style="font-style: normal;">
<i>"नेत्रा , तुला काहीतरी सांगायचं आहे. नीट ऐक. आणि प्लीज रडू नकोस"</i></div>
<div style="font-style: normal;">
घाबराघुबरा चेहरा झाला नेत्राचा. कशीबशी आवंढा गिळून म्हणाली </div>
<div style="font-style: normal;">
<i>"बोल"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"हे बघ नेत्रा, मी आपल्या दोघांबद्दल बराच विचार केला. आणि काही कारणास्तव मला असं वाटतेय कि खूप घाई होतेय लग्नाची वगैरे. बहुतेक मला अजून विचार करायला वेळ पाहिजे. भावनेच्या भरात मी लग्नाला हो म्हणून गेलो , पण मला वाटतेय कि आय एम नॉट रेडी यट"</i></div>
<div style="font-style: normal;">
चक्रावून गेली नेत्रा . धीर सुटला तिचा. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"अरे काय बोलतोयस तू हे अभय? तुला कळतंय का काही ? भातुकलीचा खेळ आहे का हा? क्षणात हो आणि क्षणात नाही ? तुला दुसरं कुणी आवडायला लागलंय काय?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"ते महत्वाचं नाहीये नेत्रा. पण मला वाटते कि तू तुझ्या घरच्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न करून टाकावे. तू जास्त खुश राहशील. मी नाही लग्न करू शकणार एवढ्या लवकर. आणि मला विचार करायला पण वेळ पाहिजे. माझं खरंच चुकलं . जमलं तर माफ कर मला . "</i></div>
<div style="font-style: normal;">
पोटात तीळ तीळ तुटत होतं अभयच्या तसं बोलताना. पण पर्याय नव्हता. उगीच भावनेच्या भरात काही निर्णय घेऊन फायदा नव्हता. ओक्साबोक्शी रडायला लागली नेत्रा. खूप वाईट वाटले होते तिला. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"नेत्रा , ऐक अग… "</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"बास अभय , आता एक शब्दही नकोस बोलु. काहीच अर्थ नाही त्याचा." </i>अभयला अर्धवट तोडत नेत्रा म्हणाली. आणि निघून गेली जड पावलांनी. </div>
<div style="font-style: normal;">
खूप वाईट वाटत होतं अभयला. काय तो बाहुला बाहुलीचा खेळ . खूप चुकलं आपलं. अबोली सोबतच्या ब्रेक-अप ने एकटेपण आलं होतं . त्याच नाजूक क्षणी नेत्रा जीवनात आली , तिने थोडी काळजी घेतली आणि आपण त्याला प्रेम समजून बसलो. बिचारीच्या नाजूक मनाचं वाट्टोळ करून टाकलं आपण . ह्याला क्षमा नाही. </div>
<div style="font-style: normal;">
तेव्हापासून नेत्राने त्याचे फोन घेणंही बंद केलं. अजिबात तोडून टाकलं अगदी. </div>
<div style="font-style: normal;">
पंधरा दिवसांनी मंदारचा फोन आला. </div>
<div style="font-style: normal;">
<i>"अभ्या , माफ कर यार , नेत्रा वरून उगीच चिडवले तुला मी. पण खरच मला वाटलं कि तुमचं काहीतरी चाललंय "</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"ओके , बोल कशी काय आठवण आली ?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"अरे, नेत्राला सोडायला नाही आलास काल? गेली न सगळं सामान बांधून सुरतला ?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"काय सांगतोयस, अचानक एकदम ?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"तुला नाही बोलली ती?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"नाही रे "</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"म्हणे , तिकडे जाउनच जॉब हुडकणार आहे ती. आणि सुरत म्हणजे फैमिली सोबत पण राहायला मिळेल."</i></div>
<div style="font-style: normal;">
फोन ठेवल्यावर खूप ओझे आले त्याच्या मनावर. अपराधी वाटायला लागले. उदास झाला एकदम तो. काहीच समजेना काय करावे. आपल्या हातून असं काही घडेल असा विचार पण नव्हता केला त्याने कधी. </div>
<div style="font-style: normal;">
अबोलीही फोन उचलत नव्हती. सरळ तिच्या ऑफिस मध्ये गेला अभय त्यादिवशी . </div>
<div style="font-style: normal;">
"<i>काय चाललंय अबोली , का उलटं पालटा करून टाकलायस मला? फोन नाही उचलत. बोलत नाहीस. परत फोन करीत नाहीस. इमेल्स इग्नोर करतेस?"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"अभय , वेडा आहेस का ? नेत्राशी लग्न करतोयस न तू ? माझ्यापासून आता दूर झालं पाहिजे तुला. मी योग्य तेच करतेय"</i></div>
<div style="font-style: normal;">
<i>"प्रेम करतेस कि नाही माझ्यावर? एवढंच सांग"</i></div>
<div style="font-style: normal;">
दोन सेकंदांचा पौज घेऊन अबोली म्हणाली </div>
<div style="font-style: normal;">
<i>"नाही करत ! तू स्पेशल आहेस. एकदम चांगला मित्र आहेस, आणि कदाचित कधी मी तुझ्यावर प्रेम केलं असेल पण. बट नॉट एनी मोअर. त्या दिवशी शिवसागर मध्ये भावनेच्या भरात बहकले मी. नाजूक क्षणी पाय घसरला माझा. असो… नेत्रा काय म्हणतेय? नीट काळजी घे तिची. "</i></div>
<div style="font-style: normal;">
तो नुसता तिच्याकडे पाहत उभा राहिला. काय बोलतेय ही ?</div>
<div style="font-style: normal;">
<i>"आणि प्लीज आता या पुढून मला बोलायचा , भेटायचा प्रयत्न करू नकोस. एका चांगल्या नोटवर संपू दे हे सगळं"</i></div>
<div style="font-style: normal;">
डोक्यात मुंग्या आल्या होत्या त्याच्या. जाम रडायला येत होतं. हातपाय गार पडले होते. काही न बोलता तसाच निघून आला अभय तिथनं. सगळं गमावलं होतं त्याने. सगळं …… </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
रात्री झोपेशी झगडावे लागू नये म्हणून भरपूर दारू ढोसून आला घरी. झोप लागली लवकर , पण चित्रविचित्र स्वप्नांनी थैमान घातले होते झोपेत. पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये नेत्रा त्याच्याकडे पळत यायची , तिचा हात तो हातात घेणार तोवर धाड धाड आवाज करत मुंबई सुरत एक्सप्रेस त्या दोघांमधून निघून जायची , ट्रेन गेली तर नेत्राच्या जागी अबोली उभी असायची. मागे पहिले तर अबोली आणि नेत्रा काळे गॉगल्स लावून हुंदके देत दूर जात असायच्या. हात जाम थंड पडलेले असायचे अभयचे. अशा स्वप्नांनी तळमळत होता नुसतं. </div>
<div style="font-style: normal;">
लहानपणी खेळून आला कि जाम भूक लागलेली असायची अभयला. "<i>आई खायला दे काहीतरी</i>" म्हणला कि आई नेहमीप्रमाणे म्हणायची "<i>टेबलावर ठेवलाय बघ खाऊ . एक ताई साठी आणि दुसरी तुझ्यासाठी आहे वाटी!"</i> खरं तर त्या दोन्ही वाट्या त्याच्यासाठीच असायच्या. तो जाऊन लगेच दोन्ही वाट्या मधला खाऊ फस्त करायचा. खूप मजा यायची, नेहमी काहीतरी सरप्राईज असायचे वाटीमध्ये. पेढे, गुलकंद , बोरं , द्राक्षे आणि बरच काही. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
तेवढ्यात आई आली स्वप्नात. म्हणाली "तु<i>झ्यासाठी काहीतरी ठेवलाय बघ वाट्यांमध्ये टेबलावर</i>". फार उत्सुकतेने अभय गेला टेबलाकडे. पहिल्या वाटीवरचं झाकण काढलं तर रिकामी होती. घाईघाईत दुसरीवरचं पण झाकण काढलं आणि पाहतो तर काय तीही रिकामी. आणि मग मात्र अगदी जवळचं कुणीतरी गेल्यासारखं जीवाच्या आकांतानं ढसाढसा रडू लागला तो …… </div>
<div style="font-style: normal;">
</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
</div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-37141858585111494752014-09-19T20:25:00.002-07:002015-01-13T06:09:48.929-08:00गुंतागुंत - (पार्ट -१)<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
खरंच , काश्मीरला स्वर्ग म्हणतात ते अजिबात खोटं नाहिये. आरामखुर्चीत बसून अभय विचार करत होता. त्या थंडगार हवेत , बर्फानी आच्छादलेल्या पर्वतांकडे बघत , गरमागरम चहाचे घुटके घेताना किती छान वाटत होतं. निसर्गाचं हे सौंदर्य पाहून, काल दिवसभर केलेल्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. अभयला तर पहाटेपासून झोपच येत नव्हती. सगळी मित्रकंपनी अजून झोपूनच असेल म्हणून तो एकटाच हॉटेलच्या बाहेर येवून तिथल्या गार्डन कैफ़े मध्ये येवून बसला होता. काल रात्रीच बाकी मित्रांसोबत तो जम्मूला आला होता. तसा त्याचा यायचा मूड नव्हता पण मंदार, पुष्कर, सलील, परी आणि सगळ्यात जास्त नेत्राने खूपच आग्रह केल्यामुळे त्याला यावे लागले. चांगला आठ दिवस मुक्काम होता. भरपूर भटकायचा प्लान होता.</div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
<br /></div>
<div style="font-weight: normal;">
'<i>अबोली असती तर काय मज्जा आली असती , नाही? बर्फ जाम आवडतो तिला</i>' अभयनी विचार केला. हातातली सिगारेट संपून जोरात चटका बसला बोटांना, आणि खडबडून भानावर आला एकदम. बास त्या अबोलीचे विचार. वेड्यासारखा जीव लावून ठेवलाय आपणंच. तिच्या इच्छा, आकांक्षा काही औरच आहेत. शेवटच्या भेटीत तिने सरळ सांगितले. "<i>हे बघ अभय, मला खूप आवडतोस तू, पण माझं करिअर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. लग्न वगैरे गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये, आणि माझा विश्वास हि नाहीये त्यात. त्यामुळे तू मला विसरून जाणेच उचित. ह्यापुढे भेटायला, बोलायला नको आपण. उगीच त्रास होईल दोघांनाही</i>". असं म्हणून एकदम कोरड्या चेहऱ्यानी उठून गेली तशीच कॉफी अर्धीच सोडून. असं कसं वागायला जमत हिला? आपल्याला कधी असं करताच नाही येत. अभयनी विचार केला. एकदम वेगळी आहे अबोली. क्षणात टिपकागदासारखी असते. आपल्यासाठी, प्रत्येक गोष्ट , प्रेम अगदी समरस होऊन करते. आणि क्षणात प्लास्टिकच्या कागदाप्रमाणे होऊन जाते. कोरडी एकदम. मग भावनांना वगैरे काही थारा नसतो तिच्याकडे. अजब रसायन आहे ही अबोली पण. कदाचित तिच्या ह्या अशा स्वभावामुळेच प्रेमात पडलो आपण तिच्या. ती जाऊन गाडीत बसेपर्यंत पाहत होता तिच्याकडे अभय. जाताना काळा गॉगल लावला होता तिने , ऊन खरच खूप आहे की डोळ्यातलं पाणी लपवतेय ती? कळले नाही त्याला.<br />
<div style="font-style: normal;">
<br /></div>
</div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
विसरून जायला हवे तिला , गेला एक महिना आपण फक्त आणि फक्त तिचा विचार करतोय. बास आता. जरी कितीही आवडत असली आपल्याला ती , तरी ह्या गोष्टीला काहीच भविष्य नाहीये. अबोलीचं हि बरोबर आहे. तिला तिचं करीअर घडवायचं आहे, आपल्यात गुंतून नाही पडायचंय. भूतकाळातून मनाला फरफटत परत आणलं अभयने. अबोलीचा चाप्टर संपलाय, आता आठ दिवस काश्मीर मध्ये धम्माल करायची. मज्जा करायची. तेवढ्यात, सगळीजण त्याला शोधत आली. गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत त्यांचे हसणे, खिदळणे, गप्पा सुरु झाल्या. आजच्या दिवसाची प्लानिंग सुरु झाली. <br />
<br /></div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
ग्रुपमध्ये , नेत्राशी त्याचं सगळ्यात जास्त जमायचं. चांगली मैत्रीण होती ती त्याची. अबोलीनंतर नेत्राच सगळ्यात जास्त जवळची. अत्यंत चांगला स्वभाव , त्याहीपेक्षा चेहऱ्यावर सतत वावरणारे ते गोड हास्य. अभयला तिच्याशी बोलताना अगदी कम्फर्टेबल वाटायचं. मनावर अगदी कसलच ओझं नसल्यासारखे वाटायचे. नेत्राही अभयच्या जोक्स्वर जाम फिदा. तिला खूप हसू यायचं अभयशी गप्पा मारताना. पण ती तेवढीच सेन्सिटीव होती. छोट्या छोट्या गोष्टी मनाला फार लावून घ्यायची. आयुष्यात तसं बरंच बरं वाईट पाहिलं होतं तिने. अवेळी हरवलेलं पालकांचं छत्र. जीवापाड प्रेम केलेल्या मोहित ने तोडलेलं ह्र्दय. त्यामुळे थोडं साहजिक होतं सेन्सिटीव असणं. पण कायम हसत रहायची. आणि तिच्या गालावरची खळी म्हणजे दुधात साखर.<br />
<br /></div>
<div style="font-weight: normal;">
जम्मू काश्मीर खरंच खूप देखणं आहे. अभय मंत्रावून गेला होता तिथलं सौंदर्य पाहून.अभयच्याच काय , तर सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. डोळ्यात जमेल तेवढे सगळे साठवून ठेवत होते सगळेजण. जाम खुश होते हॉटेलवर परतल्यावर, थोड्या गप्पाटप्पा झाल्यावर अभय गेला आपल्या रुममध्ये. दिवसभर फिरून फिरून जाम थकला होता. बेडवर पडलं की लगेच झोप लागली त्याला. सकाळी जाग आली आणि अंग असं हे भट्टीसारखं तापलेलं. घणाचे घाव घातल्यासारखे डोके ठणठणत होते. खूप अशक्तपणा जाणवत होता. बहुतेक थंड हवामान सहन नव्हत झालं अभयला. न उठता तसाच ब्ल्यान्केट घेऊन पडून राहिला. आठ वाजता त्याच्या दारावर थाप पडली, ब्रेकफास्ट साठी बोलवायला आले सगळे त्याची वाट पाहून. पाहतात तर काय अभय हुडहुडत बेडवर पडलेला. विचारपूस वगैरे केल्यावर सगळ्याचं मत पडलं कि डॉक्टर बोलावू रूमवरच आणि सगळे तोपर्यंत थांबतील त्याच्यासोबतच.<br />
"<i>काही नाही रे , थोडीशी कणकण आहे, एवढंच. तुम्ही जा पाहू फिरायला तुमच्या प्लानप्रमाणे. मी बरं वाटेपर्यंत हॉटेल मधेच बसून राहीन. डॉक्टर पण बोलावून घेईन. हे बघा तुम्ही तुमचा प्लान चेंज केलात तर खूप वाईट वाटेल मला.</i>" अभय म्हणाला. <br />
शेवटी अभयने खूपच विनवणी केल्यावर ते सगळे जायला तयार झाले. जाण्याच्या आधी त्यांनी डॉक्टर वगैरे बोलावून घ्यायला सांगितला हॉटेल मध्ये. आणि मग गेले निघून. थोड्या वेळात डॉक्टर येउन, औषधं वगैरे देऊन, आराम करायला सांगून, निघून गेला. अर्ध्या तासातच बेडवर पडून पडून वैतागून गेला अभय. अबोलीचे विचार लपत छपत हळू हळू त्याच्या मनात यायला लागले. अस्वस्थ होऊन गेला होता . "<i>खरंच अबोली पाहिजे होती इथे आत्ता.</i>" असा विचार मनात येतानाच दारावर टकटक झाली. कोण असावे हा विचार करत अभयने दार उघडले. पाहतो, तर नेत्रा उभी बाहेर. </div>
<div style="font-weight: normal;">
<i>"काय गं , काय झाले? इथे काय करतेयस तू?, परत का आलीस?"</i></div>
<div style="font-weight: normal;">
<i>"तू आजारी आहेस रे , कसला वैतागून जाशील एकटाच इथे बसुन. कोणी ओळखीचे न पाळखीचे. मला नव्हत पटत तुला एकट्याला सोडून जाणे. म्हणून आले परत मी. चल आता कर आराम. "</i></div>
<div style="font-weight: normal;">
<i>"अगं , काहीही काय , तुझी ट्रीप माझ्यासाठी का खराब करतेयस?"</i></div>
<div style="font-weight: normal;">
<i>"मी आजारी असते तर तू काय केलं असतंस ?"</i></div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
अभय गप्प झाला. त्याला स्वताची लाज वाटली. खर तर अबोली असती आपल्यासोबत आणि नेत्रा आजारी पडली असती , तर आपण आलो असतो का असच परत, कदाचित नाही. तरीही तो म्हणाला </div>
<div style="font-weight: normal;">
<i>"हो , आलो असतो मी पण परत. "</i><br />
<i><br /></i></div>
<div style="font-weight: normal;">
एकदम बरे वाटले अभयला. कुणीतरी आपली एवढी काळजी करतंय हे फिलिंग फार छान वाटत होते. मनातून जाम खुश झाला तो. त्या दिवशी खूप गप्पा मारल्या त्यांनी. नेत्रा थोड्या थोड्या वेळानी त्याच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवत होती. वेळेवर औषधं देत होती. मधूनच गरमागरम कॉफी बनवून देत होती. त्यात तिचा तो हसरा चेहरा. त्याचं आजारपण संध्याकाळपर्यन्त कुठल्याकुठे पळून गेलं . संध्याकाळी हॉटेलच्या गार्डन एक रपेट पण मारली त्यांनी. आज बऱ्याच दिवसानंतर आनंदी वाटत होतं अभयला. रात्री जेवणं वगैरे झाल्यावर रूमवर गेला आणि विचार करायला लागला. खरंच नेत्रा किती चांगली मुलगी आहे . कसल्या धम्माल गप्पा मारते. आणि तिच्या गालांवरची ती खळी , कसली छान दिसते हसताना. नेत्राला एवढं जवळून बघण्याचा, एवढ्या गप्पा मारण्याचा कधी योगच नव्हता आला या आधी. अबोली सोबत असली की आजुबाजूचं सगळं जग विसरून जायचा अभय. आज नेत्राचा सहवास सुखावून गेला होता त्याला. अबोलीच्या त्या शेवटच्या भेटीनंतर आलेलं एकाकीपण, त्याने त्याचं मन वैराण वाळवंट झालं होतं. आज कुठेतरी दूरवर पाण्याचा एक झरा दिसत होता. पण मृगजळ तर नव्हे ना ते? विचार करत करत झोपी गेला तो. अगदी लहान बाळासारखी झोप लागली त्याला त्या रात्री .<br />
<br /></div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
दुसऱ्या दिवशी सकाळी , सगळ्यांच्या आधी तयार होवून बसला होता अभय. अंगात नवीन चैतन्य आल्यासारखे वाटत होते. का माहित काय , पण नेत्राला भेटण्याची हुरहूर लागली होती. असं का वाटतेय ते मात्र कळेना त्याला. थोड्या वेळात नेत्रा पण आली कैफ़े मध्ये. न्हावून मोकळे सोडलेले ते लांबसडक केस, तजेलदार गुलाबासारखा तो टवटवीत चेहरा, मोठ्या मोठ्या डोळ्यांवर उठून दिसणारी ती काजळाची लकेर , चेहऱ्यावरचे ते नेहमीचे हसू आणि ती खळी ! मिनिटभर बघतच राहिला तिच्याकडे तो. कालच्या राहिलेल्या गप्पा परत सुरु झाल्या त्यांच्या. ब्रेकफास्ट वगैरे आटपून गाडीत बसले ते. जनरली पुष्कर आणि नेत्रा सोबत बसायचे, पण आज घाईघाईत पुष्करला मंद धक्का देऊन गडबडीने अभयनी नेत्राजवळची जागा पटकावली. तिला ते समजलं वाटतं , ती अगदी जोरात हसली. एकदम ओशाळून गेला अभय. अंग चोरून बसला. पण दोन मिनिटात गप्पा मारून कम्फर्टेबल झाला तो. </div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
<br />
आज फिरून झाल्यावर त्यांची गाडी जरा लवकरच हॉटेल कडे वळली. हॉटेल मध्ये आज बार्बेक्यू पार्टी होती. मजा येणार होती. परतताना अभयला एकदम हुडहुडी भरून आली. </div>
<div style="font-weight: normal;">
<i>"का रे काय होतंय ? परत बरं वाटत नाहीये का?"</i></div>
<div style="font-weight: normal;">
<i>"नाही गं , पण जाम थंडी वाजतेय"</i></div>
<div style="font-weight: normal;">
<i>"बघू, ताप आहे का?" </i>असं म्हणून नेत्राने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. </div>
<div style="font-weight: normal;">
<i>"नाही, ताप तर नाही वाटत आहे. हजार वेळा सांगून पण ग्लोवज घालत नाहीस तू हातात. थंडी वाजून आली असेल."</i></div>
<div style="font-weight: normal;">
असं म्हणून नेत्राने त्याचे हात हातात घेतले. <i>"बघ, कसले थंड पडलेत हात तुझे!"</i></div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
नेत्रांनी अभयचे दोन्ही हात घेऊन आपल्या हातात पकडून ठेवले. तिच्या मऊ हातांचा तो उबदार स्पर्श झाला , आणि एकदम ४४० वोल्टचा करंट बसला त्याला. एकदम स्तब्ध झाला तो. </div>
<div style="font-weight: normal;">
<i>"दहा मिनिटात बरे वाटेल बघ "</i> नेत्रा म्हणाली. </div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
हे असं काही अजिबात अपेक्षित नव्हतं अभयला. काही न बोलता दोघेही गप्प बसून राहिली. दहा मिनिटं काय, अर्धा तास झाला तरी त्याचा हात तिच्या हातातच होत. तीही आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून झोपी गेली होती. असं वाटत होतं ही बस थांबूच नये. अशीच चालत राहावी. अचानक गाडीचे करकचून ब्रेक्स लागले आणि दचकून नेत्रा जागी झाली. त्याचा हात सोडला तिने. </div>
<div style="font-weight: normal;">
<i>"बरं वाटतेय का रे आता?"</i></div>
<div style="font-weight: normal;">
अभय एकदम म्हणून गेला <i>"हो बरं वाटतेय, पण का सोडलास हात? असू दे ना असाच प्लीज"</i></div>
<div style="font-weight: normal;">
नेत्राच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम पालटले , <i>"बापरे, काय चाललंय हे? वेड लागलंय कि काय मला?" </i>असं म्हणून तिथून उठून परी शेजारी जाऊन बसली. एकदम गडबडून गेला अभय. काय बोललो आपण हे. अबोली सोडून कुणीच नाही न आवडत आपल्याला? काय मूर्खपणा करतोय आपण? का एवढा नेत्राचा सहवास आवडतोय?ती बिचारी चांगुलपणाने आपला हात घेऊन बसली , आणि आपण काय हे थर्ड क्लास काहीतरी बोललो. एकदम अपराध्यासारखे वाटायला लागले त्याला.<br />
<br /></div>
<div style="font-weight: normal;">
<div style="font-style: normal;">
रात्रीच्या पार्टीमध्ये दोघेही शांत शांत होती. कालचा मोकळेपणा कुठल्याकुठे पळून गेला होता. एकदम विचित्र काहीतरी होऊन बसलं होतं. रात्री झोपायला गेला तेव्हा विचारांनी नुसता तळमळत होता अभय. ह्रदयाची कुठलीतरी नाजूक तार छेडली गेली होती त्याच्या. नेत्राचे विचार , तिच्यासोबत मारलेल्या गप्पा, तिचा तो मोहक चेहरा, तिच्या हातांचा तो उबदार स्पर्श आठवून मनाला गुदगुल्या होत होत्या त्याच्या. सोबत वाईटही वाटत होते, कि आपण नेत्राच्या वागण्याचा गैरसमज करून घेतला . तिला आपली काळजी वाटते , आपली कंपनी आवडते. पण याचा अर्थ असा नाही कि तिचं प्रेम वगैरे बसलंय आपल्यावर . आणि छे छे आपलं तर कुठे बसलंय प्रेम तिच्यावर? का खोटं बोलतोय आपण स्वतःशी ? असे हजार विचार करता करता झोपून गेला तो. </div>
<div style="font-style: normal;">
<br /></div>
दुसऱ्यादिवशी सकाळी नेत्रा ब्रेकफास्ट ला पण आली नाही. परी म्हणाली कि नेत्राला जरा बरं नाहीये म्हणून ती आज येणार नाही. अभय म्हणाला "<i>तसं असेल तर मग मला थांबलं पाहिजे तिच्यासोबत. मी आजारी असताना ती परत आली होती. </i>" मंदार नेहमीच्या खवचट पण गुणगुणायला लागला "<i>दो दिल मिल रहे है , मगर चुपके चुपके</i>" अभय भडकला एकदम . म्हणाला "<i>मंद्या , फालतुगिरी नको करू, सुधार आता.</i>"कसंबसं पुष्कर आणि परीने दोघांना समजावून शांत केले. सगळेजण गेल्यावर तो नेत्रा कडे गेला. तिला फारसं आश्चर्य नाही झालं त्याला पाहून. त्याला पाहून फक्त मंद स्मित केले तिनं. काही बोलली नाही.<br />
<i>"काय झालंय नेत्रा ?"</i><br />
<i>"कुठे काय , काही नाही"</i><br />
<i>"हे बघ, मी जे काय बोललो ते मनापासून बोललो. बौटम लाईन हि आहे कि तू मला आवडायला लागली आहेस. मी अपेक्षा नाही करत कि तुझ्याकडून पण तसाच प्रतिसाद असावा. पण काही न झाल्यासारखे ढोंग करून राहणे मला जमत नाही. आणि तुझ्यासारखी मैत्रीण पण गमवायची नाही आहे. मला माफ करून टाक आणि परत आधीसारखे एकदम छान मित्र बनून राहु. विसरून जा मी बोललेलं."</i><br />
<i>"तू इथून जावं हेच उत्तम. प्लीज मला एकटीला सोड"</i><br />
<div style="font-style: normal;">
अभय तिथून निघून आला. मन हलकं वाटत होतं त्याला. मनातलं कमीत कमी बोलून दाखवले होते त्याने. टीव्ही बघत बसला तो. दुपारी दारावर टकटक झाली. अपेक्षेप्रमाणे नेत्रा आली होती. येउन बसली , त्याने छानशी कॉफी बनवली दोघांसाठी. शांतपणा असह्य होऊन अभय म्हणाला </div>
<i>"नेत्रा , प्लीज सोडून दे. विसरून जा मी बोललेलं."</i></div>
<div>
<div style="font-weight: normal;">
"<i>लग्न करशील माझ्याशी ? मला वाटतं मी पण प्रेमात पडलेय तुझ्या"</i></div>
<div style="font-weight: normal;">
<span style="font-style: normal;">अभय साठी हा एकदम बाउन्सर होता. </span><i>"काय म्हणतेयंस ? लग्न ?"</i></div>
<div style="font-weight: normal;">
<span style="font-style: normal;">"</span><i>हो, माझे काका माझे लग्न पुढच्या वर्षीपर्यंत लावून देतीलच. तेव्हा मला क्लिअर सांग. मी खरीच आवडते, तर लग्न करशील ?"</i></div>
<div style="font-weight: normal;">
<i>"हो , अर्थातच </i><span style="font-style: normal;">". अभय बोलून गेला.</span></div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
जाम खुश झाली. त्याला जवळ घेऊन त्याच्या गालावर हलकेच आपले ओठ टेकवून निघून गेली.</div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
अभय विचार करू लागला. आपण केलं ते बरोबर तरी केलं ना ? एकदम लग्नाचं वचन वगैरे दिलं . अबोली आवडते कि नेत्रा आपल्याला? अबोलीने तर भेटायला, बोलायला पण मनाई केलीय. नेत्रा तिची जागा भरून काढेल का?</div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
त्याच बेभानपणे आपण तिच्यावर खरच प्रेम करतो का? कि नेत्रा आणि आपण दोघेही परिस्थितीशी तडजोड करून अगदीच अनोळखी व्यक्तीसोबत लग्नाला तयार होण्याएवजी , कमीत कमी ओळखीचा, किंवा मित्र तरी जीवनसाथी मिळावा हा प्रयत्न करतोय ? विचारांचं वादळ उठलं डोक्यात. २१-२२ व्या वर्षी एवढी प्रगल्भता नसते विचारात. वेडा झाला विचार करून करून अभय. शेवटी ठरवले कि बास , नेत्राच आपले सर्व काही आहे आता. तिच्यासोबत संसाराची स्वप्न पाहण्यात मग्न होऊन गेला.</div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
पुढचे चार दिवस कसे गेले आजिबात कळले नाही. नेत्रा आणि अभय एकदम सातव्या आस्मानावर होते. एकमेकांना जाणून घेतलं त्यांनी. आवडी निवडी, स्वप्नं. आता परत गेलो कि घरच्यांशी बोलून एखाद्या वर्षात लग्न करून टाकायचे. पण नियतीच्या मनातही तेच होतं का ?……… </div>
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
<br /></div>
<div style="font-style: normal;">
<b>[क्रमशः] (टु बी कंटिन्यूड……. ) </b></div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-38645124112097580312014-09-12T07:27:00.000-07:002015-01-13T06:09:48.932-08:00झूठा ही सही !!!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font: normal normal normal 16px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
ब्लॉग लिहायला सुरु केल्यापासून एक गोष्ट मला जाणवली कि मी लोकांना खूपच मागे लागून ब्लॉग वाचायला सांगायला लागलो होतो. लोकांची काय प्रतिक्रिया असेल ते जाणून घेतल्याशिवाय चैन पडत नव्हती. मला पण कळत नव्हते की मी असं का करतोय. बराच विचार केला, डोक्याला थोडा ताण देऊन विश्लेषण केलं , आणि अशी एक गोष्ट आठवली जी कदाचित याला कारणीभूत असू शकेल.<br />
मी दहावीत होतो तेंव्हाची गोष्ट. आई वडिलांनी पुढच्या शिक्षणाचा विचार करून लातूरला शाळेत घातले होते मला. ती दोघेही किल्लारीलाच नोकरी करत. मी आणि माझी बहिण माझ्या एका मावशीकडे राहत असू. सर्वसामान्य पालकांच्या असतात, अगदी तशाच माझ्या पालकांच्या पण माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्यांना वाटायचे कि शहरात शिकतोय मुलगा, सगळ्या चांगल्या गोष्टी,सोयी, शाळा आहेत. खूप अभ्यास करेल, चांगले मार्क्स पडतील. जेणेकरून पुढच्या जीवनाची घडीही नीट बसेल. मी पण पूर्ण प्रयत्न घेतच होतो, पण ते वयच थोडं पोरकट असतं , फारसं कळत नाही.<br />
दोघेही, दर शनिवारी, दुपारी शाळा संपली की बस मध्ये बसून लातूरला यायचे. दोन्ही मुलं दूर असल्यामुळे जीव रमायचा नाही त्यांचा किल्लारीमध्ये. सोमवारी परत जायचे सकाळी. हळू हळू, आम्ही मावशीकडे सेटल झाल्यावर त्यांचं लातूरला येणं कमी झाले. मग महिन्या-दोन महिन्यातून आम्ही तरी किल्लारीला जायचो किंवा ते तरी लातूरला यायचे. अशाच एका रविवारी मी किल्लारीला निघालो. आठवडाभर सुट्टी होती शाळेला कसलीतरी. जाताना बस मध्ये काहीतरी वाचायला घ्यावे म्हणून सोबत एक पुस्तक घेतलं. "अक्षरशिल्पे" नाव त्याचे. कूणीतरी हातवळणे नावाच्या भावंडांनी दहावीच्या मराठी निबंधाच्या तयारीसाठी लिहिलेले पुस्तक होते. बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिले होते. पुस्तक वाचून मंत्रमुग्ध झालो. फारच सुंदर भाषेत लिहिलेले होते ते निबंध. मनात म्हटलं "देवा , मला का नाही अशी कला दिलीस? का नाही अशी गोड भाषा येत मला ?" तासाभराच्या प्रवासात सगळं पुस्तक अधाशासारखं वाचून काढलं.<br />
घरी पोचलो, तेव्हा आईने नेहमीप्रमाणे सगळे आवडीचे जेवण करून ठेवले होते. पोट भरून जेवण केले आणि झोपी गेलो. झोपेतनं उठलो तेव्हा पप्पा बाहेर गेले होते. आईही म्हणाली की हळदी-कुंकासाठी शेजारच्या पाटील काकूंकडे जाऊन येते. तिला परत यायला एक तासतरी लागणार होता. थोडावेळ टिव्ही बघून झाल्यावर बोअर झाले. एकदम "अक्षरशिल्पे" ची आठवण आली. आणि माहित नाही का , पण मनात एक लबाड विचार आला. आपण असे करू , त्यातला एक पावसाबद्दल अतिशय सुंदर निबंध होता. तो एका कागदावर उतरवून काढू. आणि आई-पप्पा घरी आले की त्यांना दाखवू आणि सांगू की मीच लिहिलाय. मला खरंच नाही समजत मी तेव्हा तसं का केलं असावं. फुशारकी मारावी म्हणून ? की त्यांना बरे वाटावे की मला शहरात शिकायला ठेवल्याचं चीज झालं म्हणून ? की अजून काही? पण मी केलं तसं . दिवेलागणीच्या वेळी दोघेही एकदाच घरी आले. आल्यावर मी त्यांच्या हाती तो कागद ठेवला आणि म्हणालो "<i>मी लिहिलाय बघा पावसावर निबंध , बघा कसा वाटतो तुम्हाला.</i>" त्यांनी सोबतच वाचायला सुरु केला. जसे जसे ते वाचत होते तसा त्यांच्या चेहरयावरचा आनंद , कौतुक, अभिमान ओसंडून वाहत होतं. मी ते सगळे भाव टिपत होतो, आणि मला पण अगदी छान वाटत होते. निबंध वाचून झाल्यावर, अक्षरशः डोळे भरून आले त्यांचे. म्हणाले "<i>काय हे? किती छान लिहिलयस. अभिमान वाटतो आम्हाला तुझा !</i>". रात्री झोपताना सुद्धा त्यांच्या त्या निबंधावरच गप्पा सुरु होत्या. का माहित नाही, पण त्यांची फसवणूक केल्याचं आजिबात वाईट वाटत नव्हतं मला. कदाचित फारच स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झालो होतो मी तेव्हा.<br />
सोमवारी सकाळी जाग आली तेव्हा दोघेही शाळेत गेलेली. आरामात उठून आवरले आणि मित्रांना भेटायला बाहेर पडलो. गावात ३-४ तास उंडारून झाल्यावर घरी परतलो. श्रावण सोमवार असल्यामुळे शाळा दुपारी लवकर सुटायची . घरी गेल्यावर आईने सांगितले " <i>अरे तुझे पप्पा तुझा निबंध घेऊन शाळेत गेले होते. वेळ काढून शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना वाचून दाखवला. अभिमानाने ऊर फुगला होता त्यांचा. सगळ्यांनी खूप कौतुक केले तुझे</i>". माझे वडील फारसे बोलायचे नाहीत. कौतुक वगैरे तर फारच क्वचित. असे नाही कि त्यांना वाटायचे नाही पण बोलून दाखवायचे नाहीत कधी. आईने हे सांगितल्यावर मात्र माझ्या पायाखालची जामीन सरकली. वाटले, काय केले आपण हे. कुठपर्यंत गेले हे प्रकरण? लाज वाटली पाहिजे आपल्याला असं काही करायला. पण आता चूक कबूल कशी करायची? कुठल्या तोंडानी सांगायचं त्यांना कि नालायक आहे मी . फसवले मी तुम्हाला. काय अवस्था होईल त्यांची हे ऐकून? अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं हे तर. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. विचार केला, जाउदे आता हा विषय जास्त चघळण्यात अर्थ नाही. गप्प बसलेलेच बरे.<br />
थोड्या वेळानी पप्पा पण घरी आले. आज फार खुशीत दिसत होते. बघवेना मला म्हणून परत बाहेर गेलो. मनात कुठेतरी काटा सलत होता आपण केलेल्या चुकीचा. एक क्रिकेटची मैच खेळून घरी परतलो. दारात येताच छातीत धस्सं झालं. खुर्चीत बसून वडील पुस्तक चाळत होते …. "अक्षरशिल्पे " !!! घाबरून गेला जीव. ते चुल्लूभर पाणी कि काय म्हणतात त्यात बुडून जावं असं वाटलं. आई उदास होऊन भाजी निवडत होती. क्षणात माझ्या ध्यानात आला सगळा प्रकार , माझा पराक्रम त्यांना समजला होता.पप्पांनी फक्त एकदा माझ्याकडे पाहिले. थंड आवाजात म्हणाले "<i>फार वाईट वाटले महेश आज मला. एवढी घोर फसवणूक ? काय गरज होती हे सगळं करण्याची. तुझी शैक्षणिक प्रगती , मार्क्स ह्या सगळ्यांपेक्षा तुझी वर्तणूक, विचार, वागणूक चांगली असावी हे महत्वाचे आहे. एक चांगला माणूस नसशील तर बाकी गोष्टींना शुन्य किंमत आहे आमच्यासाठी. फार दुखावलंस आज, बेटा.</i> " एवढे म्हणून ते शांत बसले. आईने एक चक्कर शब्दही काढला नाही.पप्पांना वाईट वाटल्याचं खूप दुखः झालं होतं तिला. मला तर माझीच किळस वाटायला लागली होती. काय करून बसलो आपण हे?<br />
रात्रभर झोप नाही आली. स्वतःच्या वर्तणुकी बद्दल तिरस्कार वाटायला लागला. पहाटे कशीबशी झोप लागली. सकाळी उठलो तर नेहमीप्रमाणे दोघेही शाळेत गेलेले. घर खायला उठलं होतं मला. कालचा प्रसंग अस्वस्थ करून सोडत होता. काय करून आई-पप्पांना समजावू , कशी त्यांची माफी मागू हे प्रश्न भंडावून सोडत होते. पाच वाजता घराची कडी वाजली म्हणून दर उघडलं , आई होती. माझ्याकडे न पाहताच म्हणाली "<i>पप्पा शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना घेऊन येत आहेत मागून. थोड्या खुर्च्या वगैरे बाहेर काढ. मी चहा ठेवते तोपर्यंत</i>". मला समजेना कि सगळेजण का येतायत. नाना विचार मनात येवू लागले. पाच मिनिटांनी सगळेजण घरी पोचले. चहा पाणी झाल्यावर, आलेल्या शिक्षकांनी मला बोलावले. "<i>अरे काय तो निबंध लिही……</i>" ; तेवढ्यात पप्पांनी त्यांचे वाक्य अर्धवट तोडले आणि म्हणाले , "<i>एक मिनिट सर, एक गोष्ट सांगायची आहे त्या निबंधाबद्दल</i>". माझी हवा टाईट! मनात म्हटलं, लागला निकाल आपला आता. एवढ्या सगळ्यांसमोर पाणउतारा होणार. अंगावर हजार झुरळे पळावी तसं काहीतरी फिलिंग यायला लागला. एकीकडे पप्पांचा राग पण यायला लागला कि एवढ्याश्या चुकीची एवढी मोठी शिक्षा काय. एवढे कठोर होण्याची काय गरज आहे.<br />
पप्पा पुढे म्हणाले "<i>अहो माझं चुकलंच. महेशला त्याच्या मित्रांनी एक खूप छान पुस्तक दिलंय वाचायला , त्याला आवडलं म्हणून त्याने एका कागदावर एक निबंध कॉपी करून घेतला . तो झोपला होता सकाळी तेव्हा मी सहज पहिला आणि मला वाटले कि त्यानेच लिहिलाय तो, आणि मी त्याच्याशी खातरजमा न करता उगाच शाळेत घेऊन आलो आणि तुम्हाला दाखवला. </i>"<br />
"अ<i>र्रे हो का , जाऊद्या , आपला महेश पण कमी नाही, त्याहीपेक्षा चांगले लिहील तो</i>" असं काहीतरी म्हणत बाकीच्या शिक्षकांनी पण वातावरण हलके फुलके केले. सगळेजण गेल्यावर मी पाय पकडले पप्पांचे , म्हटलं "<i>माझे खरच चुकले. खूप मुर्ख आहे मी</i>. " पप्पा नेहमीच्या अबोल स्वभावाप्रमाणे एवढेच बोलले "<i>जाउदे, फार मनाला लावून घेवू नकोस. पण चूक कबुल करणे महत्वाचे.</i>".<br />
पप्पांचा मोठेपणा कळला त्या दिवशी मला. सगळ्या शिक्षकांसमोर चूक कबूल केली. मुलाला वाईट वाटू नये , म्हणून चूक स्वतःवर घेतली. आणि, त्या गोष्टीचा उगाच बाऊ न बनवता माफ पण करून टाकले मला. एक गोष्ट कायमची शिकलो त्या दिवशी , फसवायचे नाही कुणाला. आणि अजाणतेपणे तसे झालेच, तर चूक कबूल करायला मागे पुढे नाही पाहायचे.<br />
कदाचित, म्हणूनच आज मी जेव्हा माझा ब्लॉग लिहितो , तेव्हा कुठेतरी मला वाटत असेल की आज मी हे खरंच मनाने लिहितोय आणि लोकांनी वाचावे आणि त्यांना खरेच आवडावे मी लिहिलेलं. कदाचित तेव्हा केलेली चूक निस्तरण्याचा निष्फळ, व्यर्थ प्रयत्न करतोय मी. तरीही , आई आणि पप्पा आज जिथेपण असाल तुम्ही , जमलं तर वाचा एकदा मी लिहिलेलं … या वेळी मनानी लिहिलंय सगळं ….<br />
<br /></div>
</div>
Unknownnoreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-11691026137928260082014-09-02T07:53:00.000-07:002015-01-13T06:09:48.912-08:00Happy new year!!!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-style: normal; font-weight: normal;"><br />पहाटेच्या त्या शांत वातावरणात , फारशी वाहतूक , वर्दळ नसलेल्या , पावसानी न्हावून निघालेल्या चकाकत्या रस्त्यावरून त्याची मोटारसायकल भन्नाट वेगात धावत होती . "मुंबई एकदम वेगळी दिसते न पहाटेच्या वेळी . फार कमी वेळी मुंबई ला दिवसातल्या ह्या वेळेस बघायचा योग येतो. दिवसभराच्या दगदगीनंतर कशी शांत, समाधानी दिसते. " तो विचार करत होता . मोबाईल ची रिंग वाजायला लागली , संतोष चा असावा फोन . आजीबात उशीर चालत नाही त्याला कुठेच . फोन न उचलता तशीच गाडी दामटत तो रेल्वे स्टेशन मध्ये घुसला . घाई घाईत, दिवसभराच्या पार्किंगचे पन्नास रुपये पार्किंग वाल्याच्या हातात कोंबत तो प्लाटफॉर्म कडे पळत सुटला . ग्रुप मधले सगळे मेम्बर्स आधीच पोचले होते.त्यांनी शिव्या द्यायला सुरु करण्याआधीच माफी मागत तो त्यांना सामील झाला . गप्पा गोष्टी, विनोद यांना उधाण आले होते. बऱ्याच दिवसांनी ग्रुप एकत्र जमला होता . प्रसंगच तसा होता . अक्षराचे लग्न होते आज पुण्याला . अक्षरा ग्रुप मधलीच एक . सगळ्यात पहिले लग्न होते ग्रुप मधल्या कुणाचे तरी . फ्रांस मध्ये काम करणारा एक देखणा मुलगा निवडला होता तिने . भारी एक्साईटमेंट होती प्रत्येकाला . <br />
<div>
"हाय गाईज , वोटस अप ?" असा एक मंजुळ निनाद किणानला. "ती", उभी होती मागे. परवाच परदेशातून परत आली होती वाटतं . ती पण येणार होती अक्षर च्या लग्नाला त्यांच्यासोबत . ग्रुप मधल्या सगळ्यांच्या तोंडातून आनंदाचे चित्कार उमटले . सगळ्यांनी तिच्याभोवती गलका केला . "कशी आहेस, सो गुड टू सी यु , काय म्हणतेय स्वित्झर्लंड ?" धाड धाड प्रश्नांच्या फैरी झडल्या तिच्यावर . त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तो मात्र थोडं मागेच थांबला . नुसतं निरीक्षण करत होता तिचे . लालचुटुक रंगाचा तो ड्रेस , त्यावर खुलणारी ती चंदेरी किनाऱ्याची ओढणी . चेहऱ्याशी चाळा करणारे तिचे कुरळे केस . हल्कासा मेकअप . मंद दरवळणारे तिचे इम्पोर्टेड परफ्युम . "बदललीस गं अगदी तू . कसली छान दिसायला लागलीस . " कुणीतरी म्हणाले तिला . "खरंय "<br />
<div>
तो मनाशी विचार करू लागला - "आधीपासूनच हि अशी जीवघेणी सुंदर , आणि त्यात परदेशातलं हवामान मानवलंय हिला खरं . अजूनही जास्त आकर्षक दिसतेय ही ". मित्रांशी बोलता बोलता तिची नजर त्याच्या नजरेला भिडली , उधारीचं हसू चेहऱ्यावर आणत तिने त्याला "हाय!" केलं . त्यानेही चेहऱ्यावरची रेष हि हलु न देता मान हलवली. </div>
<div>
तेवढ्यात ट्रेन आली . "चला लवकर , नाहीतर अक्षराच्या मुलाच्या बारशाला पोचू अजून उशीर झाला तर!" असे पांचट विनोद वगैरे करत सगळेजण गाडीत चढले . ट्रेनमध्ये मुद्दामहूनच तो जेणेकरून ती दिसणार नाही अशा एका सीट वर बसला. गप्पाटप्पांना ओघ आला होता . तो मात्र आज अलिप्त होता . अजिबात मजा येत नव्हती. त्याचे ठेवणीतले sarcastic विनोद आज आटून गेले होते . सिगारेटचे झुरके घेत ट्रेन च्या दाराशी बराच वेळ बसून राहिला. तिच्यासोबत बसून तिच्याकडे दुर्लक्ष करणे त्याला जमणार नव्हते . एकदम ऑक्वर्ड झाले असते. म्हणून उगीच झोपायचा वगैरे बहाणा करत थोडा दूरच बसून राहिला . </div>
<div>
एकदाच पुणे आलं . स्टेशन जवळचं मंगल कार्यालय होतं . वेळेवर पोचले सगळे . अक्षता पाच मिनिटात पडणार होत्या . बाकी अक्षरा अगदी अप्सरेसारखी दिसत होती नवरीच्या पोशाखात . थोडं स्थिरस्थावर झाल्यावर ते सगळे स्टेज वर अक्षरा आणि तिच्या नवऱ्याला शुभेच्छा द्यायला गेले. अक्षराने थोड्या वेळानी एकदम त्याचा आणि तिचा हात पकडला आणि लटक्या रागाने म्हणाली "आता अजून किती दिवस वाट बघणार आहात ? करिअर होतच असते. आता वाजवून टाका बार तुमचा पण . मला खूप मिरवायचं आहे तुमच्या लग्नात ". बहुतेक, गेल्या एक वर्षात काय काय घडलं त्याची कल्पना नसावी अक्षराला . तो आणि ती , दोघेही क्षणभर स्तब्ध झाली . कुणीतरी बोलावतंय असा बहाणा करून हात सोडवत तो तिथून निघून गेल. तिनेही तेच केलं असावं . </div>
</div>
<div>
जेवणं वगैरे आटपल्यावर , सगळा ग्रुप अक्षरासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी करायला बाहेर पडला. खरेदी वगैरेसारख्या गोष्टींमध्ये त्याला फारसा इन्टरेस्ट नसल्यामुळे त्याने टाळले व तिथेच बसून राहिला. एका खुर्चीवर शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. तेवढ्यात खांद्यावर एक थाप पडली . ओळखीचा स्पर्श जाणवला म्हणून मागे वळून पाहिले त्याने. "का रे , अगदीच बोलायचं नाही असं ठरवलंय कि काय ? एवढी अनोळखी झाले का मी ?" ती म्हणाली . क्षणभर सुन्न झाला तो . खोटं हसून म्हणाला, "नाही गं , तसं आजिबात नाही . जरा डोकं दुखतंय म्हणून शांत आहे". "मी ओळखते तुला चांगलं . प्लीज खोटं बोलू नकोस" ती म्हणाली . "बरेच दिवस झाले ना बोलून , कशी आहेस तू". "अगदी मजेत आहे रे मी. ". "बाकी एकदम वेगळी दिसायला लागलीय हं तू ". "सुंदर म्हणायचय का तुला?" असं म्हणून ती नेहमीप्रमाणं जीवघेणं हसली. "बाकी तुझी नौकरी कशी सुरु आहे. काम कसे आहे ?" अशा बघता बघता गप्पा सुरु झाल्या . ५ मिनिटात सगळा अवघडलेपणा गळून पडला . खूप गप्पा मारल्या त्यांनी . किती बोलू नि किती नाही असं झालं होतं दोघांनाही. एक तो अप्रिय प्रसंग (ब्रेकअप) चा सोडला तर बाकी सगळ्या गोष्टीवर गप्पा झाल्या . मन हलकं झाल्यासारखं वाटले त्याला . खंगून वाळणाऱ्या झाडाला नवी पालवी फुटावी तसं वाटू लागलं अचानक . तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला . फोन झाल्यावर ती म्हणाली "बाबांची कार सर्विसिंग ला दिलीय आज , म्हणतायत कि, रात्री बस नि जाऊ स्टेशन वरून घरी ". तो म्हणाला "कशाला, मी सोडीन तुला घरी . सांग त्यांना तसदी घेऊ नका म्हणून ". "ओके " ती म्हणाली . </div>
<div>
परतीच्या प्रवासात दोघं सोबत बसली . बऱ्याच अजून गप्पा मारल्या. परत सगळे आधीसारखे वाटत होते त्याला. त्याच अवघड क्षणात कमजोर पडला तो. म्हणाला "आपण पूर्वीसारखं नाही होवू शकणार ? सगळं विसरून". डोळ्यात पाणी तरळले तिच्या एकदम . "नाही रे , सॉरी . पण I have moved on . तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी . पण तुझ्या शेवटच्या फोन वर आपली जी भांडणं झाली त्यात खूप काही बोलून गेलो रे आपण एकमेकांना . खूप खोलवर जखमा झाल्या आहेत मनाला . मला नाही सहन होणार आता परत काही तसे झाले तर . मी माझ्या जीवनात खुश आहे आणि तू तुझ्या . काही तक्रारी नाहीयेत जीवनाकडून आता". बरोबर होतं तिचं . पण क्षणात ह्रदयाला भगदाड पडले त्याच्या . मन पिळवटून निघाले . खूप राग आला स्वतःचा . का आपण विचारले तिला . का स्वतः च्या स्वाभिमानाशी विश्वासघात केला? विषादाने तो तिला म्हणाला " हाहा , तू काय सिरियस झालीस काय, अगं मी मजा करत होतो . मी पण प्रेम वगैरे गोष्टींपासून चार हात लांबच राहायचं ठरवलंय". ती काहीच बोलली नाही . मात्र , त्या क्षणापासून सगळे अवघडल्यासारखे होवून बसले. संभाषण तिथेच खुंटले . </div>
<div>
मुंबईला पोचायला रात्रीचे १० वाजले . पावसाची रिप रिप सुरूच होती. सगळ्या ग्रुप चे निरोप घेऊन झाल्यावर त्याने पार्किंग मधून गाडी काढली आणि तिला म्हणाला "बस ". तिच्या घराकडे प्रवास सुरु झाला मोटार सायकल वर. किती वेळा हा सीन आधी रिपीट झाला होता . कॉलेज संपलं कि रोज तिला घरी सोडायचा तो. आज मात्र सगळं वेगळं होतं . रात्रीचं शांत वातावरण . दोघंही अबोल होती . सकाळचा अवघडलेपणा पुन्हा डोकं काढून वर आला होता . नेहमीप्रमाणे ती त्याला बिलगून बसली नव्हती , तिचे केस त्याच्या मानेला गुदगुल्या करत नव्हते , तो मोठमोठ्यांनी जोक्स सांगत नव्हता आणि ती खदखदून हसत नव्हती . पावसांत भिजून चिंब झाले होते दोघेहि. </div>
<div>
शेवटी एकदाचे तिचे घर आले. खाली उतरून ती म्हणाली "Thanks . निघते आता मी . बघ जमलं तर अधून मधून फोन करत जा ". तो उगाच हो म्हणाला . एक बॉक्स काढून तिने त्याच्या हातात ठेवला . "हे तुझ्यासाठी, माझ्या आवडीचे कफलिंक्स. " त्याने काही न बोलता ते आपल्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्याच्या खिशात ठेवले. ती पाठमोरी झाली आणि चालायला लागली . ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच थांबून राहिला . गाडीला कीक मारून परत निघाला . पावसाने चांगलाच जोर पकडला होता आता . जाता जाता रस्त्यात एक बार उघडा दिसला . दारू न पिण्याचा निर्धार विसरून तो बार मध्ये जावून बसला . व्हिस्की चे दोन नीट पेग रिचवले . आणि बाहेर टपरी वर येवून सिगरेटचा कश मारायला लागला . तिच्या आठवणी राहून न राहून लाटांसारख्या त्याच्या मनाच्या किनाऱ्यावर धडकत होत्या . मधमाशांचे मोहोळ उठावे तशा त्याला डसत होत्या . फार एकटे वाटायला लागले त्याला एकदम . टपरीवरच्या रेडियो वर किशोर गुणगुणायला लागला . " हम बेवफा हर्गीझ न थे , पर हम वफा कर न सके… ". आता मात्र त्याला बांध अनावर झाला . घळाघळा अश्रू वाहायला लागले. पानवाल्याच्या "अरे क्या हुवा साहब . . . सब ठीक तो है ?" कडे दुर्लक्ष करून गाडीवर सवार होऊन निघाला . बास , आता तिला विसरूनच जायचे असा निर्धार केला स्वतःशी . गाडी मुद्दामहूनच कॉलेज जवळून घेतली . त्या कट्ट्याजवळ येउन थांबला . इथेच तासंतास बसून पावसाची रिमझिम उपभोगली होती दोघांनी कधी काळी. कफलिंक्स काढून ठेवले कट्ट्यावर आणि सुसाट घरी निघाला . </div>
<div>
घरी पोचून रेडियो ऑन केला . आणि कच्चं भिजलेला कुर्ता काढला . पांढरा शुभ्र कुर्ता त्याचा मागून पूर्ण लालभडक झाला होता . तिचा तो लालचुटुक ड्रेस पावसात भिजून त्याच्या कुर्त्यावर आपली छाप सोडून गेला होता. तगमगत उठला तो . भरभरा बकेट मध्ये पाणी काढले , न मोजताच ४-५ चमचे सर्फ टाकलं आणि जीवाच्या आकांतानं डाग धुवून काढायाचा प्रयत्न करू लागला . पण रंग पक्का बेरकी , जायलाच तयार नाही . अस्वस्थ झाला तो , आता घासून घासून , कुर्ता फाटायचाच बाकी राहिला होता . रंग काही निघायला तयार नव्हता . अगदी तिच्या आठवणीसारखाच… शेवटी कंटाळून, दमून , भागून मुळकुटं करून झोपून गेला बिचारा . रेडियो तसाच सुरु होता . लता आपल्या जादुई आवाजात गातच होती…. </div>
<div>
<br /></div>
<div>
"तेरे बीना जिंदगी से कोई ,शिक्वा , तो नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं . </div>
<div>
तेरे बीना जिंदगी भी लेकिन , जिंदगी, तो नही, जिंदगी नही , जिंदगी नही, जिंदगी नही"</div>
<div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-3921586194004186052014-08-27T09:05:00.002-07:002015-01-13T06:09:48.939-08:00ये लाल रंग , कब मुझे छोडेगा ?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
<br />
पहाटेच्या त्या शांत वातावरणात , फारशी वाहतूक , वर्दळ नसलेल्या , पावसानी न्हावून निघालेल्या चकाकत्या रस्त्यावरून त्याची मोटारसायकल भन्नाट वेगात धावत होती . "मुंबई एकदम वेगळी दिसते न पहाटेच्या वेळी . फार कमी वेळी मुंबई ला दिवसातल्या ह्या वेळेस बघायचा योग येतो. दिवसभराच्या दगदगीनंतर कशी शांत, समाधानी दिसते. " तो विचार करत होता . मोबाईल ची रिंग वाजायला लागली , संतोष चा असावा फोन . आजीबात उशीर चालत नाही त्याला कुठेच . फोन न उचलता तशीच गाडी दामटत तो रेल्वे स्टेशन मध्ये घुसला . घाई घाईत, दिवसभराच्या पार्किंगचे पन्नास रुपये पार्किंग वाल्याच्या हातात कोंबत तो प्लाटफॉर्म कडे पळत सुटला . ग्रुप मधले सगळे मेम्बर्स आधीच पोचले होते.त्यांनी शिव्या द्यायला सुरु करण्याआधीच माफी मागत तो त्यांना सामील झाला . गप्पा गोष्टी, विनोद यांना उधाण आले होते. बऱ्याच दिवसांनी ग्रुप एकत्र जमला होता . प्रसंगच तसा होता . अक्षराचे लग्न होते आज पुण्याला . अक्षरा ग्रुप मधलीच एक . सगळ्यात पहिले लग्न होते ग्रुप मधल्या कुणाचे तरी . फ्रांस मध्ये काम करणारा एक देखणा मुलगा निवडला होता तिने . भारी एक्साईटमेंट होती प्रत्येकाला .<br />
<div>
<br />
"हाय गाईज , वोटस अप ?" असा एक मंजुळ निनाद किणानला. "ती", उभी होती मागे. परवाच परदेशातून परत आली होती वाटतं . ती पण येणार होती अक्षर च्या लग्नाला त्यांच्यासोबत . ग्रुप मधल्या सगळ्यांच्या तोंडातून आनंदाचे चित्कार उमटले . सगळ्यांनी तिच्याभोवती गलका केला . "कशी आहेस, सो गुड टू सी यु , काय म्हणतेय स्वित्झर्लंड ?" धाड धाड प्रश्नांच्या फैरी झडल्या तिच्यावर . त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तो मात्र थोडं मागेच थांबला . नुसतं निरीक्षण करत होता तिचे . लालचुटुक रंगाचा तो ड्रेस , त्यावर खुलणारी ती चंदेरी किनाऱ्याची ओढणी . चेहऱ्याशी चाळा करणारे तिचे कुरळे केस . हल्कासा मेकअप . मंद दरवळणारे तिचे इम्पोर्टेड परफ्युम . "बदललीस गं अगदी तू . कसली छान दिसायला लागलीस . " कुणीतरी म्हणाले तिला . "खरंय "<br />
<div>
तो मनाशी विचार करू लागला - "आधीपासूनच हि अशी जीवघेणी सुंदर , आणि त्यात परदेशातलं हवामान मानवलंय हिला खरं . अजूनही जास्त आकर्षक दिसतेय ही ". मित्रांशी बोलता बोलता तिची नजर त्याच्या नजरेला भिडली , उधारीचं हसू चेहऱ्यावर आणत तिने त्याला "हाय!" केलं . त्यानेही चेहऱ्यावरची रेष हि हलु न देता मान हलवली. </div>
<div>
<br />
तेवढ्यात ट्रेन आली . "चला लवकर , नाहीतर अक्षराच्या मुलाच्या बारशाला पोचू अजून उशीर झाला तर!" असे पांचट विनोद वगैरे करत सगळेजण गाडीत चढले . ट्रेनमध्ये मुद्दामहूनच तो जेणेकरून ती दिसणार नाही अशा एका सीट वर बसला. गप्पाटप्पांना ओघ आला होता . तो मात्र आज अलिप्त होता . अजिबात मजा येत नव्हती. त्याचे ठेवणीतले sarcastic विनोद आज आटून गेले होते . सिगारेटचे झुरके घेत ट्रेन च्या दाराशी बराच वेळ बसून राहिला. तिच्यासोबत बसून तिच्याकडे दुर्लक्ष करणे त्याला जमणार नव्हते . एकदम ऑक्वर्ड झाले असते. म्हणून उगीच झोपायचा वगैरे बहाणा करत थोडा दूरच बसून राहिला . </div>
<div>
<br />
एकदाच पुणे आलं . स्टेशन जवळचं मंगल कार्यालय होतं . वेळेवर पोचले सगळे . अक्षता पाच मिनिटात पडणार होत्या . बाकी अक्षरा अगदी अप्सरेसारखी दिसत होती नवरीच्या पोशाखात . थोडं स्थिरस्थावर झाल्यावर ते सगळे स्टेज वर अक्षरा आणि तिच्या नवऱ्याला शुभेच्छा द्यायला गेले. अक्षराने थोड्या वेळानी एकदम त्याचा आणि तिचा हात पकडला आणि लटक्या रागाने म्हणाली "आता अजून किती दिवस वाट बघणार आहात ? करिअर होतच असते. आता वाजवून टाका बार तुमचा पण . मला खूप मिरवायचं आहे तुमच्या लग्नात ". बहुतेक, गेल्या एक वर्षात काय काय घडलं त्याची कल्पना नसावी अक्षराला . तो आणि ती , दोघेही क्षणभर स्तब्ध झाली . कुणीतरी बोलावतंय असा बहाणा करून हात सोडवत तो तिथून निघून गेल. तिनेही तेच केलं असावं . </div>
</div>
<div>
<br />
जेवणं वगैरे आटपल्यावर , सगळा ग्रुप अक्षरासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी करायला बाहेर पडला. खरेदी वगैरेसारख्या गोष्टींमध्ये त्याला फारसा इन्टरेस्ट नसल्यामुळे त्याने टाळले व तिथेच बसून राहिला. एका खुर्चीवर शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. तेवढ्यात खांद्यावर एक थाप पडली . ओळखीचा स्पर्श जाणवला म्हणून मागे वळून पाहिले त्याने. "का रे , अगदीच बोलायचं नाही असं ठरवलंय कि काय ? एवढी अनोळखी झाले का मी ?" ती म्हणाली . क्षणभर सुन्न झाला तो . खोटं हसून म्हणाला, "नाही गं , तसं आजिबात नाही . जरा डोकं दुखतंय म्हणून शांत आहे". "मी ओळखते तुला चांगलं . प्लीज खोटं बोलू नकोस" ती म्हणाली . "बरेच दिवस झाले ना बोलून , कशी आहेस तू". "अगदी मजेत आहे रे मी. ". "बाकी एकदम वेगळी दिसायला लागलीय हं तू ". "सुंदर म्हणायचय का तुला?" असं म्हणून ती नेहमीप्रमाणं जीवघेणं हसली. "बाकी तुझी नौकरी कशी सुरु आहे. काम कसे आहे ?" अशा बघता बघता गप्पा सुरु झाल्या . ५ मिनिटात सगळा अवघडलेपणा गळून पडला . खूप गप्पा मारल्या त्यांनी . किती बोलू नि किती नाही असं झालं होतं दोघांनाही. एक तो अप्रिय प्रसंग (ब्रेकअप) चा सोडला तर बाकी सगळ्या गोष्टीवर गप्पा झाल्या . मन हलकं झाल्यासारखं वाटले त्याला . खंगून वाळणाऱ्या झाडाला नवी पालवी फुटावी तसं वाटू लागलं अचानक . तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला . फोन झाल्यावर ती म्हणाली "बाबांची कार सर्विसिंग ला दिलीय आज , म्हणतायत कि, रात्री बस नि जाऊ स्टेशन वरून घरी ". तो म्हणाला "कशाला, मी सोडीन तुला घरी . सांग त्यांना तसदी घेऊ नका म्हणून ". "ओके " ती म्हणाली . </div>
<div>
<br />
परतीच्या प्रवासात दोघं सोबत बसली . बऱ्याच अजून गप्पा मारल्या. परत सगळे आधीसारखे वाटत होते त्याला. त्याच अवघड क्षणात कमजोर पडला तो. म्हणाला "आपण पूर्वीसारखं नाही होवू शकणार ? सगळं विसरून". डोळ्यात पाणी तरळले तिच्या एकदम . "नाही रे , सॉरी . पण I have moved on . तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी . पण तुझ्या शेवटच्या फोन वर आपली जी भांडणं झाली त्यात खूप काही बोलून गेलो रे आपण एकमेकांना . खूप खोलवर जखमा झाल्या आहेत मनाला . मला नाही सहन होणार आता परत काही तसे झाले तर . मी माझ्या जीवनात खुश आहे आणि तू तुझ्या . काही तक्रारी नाहीयेत जीवनाकडून आता". बरोबर होतं तिचं . पण क्षणात ह्रदयाला भगदाड पडले त्याच्या . मन पिळवटून निघाले . खूप राग आला स्वतःचा . का आपण विचारले तिला . का स्वतः च्या स्वाभिमानाशी विश्वासघात केला? विषादाने तो तिला म्हणाला " हाहा , तू काय सिरियस झालीस काय, अगं मी मजा करत होतो . मी पण प्रेम वगैरे गोष्टींपासून चार हात लांबच राहायचं ठरवलंय". ती काहीच बोलली नाही . मात्र , त्या क्षणापासून सगळे अवघडल्यासारखे होवून बसले. संभाषण तिथेच खुंटले . </div>
<div>
<br />
मुंबईला पोचायला रात्रीचे १० वाजले . पावसाची रिप रिप सुरूच होती. सगळ्या ग्रुप चे निरोप घेऊन झाल्यावर त्याने पार्किंग मधून गाडी काढली आणि तिला म्हणाला "बस ". तिच्या घराकडे प्रवास सुरु झाला मोटार सायकल वर. किती वेळा हा सीन आधी रिपीट झाला होता . कॉलेज संपलं कि रोज तिला घरी सोडायचा तो. आज मात्र सगळं वेगळं होतं . रात्रीचं शांत वातावरण . दोघंही अबोल होती . सकाळचा अवघडलेपणा पुन्हा डोकं काढून वर आला होता . नेहमीप्रमाणे ती त्याला बिलगून बसली नव्हती , तिचे केस त्याच्या मानेला गुदगुल्या करत नव्हते , तो मोठमोठ्यांनी जोक्स सांगत नव्हता आणि ती खदखदून हसत नव्हती . पावसांत भिजून चिंब झाले होते दोघेहि. </div>
<div>
<br />
शेवटी एकदाचे तिचे घर आले. खाली उतरून ती म्हणाली "Thanks . निघते आता मी . बघ जमलं तर अधून मधून फोन करत जा ". तो उगाच हो म्हणाला . एक बॉक्स काढून तिने त्याच्या हातात ठेवला . "हे तुझ्यासाठी, माझ्या आवडीचे कफलिंक्स. " त्याने काही न बोलता ते आपल्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्याच्या खिशात ठेवले. ती पाठमोरी झाली आणि चालायला लागली . ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच थांबून राहिला . गाडीला कीक मारून परत निघाला . पावसाने चांगलाच जोर पकडला होता आता . जाता जाता रस्त्यात एक बार उघडा दिसला . दारू न पिण्याचा निर्धार विसरून तो बार मध्ये जावून बसला . व्हिस्की चे दोन नीट पेग रिचवले . आणि बाहेर टपरी वर येवून सिगरेटचा कश मारायला लागला . तिच्या आठवणी राहून न राहून लाटांसारख्या त्याच्या मनाच्या किनाऱ्यावर धडकत होत्या . मधमाशांचे मोहोळ उठावे तशा त्याला डसत होत्या . फार एकटे वाटायला लागले त्याला एकदम . टपरीवरच्या रेडियो वर किशोर गुणगुणायला लागला . " हम बेवफा हर्गीझ न थे , पर हम वफा कर न सके… ". आता मात्र त्याला बांध अनावर झाला . घळाघळा अश्रू वाहायला लागले. पानवाल्याच्या "अरे क्या हुवा साहब . . . सब ठीक तो है ?" कडे दुर्लक्ष करून गाडीवर सवार होऊन निघाला . बास , आता तिला विसरूनच जायचे असा निर्धार केला स्वतःशी . गाडी मुद्दामहूनच कॉलेज जवळून घेतली . त्या कट्ट्याजवळ येउन थांबला . इथेच तासंतास बसून पावसाची रिमझिम उपभोगली होती दोघांनी कधी काळी. कफलिंक्स काढून ठेवले कट्ट्यावर आणि सुसाट घरी निघाला . </div>
<div>
<br />
घरी पोचून रेडियो ऑन केला . आणि कच्चं भिजलेला कुर्ता काढला . पांढरा शुभ्र कुर्ता त्याचा मागून पूर्ण लालभडक झाला होता . तिचा तो लालचुटुक ड्रेस पावसात भिजून त्याच्या कुर्त्यावर आपली छाप सोडून गेला होता. तगमगत उठला तो . भरभरा बकेट मध्ये पाणी काढले , न मोजताच ४-५ चमचे सर्फ टाकलं आणि जीवाच्या आकांतानं डाग धुवून काढायाचा प्रयत्न करू लागला . पण रंग पक्का बेरकी , जायलाच तयार नाही . अस्वस्थ झाला तो , आता घासून घासून , कुर्ता फाटायचाच बाकी राहिला होता . रंग काही निघायला तयार नव्हता . अगदी तिच्या आठवणीसारखाच… शेवटी कंटाळून, दमून , भागून मुळकुटं करून झोपून गेला बिचारा . रेडियो तसाच सुरु होता . लता आपल्या जादुई आवाजात गातच होती…. </div>
<div>
<br />
"तेरे बीना जिंदगी से कोई ,शिक्वा , तो नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं . </div>
<div>
तेरे बीना जिंदगी भी लेकिन , जिंदगी, तो नही, जिंदगी नही , जिंदगी नही, जिंदगी नही"</div>
<div>
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-70538355087727466622014-08-26T08:23:00.003-07:002015-01-13T06:09:48.941-08:00अहो गोविंदशास्त्री!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
रविवारची अशीच एक सुस्तावलेली दुपार. पोटास तड लागेपर्यंत जेवण झालेलं. एक छानशी वामकुक्षी झालेली . फावल्या वेळात काय करावं असा विचार करताना सुचले कि चला, आज सतीश मामाला फोन करावा. सातिशमामा माझा सख्खा मामा. एका खेडेगावी शिक्षकाची नौकरी करतो. बऱ्याच गमती-जमती सांगत असतो तिकडच्या . फोनवर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मामा म्हणाला "अरे एक सांगायचं विसरलो. तुझा एक बालमित्र भेटला मला २ दिवसांपूर्वी. कोण असेल सांग पाहू?". आता हे गेसिंग चे गेम मला फार बोर होतात , उगीच त्याचे मन राखण्यासाठी मी २ मिनिटांचा पॉज घेतला, आणि म्हणालो " नाही बाबा ओळखता येत, सांग तूच !". मामा म्हणाला "अरे , तो गोविंद!". माझी सुस्ती एकदम उडाली, उत्सुकता , कुतुहूल अनेक प्रश्नांनी मन भरून गेलं ग़ोविन्द्ला भेटून , त्याच्याबद्दल काही ऐकून जवळपास वीस वर्षं उलटली होती . टिपिकल हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं मी काही वेळासाठी flashback मध्ये गेलो.<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBfWTTyPQt0oRjhvTEcrzutwyJLNZud8zxBc0_d09HXxvo-Y3tOwENv9ZMjDMHZ-vV20Sfg7uGnTgRv6UKFlwQO4PhZoDP_efgOyj8G5rW0Ca0yp7ykoxkmSYO1c2AQr4FIbYA45NUALWR/s1600/the-weight-of-oppression-paulo-zerbato.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBfWTTyPQt0oRjhvTEcrzutwyJLNZud8zxBc0_d09HXxvo-Y3tOwENv9ZMjDMHZ-vV20Sfg7uGnTgRv6UKFlwQO4PhZoDP_efgOyj8G5rW0Ca0yp7ykoxkmSYO1c2AQr4FIbYA45NUALWR/s1600/the-weight-of-oppression-paulo-zerbato.jpg" height="240" width="320" /></a></div>
<br />
माझे शालेय शिक्षण झाले एका अगदी छोट्या खेडेगावामध्ये . आई आणि वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे घरात थोडं शिक्षणाला पूरक वातावरण होतं . लहानपणापासूनच लिहिण्याची, वाचण्याची , अभ्यासाची गोडी होती . शाळेत एक बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो. पण एक प्रॉब्लेम होता , मी कितीही घासून अभ्यास केला तरी नेहमी दुसरा नंबर यायचा वर्गात. कारण माझा मित्र गोविंद म्हणजे पहिला नंबर असं समिकरण होतं . अत्यंत कुशाग्र , तल्लख बुद्धीचा हा पोरगा. गणित म्हणजे तर त्याचा जीव कि प्राण . जणू आईच्या पोटातून शिकून आलाय. मोठी अवघड गणितं चुटकीसरशी सोडावयाचा . माझी एक मावशी गोविंद घरी आला कि त्याला मजेत "अहो गोविंदशास्त्री!" अशी हाक मारायची . तो बिचारा कावराबावरा होऊन जायचा . मला जाम हसू फुटायचं .<br />
गोविंद माझा अत्यंत चांगला मित्र. आमच्यात कधी कोम्पीटिशन नसायची . ( एक कारण हे हि होते कि तो फारच हुशार होता). पण तरीही त्या वयात जसा वाटतो तसा त्याचा हेवा वाटायचा कधीकधी . वाटायचं ह्याच्यामुळेच आपला कधी पहिला नंबर येत नाही. ह्याचा वडिलांची कुठेतरी बदली झाली पाहिजे, ह्याने शाळा बदलली पाहिजे असे एक नाही हजार विचार यायचे . आता विचार करून हसू येते. आमची मैत्री बाकी एकदम गाढ . दिवसभर त्याच्या घरीच पडीक असायचो . अस्सा मोठ्ठा वाडा . शेणाने सारवलेली जमीन. गोठ्यात दोन काळ्या कुळकुळीत दुभत्या म्हशी . ढणढणत्या चुलीवर भाकऱ्या थापणारी त्याची आई . त्याचे पहिलवान आजोबा . अगदी छान वातावरण होतं ते. खूप खेळायचो . एकत्र अभ्यास करायचो. भांडायचो हि भरपूर , आणि दुसऱ्या दिवशी परत खास मित्र होवून जायचो.<br />
नववीला असताना मी ते गाव सोडलं आणि जिल्ह्याचा ठिकाणी शिकायला गेलो . गोविंद तेथेच राहिला . हळूहळू नवीन मित्र झाले . गोविंद ला विसरायला होवू लागले . दहावीचा निकाल लागला , मला बऱ्या पैकी मार्क्स पडले , अपेक्षेप्रमाणे गोविंद ला खूपच चांगले मार्क्स पडले . योगायोगाने आमचे एडमिशन एकाच कॉलेजमध्ये झाले . एडमिशन चे सोपस्कार पार पडल्यावर त्याचे वडील त्याला घेऊन माझ्या घरी आले. माझ्या वडिलांनी विचारले "कुठले विषय घेतले तू गोविंद ?". यावर त्याच्या डोळ्यात पाणी तरळले . काहीच नाही बोलला तो. त्याचे वडील म्हणाले "Crop Science ! डॉक्टर बनवायचेय ह्याला . म्हणून गणित वगैरे नाही घेतले विषय . " माझे वडील म्हणाले " अहो , पण त्याला गणित एवढे आवडते ना ?, त्याला विचारले का तुम्ही ?" ते म्हणाले "त्याला काय विचारायचे , अहो ते देशपांडे डॉक्टर बघा , एका पेशंट चे २० रुपये घेतात तपासायला . दिवसभर पेशंट ची रीघ असते त्यांच्याकडे . काय मान आहे गावात त्यांना . पैशांच झाड आहे झाड त्यांच्याकडे ". माझे वडील निरुत्तर झाले .<br />
अधून मधून कधीतरी कॉलेज मध्ये भेटायचा गोविंद . उदास असायचा . गप्प गप्प राहायचा, फारसं बोलायचा नाही . माझ्या आई ला हे सांगितल्यावर म्हणाली " अरे , पहिल्यांदाच घराच्या बाहेर राहिलंय तो. नवीन शहर , नवीन कॉलेज . घराची आठवण येत असेल तत्याला . असं कर तू त्याला घरी घेऊन ये रविवारी . राहू दे इथेच दिवसभर . मन रमेल त्याचे ". त्या रविवारी घरी आला तो, पण शून्यात नजर लावून बसला . फार बोलला नाही . लगेच निघून गेला जेवण करून . हळू हळू मी माझ्या जीवनात गुंतून गेलो. भेटी गाठी कमी झाल्या आमच्या . अकरावीचा निकाल लागला , गोविन्द्ची आठवण आली . निकालाच्या यादीत मात्र त्याचे नाव कुठेच नव्हतं . तोही कॉलेज मध्ये दिसेनासा झाला होता . काही दिवसांनी त्याचे वडील भेटले आम्हाला . गोविंद ची विचारपूस केल्यावर त्यांचा चेहरा खर्रकन उतरला . म्हणाले "वाया गेला पोरगा .वाट्टोळ करून घेतलं ! अभ्यास, कॉलेज सगळं सोडून दिवसभर देव्हारया समोर बसून असतो. कोणाशी बोलत नाही, काही नाही ". गोविंद वर कसला तरी अनामिक ताण, दडपण आलं होतं . मानसिक रित्या अस्वस्थ झाला होता तो. स्वतःभोवती एक कोश विणून घेतला होता त्याने. ४-४ तास देवाची पूजा करायचा . शिक्षण तेथेच सोडले त्याने !<br />
काळाच्या ओघात मीही विसरून गेलो त्याला, आणि आज अचानक त्याची आठवण ताजी झाली .मामाला विचारले "कुठे भेटला तुला तो ? काय करतो सध्या ? कसा दिसतोय? " त्यांनी सांगितले कि मामाला शाळेच्या कामानिमित्त एक पार्सल पोष्टात द्यायचे होते. पोष्टात चिटपाखरू नव्हते. एक मळक्या युनिफॉर्म मधला पोष्टमन जमिनीवर पेपर अंथरून झोपला होता . (आजकाल खेडेगावी पण पोष्ट रिकामं असतं . मोबाईल फोन ची क्रांती! ). मामानी त्याला उठवलं आणि पार्सल दिले . पोष्टमन ने तंबाखू वगैरे मळली आणि गप्पा सुरु केल्या . बोलण्याबोलण्यात समजले कि तोच गोविंद होता . माझा बालमित्र . अगदी आपुलकीनं माझी विचारपूस केली त्याने . लग्न झालेले त्याचे, २-३ मुलं पण आहेत . कसाबसा संसाराचा गाडा ढकलतोय . अजूनही तास न तास देवाची पूजा करतो . बोलण्यातून हे पण समजले, कि त्याच्या मनावर परिणाम झाला असं समजून घरच्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. मानसिक आजार बळावत गेला . कसेबसे लग्न उरकून टाकले, ह्या भ्रमात कि जबाबदारी पडल्यावर तर नीट वागेल. पण त्यात काही फारसा फरक नाही पडला .शेवटी कशीबशी , ओळखीने, त्याला एक पोष्टमन ची नौकरी लावली त्याच्या वडिलांनी . आणि संसार चा गाडा ढकलायला मदत केली .<br />
त्याचा फोन नंबर घेतला मामाकडून आणि लगेच त्याला फोन केला . बायकोनी उचलला असावा . म्हणाली पूजा करत आहेत. नंतर करा २ तासांनी . परत फोन केला . अगदी उत्साहात बोलला तो . शेवटी म्हणाला "फार पुढे गेलास महेश, तू मला मागे टाकून . मी बसलोय बघ इथे पत्रं वाटत, शिक्के मारत . " काय बोलावे समजेनासे झाले मला . उगीच त्याला चांगले वाटावे म्हणून म्हणालो "काही म्हण यार, तुझ्यासारखा गणित तज्ञ नाही भेटला गोविंद". एकदम उदासीन स्वरात तो उत्तरला "कशाचं काय राव, आयुष्याचं गणित चुकलं सगळं ". गलबलून आलं आणि पुढे काही बोलावलं नाही . फोन ठेवून टाकला निरोप घेवुन. <br />
उगाच अस्वस्थ वाटायला लागले. विचार केला ह्या गोष्टीत चूक कोणाची? त्याच्या पालकांची, त्याच्या मनाविरुद्ध स्वप्नं पहिली त्यांनी म्हणून ? त्याला कधी समजून नाही घेतलं म्हणून . कि गोविंदची चूक आहे, परिस्थिती समोर कमकुवत झाला म्हणून? कि त्या देव्हाऱ्यातल्या दगडाच्या देवाची, जो ढिम्म बसून सगळं पाहत बसला? गोविंद तासंतास हेच प्रश्न तर नसेल न विचारात त्या देवाला?<br />
वाटले कि या वेळी भारतात गेलो कि वेळ काढून गोविंद ला नक्की भेटू . थोडा वेळ विचार केला आणि मग मात्र ठरवले कि नकोच. कधीच नको भेटायला त्याला. माझ्या आठवणींमध्ये असणारा गोविंदच बरा आहे. तो तसाच ठेवायचाय . मामाला केलेला फोन विसरून जायचा आहे . घराच्या छतावर हुंदडणारा , घातांक , अपूर्णांक , व्यास, क्षेत्रफळ यात रमणारा, (७५३ X ५६४ / ३६३) चे उत्तर क्षणात सांगणारा, तेजपुंज डोळ्याचा, "अहो गोविंदशास्त्री " म्हटलं कि लाजणारा गोविंद… तो तसाच आठवणीत ठेवायचा आहे मला . तो पहिला नंबर अजूनही त्याच्याचसाठी राखून ठेवायचाय मला…!<br />
<br />
[काही पात्रांची नाव बदलली आहेत. ]<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-31476777135732320772014-08-25T06:42:00.001-07:002015-01-13T06:09:48.926-08:00ब्रम्हराक्षसाच्या पाठी …<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font-family: 'Devanagari MT'; font-size: 16px; font-variant: normal; line-height: normal; margin: 0px; text-align: left;">
<div style="font-style: normal; font-weight: normal;">
भित्यापाठी ब्रम्हराक्षस ! ही म्हण शिष्यवृत्ति परीक्षेला ची तयारी करताना चौथी मधे बऱ्याच वेळा घोकुन घोकून पाठ केली होती. म्हणायला खुप मजेशीर वाटायची. नजरेसमोर असा दंडुका घेतलेला राक्षस एका "फाटलेली हातात घेऊन" पळणाऱ्या माणसाचा पाठलाग करतोय अस दृश्य यायचं, पण म्हणी चा अर्थ बऱ्याच अनुभवानंतर उमगला.
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiVl7wG7RbCjzpJt1ZllTHIoTx4bpIwDfDhvSBgbMwLiaCakWm_Xywqwxcel2tyEgUycPfa0-NvRhyKyBwIQaNfpaaLAq3tRthnyNcNMTyntk_dOYYtdjFk8j_isd03HU8Qw97jqnksLxTy/s1600/Rakshas.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiVl7wG7RbCjzpJt1ZllTHIoTx4bpIwDfDhvSBgbMwLiaCakWm_Xywqwxcel2tyEgUycPfa0-NvRhyKyBwIQaNfpaaLAq3tRthnyNcNMTyntk_dOYYtdjFk8j_isd03HU8Qw97jqnksLxTy/s1600/Rakshas.jpg" height="200" width="94" /></span></a></div>
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;"><br /></span>
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;"><br /></span>
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;">जीवनात, बऱ्याचदा काही गोष्टी , अडचणी अशा असतात की त्या पार पडल्याशिवाय , सोडवल्याशिवाय पर्याय नसतो. पण आपण काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करात राहतो ,उद्यावर ढकलत रहतो. खरे कारण हे असते की एकतर ती गोष्ट करायला आपल्याला अजिबात आवडत नसते ( सुरु करण्याच्या आधीच आपण काहीतरी पूर्वाग्रह करून घेतलेला असतो) , किंवा एखादी अनामिक भीती असते की ती गोष्ट आपल्याला करायला जमणार नाही. हळुहळू ती गोष्ट अंधाऱ्या खोलीमधला कधीच न पाहिलेला राक्षस बनून जाते. जसजसे दिवस जातात तसतसे आपण त्या खोलीसमोरून रोज जातो पण दुर्लक्ष करतो, घाबरतो. पण तो विचार, कि आपल्याला आज ना उद्या त्याचा सामना करावा लागणार आहे , आपल्याला अस्वस्थ करून सोडत राहतो. दिवसेंदिवस तो राक्षस आपल्या दुर्लाक्षावर , भीतीवर पोसत मोठा होत जातो. अस्वस्थपणाची पुट मनावर चढतच राहतात . दुसऱ्या चांगल्या गोष्टींवर पण तो हळू हळू आच्छदायला लाग्तो.</span><br />
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;"><br /></span>
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;">शहाणी लोकं शेवटी कधी न कधी त्याला सामोर जातात, त्या बंद खोलीचं दार उघडतात त्याचा सामना करण्यासाठी , आणि शंभरापैकी नव्याण्णव वेळी तो राक्षस नाही तर एक भित्रा मरतुकडा उंदीर निघतो. मग वाटते कि ह्याला आधीच चेचून टाकले पाहिजे होते, उगाच एवढ्या दिवस वाट पहिली, अस्वस्थ झालो. कितीतरी चांगले क्षण वाया घालवले ह्याच्या नादात. उलट कमकुवत लोकं आपलं सगळं जीवन अशा काल्पोकाल्पित राक्षसांना घाबरून वाया घालवतात. बरीच उदाहरणं पहिली आहेत मी.</span><br />
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;"><br /></span>
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;">हे सगळं सुचलं कारण ऑफिस मधलं एक काम बऱ्याच दिवसांपासून करायचे राहिले होते. रोज चालढकल करीत होतो. उद्यावर ढकलत होतो. खरं कारण होतं कि ते काम मला आजिबात आवडत नव्हते. डेडलाईन तर जवळ जवळ येत होती. दुसरी कामं करताना पण तो विचार नेहमी डोकं कुरतडत असायचा . आज ठरवले की बास ! आता काही झाले तरी हे काम हातात घ्यायचे. आणि आश्चर्य काय २-३ तासांत अर्धे काम संपले. पहिल्याच दिवशी याला सामोरं गेलो असतो तर किती बरं झालं असतं . असो. …</span><br />
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;"><br /></span>
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;">विक्रम जाचक म्हणून एक मित्र होता माझा बारावीत . तो नेहमी म्हणायचा कि मी कुठल्याही विषयाचा अभ्यास दोन वेळा सुरु करतो. म्हणजे पहिला चाप्टर वाचून सोडून देतो. का? कारण <span class="Apple-style-span" style="color: #101010; font-weight: 300; line-height: 40px;">Well begun is half done.</span> दोन वेळा सुरु केले कि संपला पूर्ण अभ्यास. निकाल आल्यावर मात्रं त्याला साक्षात्कार झाला कि Aristotle ने त्याची घोर फसवणुक केली आहे. विनोद बाजूला ठेवला तर विक्रम ची थेअरी बरयाच अंशी बरोबर आहे. एखादे काम पहिल्यांदा करावेसे नाही वाटले तर परत करायला घेतले पाहिजे . काय माहिती , दुसर्या वेळी ते एवढे सोपे वाटेल की खरच संपून जाईल .</span><br />
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;"><br /></span>
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;">किती तरी गोष्टींचा मी पण ब्रम्हराक्षस बनवून ठेवला होता . मोठ्या शहरात शिकायला जाण्याचा, लहानपणी घरी एकटा झोपण्याचा , सकाळी हिंस्त्र कुत्री असलेल्या गल्ली मधून मार्ग काढत शिकवणी ला जाण्याचा , इंग्लिश बोलण्याचा , चार लोकांमध्ये आपली मतं मांडण्याचा , अनोळखी व्यक्ती सोबत संसार थाटण्याचा , न आवडणारी नोकरी सोडण्याचा , पहिला विमान प्रवास करण्याचा , पहिल्यांदा मुंबई ला एकटे जाण्याचा, जेवण बनवायला शिकण्याचा , अगदी जवळच्या मित्रांपासून, व्यक्तींपासून दूर होण्याचा … एक नव्हे हजार गोष्टी. जोपर्यंत त्यांना सामोरं नाही गेलो तोपर्यंत त्या प्रचंड अशक्य वाटायच्या .</span><br />
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;"><br /></span>
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;">भीती अजूनही बऱ्याच गोष्टींची वाटते . नाही असं नाही . पण अनुभूवांती हे माहिती झालाय कि फक्त त्यांना सामोर जाण्याचा अवकाश आहे . त्या आपोआप दूर होतात. घाबरून पळून जातात . ती जाहिरात आहे न कुठली तरी… "<b>डर के आगे जीत है</b> ". एकदम बरोबर !!!</span><br />
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;"><br /></span>
<span class="Apple-style-span" style="font-family: Verdana, sans-serif;">चला मग उघडणार ना ते दार?</span></div></div></div></div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2645825962464624764.post-27357512675130087562014-08-23T06:16:00.000-07:002015-01-13T06:09:48.921-08:00यादोंकी बारात ….<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
आरंभ<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>हो<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>प्रचंड<span style="font: 14.0px Helvetica;">!!!! </span>शेवटी<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>एकदचा<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>मुहूर्त<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>लागला<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>माझ्या<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>ब्लॉग<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>लिहीण्याचा<span style="font: 14.0px Helvetica;">...</span></div>
<div style="color: #141823; font: 14.0px Helvetica; margin: 0.0px 0.0px 0.0px 0.0px; min-height: 17.0px;">
<br /></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
सुरूवात<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>कुठून<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>करायची<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>हा<span style="font: 14.0px Helvetica;"> <span class="Apple-style-span" style="font-family: 'Devanagari MT';">प्रश्न</span></span><span style="font: 14.0px Helvetica;"> <span class="Apple-style-span" style="font-family: 'Devanagari MT';">होताच </span></span><span style="font: 14.0px Helvetica;">... </span>बर्याच<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>दिवसापासून<span style="font: 14.0px Helvetica;"> <span class="Apple-style-span" style="font-family: 'Devanagari MT';">काहीतरी </span></span>लिहीण्याचा<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>कीडा<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>डोक्यात<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>वळवळत<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>होता<span style="font: 14.0px Helvetica;">. </span>पण<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>ते<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>म्हणतात<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>ना<span style="font: 14.0px Helvetica;"> <span class="Apple-style-span" style="font-family: 'Devanagari MT';">नकटी </span></span>च्या<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>लग्नाला<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>सतराशे<span style="font: 14.0px Helvetica;"> <span class="Apple-style-span" style="font-family: 'Devanagari MT';">विघ्न </span></span><span style="font: 14.0px Helvetica;"> ! </span>तसाच<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>काहीतरी<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>प्रकार<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>चालला<span style="font: 14.0px Helvetica;"> </span>होता<span style="font: 14.0px Helvetica;">. मध्ये बर्याच वर्षापूर्वी एक इंग्लिश मध्ये ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न केला होता , पण मला जाणवले कि मराठी मध्ये आपण जास्त परिणामकारक लिहू शकु. असो… </span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span style="font: 14.0px Helvetica;"><br /></span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span style="font: 14.0px Helvetica;">प्रयोजन असे कि बर्याच चांगल्या वाईट आठवणी, घटना, लक्षात राहणारे प्रसंग , कुठेतरी लिहून ठेवावे, असे मला खूप प्रकर्षाने वाटते. पूर्वी बरेच लोक डायरी लिहयाचे. तसंच . काही वर्षापुर्वी , माझे वडील गेले तेव्हा घरातून बरेच जुने सामान बाहेर काढले. खजिना सापडला आठवणींचा ! खास करून मी पुण्याला शिकायला असताना माझा झालेला पत्रव्यवहार. मित्रांना , आईला ,वडिलांना, बहिणीला लिहिलेली पत्रं. एवढी पारायण केली त्यांची कि काय सांगू . आणि तेव्हा वाटले कि अजून जास्त का नाही लिहिली मी पत्रं तेव्हा . कारण, काही आठवणी मनात राहतात आणि थोड्या दिवसांनी अर्काइव ( मराठी शब्द नाही माहित archive साठी ) होऊन जातात. पत्रं , ब्लॉग च्या स्वरूपात त्या नेहमीसाठी जतन केल्या जातात . अधून मधून त्यांचा आस्वाद घेत येतो . ताण तणावानी भरलेल्या दिवसाच्या शेवटी एखादे असे पत्र, आठवण किंवा ब्लॉग पोस्ट मूड बदलून टाकते . दुसर्या दिवशी च्या ताण तणावाला सामोर जायची एनर्जी देते. म्हणून हा अट्टाहास… </span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span style="font: 14.0px Helvetica;"><br /></span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span style="font: 14.0px Helvetica;">जुन्या मित्रांना फोन केला, कधी भेटलो कि पहिली १५ मिनिट फक्त आणि फक्त जुन्या आठवणी काढून हसण्यातच जातात . बरयाच वेळी मला जाणवते कि काही गोष्टीवर आपण एखाद्या मित्रासोबत खूप हसलेलो असतो , पण थोड्या फार वर्षांनी काहीजण ते सर्व विसरून जातात. आठवण करून दिली तर बळे बळेच "हो हो आठवले " वगैरे म्हणतात :). पण काही झाले तर त्या प्रसंगावर हसतात मात्र भरपूर. </span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span style="font: 14.0px Helvetica;"><br /></span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span style="font: 14.0px Helvetica;">काल V . G. ला फोन केला . बहुतेक ६-७ वर्षांनी आम्ही बोललो असू . आम्ही आमचे करीअर एकाच कंपनी मध्ये सुरु केलेले . </span><span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;">ऑफीस म्हणजे एक छोटेखानी बंगला होता . इन मीन १५ लोकं असतिल. </span><span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;">भारी कंपनी होती एकदम, १० मिनिट उशीर झाला तरी लेट मार्क लागायचा ( स्पेशल लाल शाईच्या पेन ने!). तर VG ला कधी उशीर झाला तर कंपनीत चोर पावलांनी यायचा आणि हळूच सीट वर बसायचा . आणि मग मी मुद्दामहून जोरात ओरडयचो "गुड मोर्निंग VG , काय आज उशीर झाला वाटते !". आणि सगळ ऑफिस जोर जोरात हसायला लागायचं . VG चा चेहरा बघण्यासारखा असायचा . कधी लवकर जायचे असले किंवा थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन यायचे असले कि पार्किंग मधून स्कूटर काढायचा पण सुरु न करता कंपनी च्या गेट बाहेर ढकलत न्यायाचा ! का तर ऑफीस मध्ये कुणाला ( बॉस ) ला कळू नये म्हणुन . गाडी बाहेर सेफ distance ला आल्यावर किक मारून निघायचा . </span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;">दत्ताभाई ( अजून एक सहकारी) च्या चष्म्याची एक काच निघून पडलीय हे त्यांना दिवसभर नाही कळले . चार वाजता रुमालानी चष्मा साफ करताना रुमाल डायरेक्ट डोळ्यात गेला आणि मग त्यांना भान आले कि च्यायला म्हणूनच सकाळ पासून स्क्रीन अस्पष्ट दिसतेय!!! या आठवणि काढून बरच हसलो आम्ही . अजून हि बऱ्याच होत्या पण इथे लिहिण्यासारख्या नाहीयेत :)</span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;">आठवणींचे सोनेरी कण, काळाच्या तुरटी ने कुठेतरी मनाच्या डोहात कुठेतरी खोल जाउन स्थिरावले गेलेत. पाणी ढवळून काढायचा विचार आहे !!! ( कादर खान वगैरे टाइप चा डायलॉग तयार झाला हा तर. असो … )</span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;">जाता जाता विशेष आभार "V" चे . नकटी च्या लग्नातलं एक मोठे विघ्न - "मराठीत कसे </span><span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;">टाइप करायचे?" दूर केल्याबद्दल (Quillpadची ओळख करून दिल्याबद्दल ) </span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;"><br /></span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;">तुम्हा सर्वांसाठी अपार आनंदाची प्रार्थना !!! भेटूच लवकर … </span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;"> </span></div>
<div style="color: #141823; font: normal normal normal 14px/normal 'Devanagari MT'; margin-bottom: 0px; margin-left: 0px; margin-right: 0px; margin-top: 0px; text-align: left;">
<span class="Apple-style-span" style="font-family: Helvetica;"></span></div>
</div>
Unknownnoreply@blogger.com9